शहरं
Join us  
Trending Stories
1
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
2
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
3
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
4
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
5
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
6
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
7
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
8
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
9
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
10
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
11
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
12
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
13
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
14
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
15
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
16
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
17
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
18
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
19
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
20
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...

परीक्षा घेणे म्हणजे जीव धोक्यात घालणे होय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:07 IST

नागपूर : कोरोनाने राज्यात भयावय स्थिती निर्माण केली आहे. राज्यात पॉझिटिव्हची संख्या ५० हजारांवर पोहोचली आहे. दररोज हजाराच्या जवळपास ...

नागपूर : कोरोनाने राज्यात भयावय स्थिती निर्माण केली आहे. राज्यात पॉझिटिव्हची संख्या ५० हजारांवर पोहोचली आहे. दररोज हजाराच्या जवळपास मृत्यूचा आकडा आहे. औषधांचा तुटवडा, बेडची अनुपलब्धता, लसीकरणाचा फज्जा ही सर्व परिस्थिती सरकार व प्रशासनासाठी डोईजड झाली आहे. अशात राज्य शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे आयोजन एप्रिल महिन्याच्या २३ आणि २९ पासून केले आहे. परीक्षेच्या आयोजनात लाखो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी लागणार आहेत. ३२ लाखांवर विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. राज्यापुढे ठाकलेली परिस्थिती लक्षात घेता परीक्षेचे आयोजन म्हणजे जीव धोक्यात घालणे होय, असा सूर शिक्षण क्षेत्रातून उमटतो आहे. शिक्षकांच्या संघटनांकडून, आमदारांसोबतच शिक्षण तज्ज्ञांकडून बोर्डाकडे निवेदने पाठविली जात आहेत.

सरकारने जसे पहिली ते आठवी आणि नववी व अकराव्या वर्गातील विद्यार्थ्यांना वर्गोन्नती दिली, हाच नियम दहावी आणि बारावीच्या परीक्षेबाबतीत लावण्यात यावा, अशीही मागणी होत आहे. परीक्षेसाठी मोठ्या प्रमाणात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी लागणार आहेत. शिक्षकांना प्रशासनाने कोरोनाच्या कामात सहभागी करून घेतले आहे. अनेक शिक्षक पॉझिटिव्हसुद्धा येत आहेत. शिक्षकांचा मृत्यूही झाला आहे. त्यामुळे जिवाच्या भीतीने परीक्षेत सहकार्य करण्यास शिक्षक तयार नाहीत. त्याचबरोबर वर्षभर शाळा बंद असल्याने कर्मचारी उपलब्ध नाहीत. स्वयं अर्थसहायित शिक्षकांना घरी बसावे लागले आहे. संक्रमण इतके वाढले आहे की कोण कधी पॉझिटिव्ह निघेल सांगता येत नाही. त्यामुळे परीक्षा स्थगित कराव्यात, अथवा पुढे ढकलाव्यात, अशी मागणी होत आहे.

- या परीक्षेसाठी लाखावर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी लागणार आहेत. ३० लाखांवर विद्यार्थी राज्यभरात परीक्षा देणार आहेत. सध्या परिस्थिती खूप वाईट आहे. अशात विद्यार्थ्यांची ऑफलाईन परीक्षा घेण्याचा अट्टाहास शासनाने सोडायला हवा. परीक्षेचे आयोजन करून जीव धोक्यात घालण्यासारखे आहे.

नागो गाणार, शिक्षक आमदार

- अशा परिस्थितीत हट्ट करून परीक्षा घेतल्यास परीक्षेदरम्यान काही अघटित प्रकार घडला व सुरू झालेली परीक्षा मध्येच थांबवावी लागली तर ते योग्य होणार नाही. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्व शैक्षणिक नियोजन आणि वेळापत्रक कोलमडले आहेच. त्यामध्ये सुधारणा करून जून महिन्यात त्यावेळची परिस्थिती लक्षात घेऊन परीक्षेचे आयोजन करावे. आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी आणि काही संस्थांनी एप्रिल व मे हे दोन महिने कोरोनाच्या दृष्टीने घातक असल्याचे मत व्यक्त केले आहे. त्यामुळे परीक्षा तूर्तास स्थगित करणे हे शहाणपणाचे ठरेल.

पुरुषोत्तम पंचभाई, अध्यक्ष, महाराष्ट्र गणित अध्यापक मंडळ

- वर्षभरापासून शाळा बंद असल्याने खासगी अंदाजे तीन लाख विनाअनुदानित शिक्षक बेरोजगार झालेले आहेत. त्यांना शासनाने कुठलीही आर्थिक मद्त केलेली नाही. त्यामुळे दहावी व बारावी परीक्षेवर कोरोना संक्रमणाबरोबरच खासगी शाळा व शिक्षक यांच्या आर्थिक अडचणीमुळे ते शाळेत येण्यास तयार नाहीत. कोरोना वेगाने पसरत असल्याने शिक्षणमंत्र्यांनी तातडीने याचा विचार करून परीक्षा पुढे ढकलावी किंवा रद्द करून वर्गोन्नती द्यावी.

प्रा. सचिन काळबांडे, अध्यक्ष, आरटीई फाउंडेशन