शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 06:14 IST

Mohan Bhagwat on tariffs: अमेरिकेने भारतावर लावलेल्या अतिरिक्त टॅरिफसंदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

नागपूर : अमेरिकेने भारतावर लावलेल्या अतिरिक्त टॅरिफसंदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मोठे वक्तव्य केले आहे. जगातील काही देश सातासमुद्रापार आहेत. त्यांच्याशी आपला थेट संबंधदेखील येत नाही. मात्र, जर भारत मोठा झाला तर आमचे काय होईल, आमचे स्थान कुठे असेल भीतीने ते अस्वस्थ होतात. याच भीतीतून टॅरिफ लावण्यात आला आहे, असे सरसंघचालक म्हणाले.  

ब्रह्माकुमारीजच्या जामठा येथील विश्वशांती सरोवरच्या वार्षिक उत्सवादरम्यान ते शुक्रवारी बोलत होते.

आज वेगवेगळ्या ठिकाणी वाद दिसून येतात. अगदी व्यक्तीपासून ते राष्ट्रांपर्यंतच्या वादाचे मूळ कारण हे आम्हाला पाहिजे व मला पाहिजे ही विचारधारा आहे. जेव्हा सर्व आमचे भाऊ आणि बहीण आहेत हे भाव असतात तेव्हा कलह निर्माण होत नाहीत. असेही भागवत म्हणाले. 

आत्मीयतेची भावना असेल तर आपला कोणी शत्रू नसतो

जर आपल्या मनात आत्मीयतेची भावना असेल तर आपला कुणीच शत्रू नसतो. मी, माझे याच विचारातून जगातील इतके वाद वाढतात, असे सरसंघचालक म्हणाले. व्यक्ती आणि देशांना त्यांचे खरे स्वरूप समजणार नाही तोपर्यंत त्यांना समस्यांना तोंड द्यावे लागेल. 

भारत महान, भारतीयांनीही ज्ञानयुक्त होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत

विचारांचा दृष्टिकोन मी वरून आपल्यावर बदलला तर अनेक समस्या दूर होतील. भारत जगाच्या समस्यांवर उपाय शोधण्यास व पुढे जाण्याचा मार्ग दाखविण्यास सक्षम आहे. भारत महान आहे आणि भारतीयांनीही ज्ञानयुक्त होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असेदेखील ते म्हणाले.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतTrade Tariff Warटॅरिफ युद्धDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ