शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ दावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकूण वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
2
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
3
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
4
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
5
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
7
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
8
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
9
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
10
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
11
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
12
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
13
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
14
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
15
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
16
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
17
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
18
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
19
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
20
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”

नागपुरात कठोर निर्णय घेऊ

By admin | Updated: May 11, 2017 02:27 IST

नागपुरात काँग्रेसमधील गटबाजी पाहून दु:ख होते. नेत्यांच्या व्यवहारामुळे कार्यकर्ते दु:खी आहेत.

अविनाश पांडे यांचा इशारा : गटबाजीवर व्यक्त केली चिंता लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपुरात काँग्रेसमधील गटबाजी पाहून दु:ख होते. नेत्यांच्या व्यवहारामुळे कार्यकर्ते दु:खी आहेत. नेत्यांनी पराभवातून धडा घ्यावा. हे चित्र कोणत्याही परिस्थितीत बदलायला हवे. काँग्रेसला शहरात मजबूत करण्यासाठी आपण कठोर निर्णय घेऊ, असा इशारा अखिल भारतीय काँग्रेस समितीचे नवनियुक्त महासचिव व राजस्थानचे प्रभारी अविनाश पांडे यांनी दिला. अविनाश पांडे यांनी बुधवारी लोकमतला सदिच्छा भेट दिली. लोकमतच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी पांडे यांनी संपादकीय सहकाऱ्यांशी संवाद साधला. पांडे म्हणाले, आज आपण माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, नितीन राऊत, विनोद गुडधे पाटील, माजी खासदार गेव्ह आवारी, माजी आ. अशोक धवड, शौकत कुरेशी, नगरसेवक प्रफुल्ल गुडधे आदींच्या घरी जाऊन भेटी घेतल्या. सविस्तर चर्चा केली. शहरातील परिस्थितीची विस्ताराने माहिती घेतली. आपण कार्यकर्त्यांच्याही संपर्कात असतो. कार्यकर्ते दु:खी आहेत. नेतृत्वाकडून कार्यकर्त्यांना असलेली आशा आता निराशेत बदलली आहे. आता नेत्यांनी पावले उचलली नाही तर कार्यकर्त्यांना घृणा वाटेल. यातून विरोध वाढेल व विरोधातून दुसरे स्वतंत्र नेतृत्व उभे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. आज काँग्रेस समोर आव्हाने आहेत. अशा परिस्थितीत ज्यांना काँग्रेसने पद, सत्ता व पैसा दिला त्यांनी पक्षाला हातभार लावण्याची गरज आहे. पण तसे न करता आपण घरातच संकट वाढवत असू तर त्यावरही गांभीर्याने विचार करावा लागेल, असा सूचक इशारा त्यांनी दिला. चुका मान्य कराव्या लागतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपा हे काँग्रेसचे मोठे शत्रू आहेत. त्यामुळे आता काँग्रेस नेत्यांना झालेल्या चुका मान्य कराव्या लागतील. खूप परिश्रम घेऊन नव्या उमेदीने मार्ग काढावा लागेल, असा सल्लाही पांडे यांनी दिला. राजस्थानमध्ये संधी राजस्थानमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. त्यांच्या संपर्कात राहून त्यांना मान सन्मान देण्याची गरज आहे. काही कार्यकर्त्यांची तर फक्त भेटीची अपेक्षा असते. त्यामुळे आपणही सर्वांच्या संपर्कात राहून सुसंवाद प्रस्थापित करू. संघटन मजबूत करू. सर्व नेत्यांना सोबत घेऊन काम करू. राजस्थानमध्ये आगामी विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस चांगली कामगिरी करून दाखवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.