शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाला कधी मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष?; अचानक घडलेल्या घडामोडींमुळे झाला विलंब, काय आहे कारण?
2
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
3
टिकटॉक भारतात परत सुरू होणार? नवीन अपडेट आली, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
4
Video: इलेक्टिक कारच्या ऑटोमेटिक फिचरनं घेतला मालकाचा जीव?; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
5
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
6
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
7
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
8
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
9
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
10
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
11
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
12
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
13
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
14
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
15
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
16
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
17
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
18
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
19
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर
20
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?

परीक्षा घेणे म्हणजे जीव धोक्यात घालणे होय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:07 IST

नागपूर : कोरोनाने राज्यात भयावय स्थिती निर्माण केली आहे. राज्यात पॉझिटिव्हची संख्या ५० हजारांवर पोहोचली आहे. दररोज हजाराच्या जवळपास ...

नागपूर : कोरोनाने राज्यात भयावय स्थिती निर्माण केली आहे. राज्यात पॉझिटिव्हची संख्या ५० हजारांवर पोहोचली आहे. दररोज हजाराच्या जवळपास मृत्यूचा आकडा आहे. औषधांचा तुटवडा, बेडची अनुपलब्धता, लसीकरणाचा फज्जा ही सर्व परिस्थिती सरकार व प्रशासनासाठी डोईजड झाली आहे. अशात राज्य शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे आयोजन एप्रिल महिन्याच्या २३ आणि २९ पासून केले आहे. परीक्षेच्या आयोजनात लाखो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी लागणार आहेत. ३२ लाखांवर विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. राज्यापुढे ठाकलेली परिस्थिती लक्षात घेता परीक्षेचे आयोजन म्हणजे जीव धोक्यात घालणे होय, असा सूर शिक्षण क्षेत्रातून उमटतो आहे. शिक्षकांच्या संघटनांकडून, आमदारांसोबतच शिक्षण तज्ज्ञांकडून बोर्डाकडे निवेदने पाठविली जात आहेत.

सरकारने जसे पहिली ते आठवी आणि नववी व अकराव्या वर्गातील विद्यार्थ्यांना वर्गोन्नती दिली, हाच नियम दहावी आणि बारावीच्या परीक्षेबाबतीत लावण्यात यावा, अशीही मागणी होत आहे. परीक्षेसाठी मोठ्या प्रमाणात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी लागणार आहेत. शिक्षकांना प्रशासनाने कोरोनाच्या कामात सहभागी करून घेतले आहे. अनेक शिक्षक पॉझिटिव्हसुद्धा येत आहेत. शिक्षकांचा मृत्यूही झाला आहे. त्यामुळे जिवाच्या भीतीने परीक्षेत सहकार्य करण्यास शिक्षक तयार नाहीत. त्याचबरोबर वर्षभर शाळा बंद असल्याने कर्मचारी उपलब्ध नाहीत. स्वयं अर्थसहायित शिक्षकांना घरी बसावे लागले आहे. संक्रमण इतके वाढले आहे की कोण कधी पॉझिटिव्ह निघेल सांगता येत नाही. त्यामुळे परीक्षा स्थगित कराव्यात, अथवा पुढे ढकलाव्यात, अशी मागणी होत आहे.

- या परीक्षेसाठी लाखावर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी लागणार आहेत. ३० लाखांवर विद्यार्थी राज्यभरात परीक्षा देणार आहेत. सध्या परिस्थिती खूप वाईट आहे. अशात विद्यार्थ्यांची ऑफलाईन परीक्षा घेण्याचा अट्टाहास शासनाने सोडायला हवा. परीक्षेचे आयोजन करून जीव धोक्यात घालण्यासारखे आहे.

नागो गाणार, शिक्षक आमदार

- अशा परिस्थितीत हट्ट करून परीक्षा घेतल्यास परीक्षेदरम्यान काही अघटित प्रकार घडला व सुरू झालेली परीक्षा मध्येच थांबवावी लागली तर ते योग्य होणार नाही. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्व शैक्षणिक नियोजन आणि वेळापत्रक कोलमडले आहेच. त्यामध्ये सुधारणा करून जून महिन्यात त्यावेळची परिस्थिती लक्षात घेऊन परीक्षेचे आयोजन करावे. आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी आणि काही संस्थांनी एप्रिल व मे हे दोन महिने कोरोनाच्या दृष्टीने घातक असल्याचे मत व्यक्त केले आहे. त्यामुळे परीक्षा तूर्तास स्थगित करणे हे शहाणपणाचे ठरेल.

पुरुषोत्तम पंचभाई, अध्यक्ष, महाराष्ट्र गणित अध्यापक मंडळ

- वर्षभरापासून शाळा बंद असल्याने खासगी अंदाजे तीन लाख विनाअनुदानित शिक्षक बेरोजगार झालेले आहेत. त्यांना शासनाने कुठलीही आर्थिक मद्त केलेली नाही. त्यामुळे दहावी व बारावी परीक्षेवर कोरोना संक्रमणाबरोबरच खासगी शाळा व शिक्षक यांच्या आर्थिक अडचणीमुळे ते शाळेत येण्यास तयार नाहीत. कोरोना वेगाने पसरत असल्याने शिक्षणमंत्र्यांनी तातडीने याचा विचार करून परीक्षा पुढे ढकलावी किंवा रद्द करून वर्गोन्नती द्यावी.

प्रा. सचिन काळबांडे, अध्यक्ष, आरटीई फाउंडेशन