शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
2
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
3
Shivalik Sharma: मुंबई इंडियन्सच्या खेळाडूला अटक, लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
4
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
5
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
6
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
7
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
8
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
9
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
10
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
11
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
12
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
13
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
14
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
15
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
16
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
17
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
18
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
19
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
20
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल

तंटामुक्ती गाव योजनेला लागली घरघर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:11 IST

आशिष साैदागर लाेकमत न्यूज नेटवर्क कळमेश्वर : गावखेड्यातील छाेटे-माेठे तंटे मिटवून गावात शांतता व सुव्यवस्था राहावी, यासाठी शासनाने महात्मा ...

आशिष साैदागर

लाेकमत न्यूज नेटवर्क

कळमेश्वर : गावखेड्यातील छाेटे-माेठे तंटे मिटवून गावात शांतता व सुव्यवस्था राहावी, यासाठी शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव याेजना अमलात आणली; परंतु या याेजनेला लागलेली घरघर पाहता शासनाच्या या लाेककल्याणकारी याेजनेला पूर्णविराम मिळण्याची चिन्हे आहेत.

गावातील तंटे गावातच मिटून गावकऱ्यांचा पैसा व वेळ वाचविण्यासाठी माजी गृहमंत्री स्व. आर. आर. पाटील यांच्या संकल्पनेतून १५ ऑगस्ट २००७ पासून राज्यात महात्मा गांधी तंटामुक्त गाव याेजना कार्यान्वित केली. या बहुआयामी योजनेला आघाडी सरकारमध्ये घरघर लागली होती; परंतु महाविकास आघाडी सरकारमध्ये तरी नवसंजीवनी मिळण्याच्या प्रतीक्षेत ही योजना गावखेड्यापासून आणखी दूर लोटली गेली. त्यामुळे गावागावांत समित्यांची बसलेली घडी आता विस्कळीत झाली आहे. मध्यंतरी गाव समिती अध्यक्षपदासाठी राजकीय रस्सीखेच बघायला मिळाली. विशेष म्हणजे गृहविभाग राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या वाट्याला असल्याने मरगळ आलेल्या या योजनेला बूस्टर मिळेल, अशी गावकऱ्यांची अपेक्षा आहे.

परंतु निधीची कमतरता, मार्गदर्शनाचा अभाव आणि राजकीय हस्तक्षेप यामुळे पुढील वर्षात या माेहिमेचे विसर्जन हाेण्याची शक्यता आहे. गेल्या १० वर्षांच्या काळात गृहविभागाने एकही नवीन परिपत्रक या याेजनेतील कार्यक्षमता वाढविण्याबाबत काढले नाही. याेजनेचे इतर पुरस्कार रखडले आहेत. पुरस्कार रकमेच्या विनियाेगातून पुरस्कारप्राप्त गावांनी विविध विकासकामे केली; परंतु कामातील सातत्य अधिक काळ टिकले नाही आणि या तंटामुक्त गाव माेहिमेच्या प्रारंभीची पाच वर्षे वगळता नंतर नांगी टाकली. परिणामी लहानसहान वादविवाद पुन्हा पाेलीस ठाणे गाठत आहेत.

.....

गावातील वाद पाेलीस ठाण्यात

गावखेड्यात लहान-मोठे तंटे गावातच मिटवून गाव पातळीवर शांतता व सुव्यवस्था राखण्याची महत्त्वाची भूमिका बजावलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजनेमुळे पाेलीस ठाण्यात तक्रारी करण्याचे प्रमाण कमी झाले होते. काही प्रमाणात का होईना तक्रारी करण्याचे प्रमाण कमी झाले. त्यामुळे पोलिसांचा भार हलका झाला होता. आता या योजनेकडे दुर्लक्ष झाल्यामुळे पुन्हा नागरिक पाेलीस ठाण्यात धाव घेतात. गावात भांडण, तंटे वाढले आहेत. त्यामुळे या योजनेला पुन्हा सक्रिय करणे गरजेचे झाले आहे.

....

गावात शांतता व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ज्याप्रमाणे पोलिसांची आहे, त्याचप्रमाणे नागरिकांचीसुद्धा आहे. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, अडचणी असल्यास पाेलिसांशी संवाद साधावा तसेच गावात येणाऱ्या अनोळखी व्यक्तीची माहिती घ्यावी व काही गुन्हेगार प्रवृत्तीचे आढळल्यास लगेच पोलीस ठाण्यात संपर्क साधावा.

- आसिफराजा शेख, पोलीस निरीक्षक, पाेलीस ठाणे, कळमेश्वर.

....

१३ वर्षांपासून तंटामुक्त समितीचा अध्यक्ष आहे. यात आमच्या गावाला पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. आमच्या गावातील तंटे गावातच सोडविले जातात. तंटामुक्त गाव माेहीम ही चांगली योजना आहे. योजनेत अध्यक्षाची भूमिका महत्त्वाची असते. योजनेच्या परिपत्रकानुसार कामे केल्यास गावात तंटे होणार नाहीत व गाव तंटामुक्त राहील.

- मुकेश ढाेमणे, अध्यक्ष, तंटामुक्त गाव समिती, फेटरी