शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

जीएसटी महसूलवाढीचा फायदा करदात्यांना मिळावा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 00:49 IST

केंद्र सरकारने १ जुलै २०१७ ला वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू केला होता. एक वर्षात जीएसटी महसुलात वाढ झाली असून त्याचा फायदा करदात्यांना मिळावा, अशी मागणी विदर्भ टॅक्सपेअर असोसिएशनने (व्हीटीए) जीएसटीवर आयोजित चर्चासत्रात केली आहे.

ठळक मुद्देव्हीटीएची मागणी : २८ टक्के जीएसटी १८ वर आणावा

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : केंद्र सरकारने १ जुलै २०१७ ला वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू केला होता. एक वर्षात जीएसटी महसुलात वाढ झाली असून त्याचा फायदा करदात्यांना मिळावा, अशी मागणी विदर्भ टॅक्सपेअर असोसिएशनने (व्हीटीए) जीएसटीवर आयोजित चर्चासत्रात केली आहे.व्हीटीएचे अध्यक्ष जे.पी. शर्मा यांनी सांगितले की, अर्थिक वर्षात शासनाला अपेक्षेपेक्षा जास्त जीएसटी मिळाला आहे. १५ टक्क्यांपर्यंत जीएसटी अदा करण्याचा नागरिकांचा मानस आहे. २८ टक्क्यांचा करटप्पा समाप्त करून त्याचा १८ टक्क्यांत समावेश करावा. २८ टक्के कर टप्प्यातील वस्तूंची खरेदी बिलाविना होत असल्यामुळे व्यापाऱ्यांना वस्तूंच्या विक्रीत अडचणी येत आहेत.उपाध्यक्ष रामकिशन ओझा म्हणाले, विभिन्न नियम, विभिन्न करटप्पा आणि आधुनिक रिटर्न प्रणालीमुळे व्यापारी त्रस्त आहेत. शासनाची एक देश एक कर, ही घोषणा वर्तमान स्थितीत अनेक मैल दूर आहे.व्हीटीएचे सचिव तेजिंदरसिंग रेणू म्हणाले, जीएसटी लागू झाल्यानंतर देशात कर बेसमध्ये जवळपास ७० टक्के वाढ होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते. त्यानुसार बेस वाढल्यामुळे शासनाच्या महसुलात वाढ झाली आहे. अशा स्थितीत शासनाने करात कपात करून वाढलेल्या महसुलाचा फायदा नागरिकांना द्यावा. जीएसटीमध्ये सुधारणा करून त्यात पारदर्शकता आणावी. त्यामुळे व्यापाऱ्यांना रिटर्न फाईल भरण्यास सुविधा होईल आणि २८ टक्के करटप्पा समाप्त करून त्यात सहभागी वस्तूंना १८ टक्के करटप्प्यात आणावे. तसेच दैनंदिन वस्तूंवरील जीएसटी रद्द करून नागरिकांवरील अतिरिक्त कराचा बोझा कमी करावा, अशी मागणी रेणू यांनी केली आहे.

टॅग्स :GSTजीएसटीTaxकर