शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

स्मृतिभ्रंश झालेल्या रुग्णांची लहान मुलांप्रमाणे घ्या काळजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 21:12 IST

स्मृतिभ्रंश किंवा डिमेन्शिया यामधलाच अलझायमर हा महत्त्वाचा प्रकार आहे. ५५ ते ६० वर्षे वयोगटानंतर होणारा हा सामान्य आजार आहे. जर्मन मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अलझायमर यांनी या आजारावर १९०६ मध्ये पहिल्यांदा प्रकाश पाडला होता. लहान मुलांना नवीन काहीतरी शिकण्याची उर्मी असते, मात्र अलझायमर झालेल्या वृद्धांच्या आयुष्यातील बहुतेक गोष्टी विस्मृतीत गेल्या असतात. अनेकदा घरची माणसे आणि नातेवाईकांचीही ओळख विसरलेली असते. सिनेमा आणि इतर गोष्टींमुळे या आजाराबाबत अनेक गैरसमज पसरले आहेत. पण आपल्या जवळच्या ज्येष्ठाला हा आजार जडला असेल तर गैरसमजातून त्रास बाळगू नका. या आजारावर उपचार नाही पण या रुग्णांची लहान मुलांप्रमाणे काळजी घेतल्यास त्याचे परिणाम मात्र कमी केले जाऊ शकतात.

ठळक मुद्देभारतात ४० लक्ष रुग्ण : पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना दीडपट धोकाजागतिक अलझायमर दिन विशेष

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्मृतिभ्रंश किंवा डिमेन्शिया यामधलाच अलझायमर हा महत्त्वाचा प्रकार आहे. ५५ ते ६० वर्षे वयोगटानंतर होणारा हा सामान्य आजार आहे. जर्मन मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अलझायमर यांनी या आजारावर १९०६ मध्ये पहिल्यांदा प्रकाश पाडला होता. लहान मुलांना नवीन काहीतरी शिकण्याची उर्मी असते, मात्र अलझायमर झालेल्या वृद्धांच्या आयुष्यातील बहुतेक गोष्टी विस्मृतीत गेल्या असतात. अनेकदा घरची माणसे आणि नातेवाईकांचीही ओळख विसरलेली असते. सिनेमा आणि इतर गोष्टींमुळे या आजाराबाबत अनेक गैरसमज पसरले आहेत. पण आपल्या जवळच्या ज्येष्ठाला हा आजार जडला असेल तर गैरसमजातून त्रास बाळगू नका. या आजारावर उपचार नाही पण या रुग्णांची लहान मुलांप्रमाणे काळजी घेतल्यास त्याचे परिणाम मात्र कमी केले जाऊ शकतात.शहरातील मेंदूतज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी या अलझायमरबाबत जागृतीची आवश्यकता असल्याचे सांगितले. हा आजार अनेक महत्त्वाच्या लोकांना जडला आहे. त्यामुळे वृद्धत्व म्हणून याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. कारण जगात १२ टक्के लोकसंख्या ६० वर्षे वयोगटातील असून भारतातील ४० लक्ष लोक या आजाराने ग्रस्त आहेत. ५५ वर्षे वयोगटातील ज्येष्ठांना स्मृतिभ्रंश होण्याची शक्यता ०.५ टक्के आहे. मात्र दर पाच वर्षाने हे प्रमाण दुपटीने वाढत जाते. विशेष म्हणजे पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये हा आजार होण्याचे प्रमाण दीडपट अधिक आहे. जीवनशैलीच्या दोषामुळे हा आजार बळावला असून २०३० पर्यंत रुग्णांची संख्या दुपटीने वाढण्याची भीती आहे.अलझायमरचा दोष असणारे वृद्ध अनेकदा घरच्या मंडळींना किंवा नातेवाईकांना विसरतात. त्यामुळे बाहेरचे कुणी आले तर हे ज्येष्ठ जेवण मिळत नाही किंवा सोय होत नाही, असे सांगतात. त्यावेळी आपल्याला अपमानित झाल्यासारखे वाटते. मात्र तसे वाटून घेऊ नये किंवा भांबावून जाउ नये. आपल्या माणसाला हा आजार आहे, हे समजून घ्यावे. गैरसमज बाळगण्यापेक्षा आजाराबाबत समजून घेणे व संबंधित रुग्णाची काळजी घेणे हा सर्वोत्तम पर्याय आहे.लक्षणेआठवण विसरणे, घरचा रस्ता विसरणे, नवीन गोष्टी शिकण्यास अडचण येणे, परत परत तेच प्रश्न विचारणे, दिवसाचे, वेळेचे व जागेचे भान नसणे, रोजच्या लोकांचीही ओळख न पटणे, काम करण्यास व कपडे घालण्यास अडचण, व्यक्तिमत्त्वात बदल होण्यासह हेकेखोरपणा, हट्टीपणा, त्रासदायकपणा, चिडचिड होणे, वैचारिक बदल तसेच भाषेचा व विचारांचा अंदाज न येणे, आदी लक्षणे आढळून येतात.कारणे

  •  मेंदूचे न्यूरान किंवा माहिती पोहचविणाऱ्या पेशी कमी होतात व मेंदू आकुंचन पावतो.
  •  व्हॅस्कूलर डिमेन्शियामध्ये रक्तवाहिन्या बंद होतात.
  •  जीवनशैलीचे दोष, व्यायामाचा अभाव, वाचन कमी
  •  तरुणांमध्ये स्मृतिभ्रंश किंवा अलझायमरची शक्यता नाही. अनेकदा कामाचे टेन्शन, उदासीनता किंवा कामात एकाग्र नसल्यास विसरण्याची शक्यता असते. काही व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळेही विसराळूपणा येऊ शकतो. किंवा थायराईड, हायपोथायराईड असलेल्या रुग्णांना विसरण्याची शक्यता असते. मात्र हा प्रकार बरा होण्यासारखा आहे. त्यामुळे ५० वयोगटापूर्वी एखाद्याची सहज आठवण विसरत असेल तर तो अलझायमर असल्याचा गैरसमज बाळगू नये.

निदानरुग्णाच्या लक्षणावरून रक्ततपासणी करून, सिटी स्कॅन, एमआरआय करून कोणत्या प्रकारचा आहे हे समजते. हा आजार बरा होण्यासाठी औषधोपचार नाही. मात्र आजार वाढण्याची गती कमी करण्यासाठी औषध आहेत. त्यामुळे धोका कमी होऊ शकतो व रुग्णाला वाचविले जाऊ शकते.होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजीशारीरिक आणि बौद्धिक व्यायाम आवश्यक. नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा बाळगावी, कुतूहल व उत्सुकता बाळगावी. नवीन भाषा, एखादी कला असे जीवनभर काहीतरी शिकण्याचा उत्साह बाळगा. पुस्तके वाचा, कोडे सोडवा, गार्डनिंग, खेळ, सायकलिंग करा. डायबिटीज किंवा इतर आजार असल्यास योग्य औषधोपचार करा. व्यसनांपासून दूर रहा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे लोकांना भेटा व सामाजिक कार्यात सहभागी व्हा.नातेवाईकांनी घ्यावयाची काळजीअल्झायमर झालेला ज्येष्ठ हा लहान मुलासारखा असतो. त्यामुळे त्याची मुलाप्रमाणे काळजी घ्या. नात्यामध्ये संभ्रम केल्यास भांबावून जाऊ नका. रुग्णाला जागेचे भान राहत नसल्याने किचन, बाथरूममध्ये बोर्ड लावा. बाहेर जाताना सोबत जा किंवा शक्य नसल्यास त्यांच्या खिशामध्ये त्यांचे नाव, घरचा पत्ता, मोबाईल नंबर असलेली चिठ्ठी ठेवा. सिनेमामध्ये दाखविल्याप्रमाणे चुकीच्या संकल्पना बाळगू नका. काळजी घेणे हा सर्वोत्तम पर्याय आहे.

 

टॅग्स :Medicalवैद्यकीयHealthआरोग्य