शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

संमिश्र हवामानात त्वचेची घ्या अशी काळजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 11:27 IST

ऋतुमानानुसार वातावरणातील बदलांचा सर्वात प्रथम परिणाम त्वचेवर दिसून येतो. हिवाळ्यात त्वचा विकार वाढत असलेतरी सध्या सुरू असलेल्या थंडीच्या कमी जास्त प्रभावामुळे त्वचा विकाराचे सर्वाधिक रुग्ण दिसून येत आहे.

ठळक मुद्देकोरडेपणा, त्वचा फुटणे, खरखरीत होणे, खाज सुटणे आदींचे रुग्ण वाढले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ऋतुमानानुसार वातावरणातील बदलांचा सर्वात प्रथम परिणाम त्वचेवर दिसून येतो. हिवाळ्यात त्वचा विकार वाढत असलेतरी सध्या सुरू असलेल्या थंडीच्या कमी जास्त प्रभावामुळे त्वचा विकाराचे सर्वाधिक रुग्ण दिसून येत आहे. या बदलत्या वातावरणामुळे त्वचा कोरडी पडणे, त्वचा फुटणे, खरखरीत होणे, खाज सुटणे आदी समस्या घेऊन येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्याचे प्रसिद्ध त्वचाविकार विशेषज्ञ डॉ. नितीन बरडे यांचे म्हणणे आहे.उन्हाळ्यात त्वचा घामाला नियमितपणे शरीराबाहेर फेकण्याचे काम करते. यामुळे त्वचेच्या तक्रारी उद्भवत नाहीत. घामामुळे त्वचेची रंध्रे उघडी राहतात. विशेषत: आपण जे चरबीयुक्त पदार्थ खातो. त्यांचा तेलकटपणा रंध्रातून बाहेर पडतो, त्यामुळे त्वचा कोरडी पडत नाही. परंतु, हिवाळ्यात त्वचेतून घाम बाहेर येण्याची प्रक्रिया मंदावते किंवा बंद होत जाते. त्यामुळे त्वचेचे विकार वाढत असल्याचे डॉ. बरडे यांनी सांगितले. त्यांच्यानुसार सध्या कमी जास्त होणाºया थंडीमुळे त्वचा विकाराचे रुग्ण वाढले आहे. जर निरोगी, सुंदर त्वचा हवी असेल तर थंडीमुळे शरीरात वाढणारा कोरडेपणा कमी करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवे.

सकाळ-सायंकाळी मॉईश्चरायझर लावाडॉ. बरडे म्हणाले, बदलत्या वातावरणामुळे अनेकवेळा थंडी जाणवत नसली तरी सकाळी व सायंकाळी त्वचेवर मॉईश्चरायझर लावायला हवे. विशेष म्हणजे, चेहरा धुतल्यानंतर लगेच मॉईश्चरायझर लावल्यास फायदा होतो. आंघोळीनंतर त्वचेला टॉवेलने रगडू नये. साबणाऐवजी ‘क्लिंजर’ वापरावे. ‘स्क्रब’ क्रिमचा वापर टाळावा. ‘हिटर’मुळे त्वचा कोरडी पडते. यामुळे याबाबत काळजी घ्यावी.

भरपूर पाणी प्याहिवाळ्यात आहाराकडेही योग्य लक्ष द्यायला हवे. आहारात स्निग्ध पदार्थ, भरपूर ताजी फळे, शहाळ्याचे पाणी, हिरव्या पालेभाज्या आणि सुका मेव्याचा समावेश करायला हवा असे सांगत डॉ. बरडे म्हणाले, थंडीमुळे अनेकजण पाणी कमी पितात. याचा परिणाम आरोग्यावर होतो. यामुळे ऋतु कुठलाही असो त्वचा निरोगी ठेवण्यासाठी पाणी भरपूर प्यायला हवे.

ओठांची विशेष काळजी घ्याहिवाळ्यात ओठांचा ओलसरपणा टिकून ठेवणे आवश्यक आहे. ओठाची त्वचा खूप नाजूक असल्याने त्यावर हवा आणि थंड वातावरणाचा थेट प्रभाव पडतो. यामुळे वारंवार ओठांना जीभ लावू नये.ओठांच्या त्वचेमध्ये तैलग्रंथी नसल्यामुळे त्वचा सुकून ओठांना चिरा पडतात. यामुळे ओठ फुटण्यापूर्वी व्हॅसलिन किंवा ‘लिप बाम’चा वापर नियमित करायला हवा, असेही डॉ. बरडे म्हणाले.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन