शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत देशाचे नेतृत्व करावे, आजवर असा नेता पाहिला नाही..." - मुकेश अंबानी
2
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
3
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
4
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
5
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
6
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
7
"बाप्पा तुम्ही खूप भाग्यवान, नांगरलं कुणी, पेरलं कुणी अन्..."; पंकजा मुंडेंचा खासदार बजरंग सोनवणेंना टोला
8
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
9
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?
10
टाटा-इन्फोसिससह 'या' शेअर्समध्ये वाढ! सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स-निफ्टी वधारले, कुठे झाली घसरण?
11
World Athletics Championships 2025 : नीरज चोप्राची फायनलमध्ये धडक; इथंही IND vs PAK महामुकाबला?
12
२५,००० रुपयांच्या पगारात आलिशान कार अन् फ्लॅट शक्य आहे! तज्ज्ञांनी सांगितलं गुंतवणुकीचं सूत्र
13
याला म्हणतात नशीब! आदिवासी महिलेला सापडले ३ मौल्यवान हिरे; रातोरात झाली लखपती
14
GST कपाती नंतर मध्यमवर्गींना आणखी एक भेट मिळणार? ऑक्टोबरमध्ये RBI घेणार मोठा निर्णय
15
'या' कंपनीनं अचानक बंद केला आपला व्यवसाय, आता शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१३१ वर आला भाव
16
एटापल्लीच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांत जोरदार चकमक, दोन महिला माओवाद्यांना मारण्यात यश
17
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
18
टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक...
19
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
20
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात मृत्यू येणे चांगले, पण अंत्यविधिला गेल्यावर स्मशानात काढू नका 'हे' शब्द

तापी-गोदावरी नदी जोडचे काम तीन महिन्यात सुरूहोणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 01:02 IST

नद्यांतून समुद्रात जाणारे पाणी रोखण्यासाठी येत्या काळात काम केले जाणार आहे. दमण गंगा प्रकल्प व तापी- गोदावरी नदी जोड प्रकल्प पूर्ण केले जातील.

ठळक मुद्देनितीन गडकरी : मराठवाडा व उत्तर महाराष्ट्राचा पाणी प्रश्न मिटणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नद्यांतून समुद्रात जाणारे पाणी रोखण्यासाठी येत्या काळात काम केले जाणार आहे. दमण गंगा प्रकल्प व तापी- गोदावरी नदी जोड प्रकल्प पूर्ण केले जातील. येत्या तीन महिन्यात तापी- गोदावरी नदी जोड प्रकल्पाचे काम सुरू होईल. यामुळे मराठवाडा व उत्तर महाराष्ट्राचा पाणीप्रश्न मिटेल, असे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाज बांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.गडकरी म्हणाले, राज्यात सध्या असलेले २२ टक्के सिंचन वाढवून ४० टक्क्यांवर नेण्याची योजना आहे. त्यासाठी समुद्रात वाहून जाणारे पाणी नद्यांमध्ये अडविणे आवश्यक आहे. दमण गंगा प्रकल्प व तापी- गोदावरी नदी जोड प्रकल्प, या दोन्ही प्रकल्पांसाठी ४० हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत. यापैकी १० टक्के वाटा महाराष्ट्र व १० टक्के वाटा गुजरात सरकार उचलेल. उर्वरित रक्कम केंद्र सरकार देईल. या नदी जोड प्रकल्पामुळे उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यातील सर्व धरणे तुडुंब भरतील. यामुळे येथील पाण्याचा प्रश्न सुटेल. गोसेखुर्द प्रकल्पातून पाणी वळविण्याबाबत लवकरच बैठक घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.९० टक्के काम झालेले प्रकल्प पूर्ण करणारविदर्भासह राज्यातील असे काही प्रकल्प आहेत की ज्यांचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. त्यांना थोडा निधी दिला की उर्वरित काम पूर्ण होऊन त्यातून सिंचनासाठी पाणी उपलब्ध होऊ शकते. यासाठी पंतप्रधान सिंचन योजनेंतर्गत निधी दिला जाईल, असेही गडकरी यांनी सांगितले.विदर्भात बांबू मिशनयेत्या काळात विदर्भात मोठ्या प्रमाणात बांबू लागवडीवर भर दिला जाईल. शेतकºयांच्या धुºयावर बाबूंची लागवड केली जाईल. बांबू लागवडीसाठी नर्सरी सुरू केल्या जातील. वेस्टर्न कोल फिल्ड, मॅगनीज ओअरच्या रिकाम्या जागेवर बांबू लागवड केली जाईल. यामुळे शेतकºयांना आर्थिक उत्पन्न मिळेल व विदर्भाचे चित्र पालटेल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.गडकरी म्हणाले...विदर्भातही उसाची लागवड वाढत आहे. त्यामुळे गोसेखुर्दच्या क्षेत्रात वसंतदादा साखर इन्स्टिट्यूटला उसावर संशोधन व मार्गदर्शनासाठी ४५ एकर जागा दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.वर्धा जिल्ह्यात गुजरातच्या कंपनीतर्फे ५० हजार एकर जागेवर आॅरगॅनिक कापूस लावण्यात येणार आहे. संबंधित कंपनीने शेतकºयांकडून सव्वापट दराने कापूस खरेदी करावा, असा प्रस्ताव देण्यात आला आहे.आयटीसी कंपनीतर्फे गडचिरोलीमध्ये बांबूपासून अगरबत्तीच्या काड्या तयार करण्याचा कारखाना उभारला जात आहे.