शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना...
2
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
3
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
4
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
5
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
6
पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार?
7
"माझ्यावर हसतोय?" कुर्ल्यात तरुणावर चाकूनं सपासप वार, भररस्त्यात घडलेल्या घटनेनं खळबळ!
8
पुतिन-ट्रम्प यांची फोनवर चर्चा; युरेनियम रशियाला देण्याची ऑफर अमेरिकेने नाकारली! इराणचं टेन्शन वाढलं
9
अमेरिकेने भारताला परत केल्या ६५७ प्राचीन मूर्ती, अमूल्य ठेव्याची एवढी आहे किंमत 
10
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! उद्या शेअर बाजारात कामकाज होणार का? ट्रेडिंगपूर्वी चेक करा नवं हॉलिडे कॅलेंडर
11
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
12
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
13
खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव!
14
माचिसची काडी पेटवली अन् भडका उडाला, सिलेंडरच्या स्फोटात कुटुंबातील ७ जण होरपळले
15
काय म्हणावं आता! लग्नात इतक्या जोरात डीजे वाजवला की १४० कोंबड्या मेल्या; मालक चिडला अन्...
16
Sonam Raghuvanshi : “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी
17
कर्ज फेडलं पण आता डूख धरून बसला पाकिस्तान; दुबईचा बदला घेणार, 'या' गर्भश्रीमंतला अटक करण्याची तयारी 
18
पुष्टिपती विनायक जयंती २०२६: नववर्षातील बाप्पाचा पहिला जन्मोत्सव; ‘या’ अवताराची कथा माहितीये का?
19
जिनिलियाने उलगडली 'राजा शिवाजी'च्या निर्मितीमागची गोष्ट; म्हणाली, "तडजोड केली नाही..."
20
सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी...
Daily Top 2Weekly Top 5

अर्जुन परतला जगण्याची शिदोरी घेऊन

By admin | Updated: April 10, 2016 03:17 IST

सहा वर्षापूर्वी ११ वर्षाचा एक मुलगा, मुंबईच्या रेल्वेस्थानकावर समतोल फाऊंडेशनच्या सदस्यांना सापडला.

मंगेश व्यवहारे नागपूरसहा वर्षापूर्वी ११ वर्षाचा एक मुलगा, मुंबईच्या रेल्वेस्थानकावर समतोल फाऊंडेशनच्या सदस्यांना सापडला. घरातून पळून तो मुंबईत आला होता. रेल्वेस्थानकावरील मुलांसोबत राहून व्यसनांच्या आहारी गेला होता. या मुलाला नागपुरातील प्लॅटफॉर्म ज्ञानमंदिरात आणण्यात आले. अंगावर मळकट फाटके कपडे, केस विसकटलेले, बालपणीच आयुष्य हरविल्यागत तो होता. प्लॅटफॉर्म ज्ञानमंदिरमध्ये त्याच्यावर अध्ययनाबरोबर आचार-विचारांचे संस्कार झाले. आपल्या आयुष्याची सहा वर्ष त्याने येथे घालविली. येथे तो स्वत:च्या आयुष्याबद्दल जबाबदार झाला. शिक्षण घेऊन सुसंस्कृत झाला. एक जबाबदार, संवेदनशील नागरिक म्हणून तो आज आपल्या घराकडे परतला आहे. जे संस्कार आई-वडिलांनी त्याच्यावर करायचे होते, ते प्लॅटफॉर्म ज्ञानमंदिरातून त्याच्यावर झाले आणि त्याचे आयुष्य पुन्हा रुळावर आले. झारखंड येथील रहिवासी अर्जुन चौधरी असे त्याचे नाव. ११ वर्षाचा असताना अर्जुनने घरातून १०० रुपये घेऊन पळ काढला होता. मुंबईच्या प्लॅटफॉर्मवर मुलांसोबत भटकत असताना तो समतोल फाऊंडेशनला सापडला. फाऊंडेशनने त्याला लोहमार्ग पोलिसांच्या मदतीने नागपुरातील प्लॅटफॉर्म ज्ञानमंदिरात आणले. अतिशय जिद्दी आणि चिडखोर स्वभावाच्या अर्जुनला कशाचीही भ्रांत नव्हती. शिक्षणात तर त्याचे मनच रमत नव्हते. व्यसनांच्या आहारी गेल्याने त्याची मानसिकता ढासळलेली होती. आई-वडिलांबद्दल त्याची तसूभरही आस्था नव्हती. अशा अवस्थेत प्लॅटफॉर्म शाळेने त्याला सांभाळले. त्याची मानसिकता बदलविण्यासाठी समुपदेशन केले. त्याच्यावर आचार-विचारांचे संस्कार केले. त्याचे लक्ष विचलित करण्यासाठी त्याला खेळाकडे प्रवृत्त केले. हळूहळू तो इतर मुलांमध्ये रमला. त्याचे बोलणे, राहणे, वागणे यावर लक्ष केंद्रित केले. त्याच्यातील होत असलेले बदल लक्षात घेऊन, त्याला भविष्याची समज दिली. अध्ययनाकडे त्याच्यात आवड निर्माण केली. त्याला शाळेत दाखला मिळवून दिला. हळूहळू त्याच्या स्वभावात परिवर्तन झाले. तो नियमित शाळेत जायला लागला, अभ्यास करायला लागला. दहावीत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला. अर्जुन आज अकरावीत शिकतो आहे. आज तो जबाबदार, संस्कारीत झाला आहे. सहा वर्षे तो शाळेत शिकत असताना ज्ञानमंदिराच्या प्रकल्प प्रमुखांनी त्याच्या आई-वडिलांशी त्याची भेट करून दिली. अर्जुन लहानपणापासून त्याच्या मोठ्या वडिलांकडे राहत होता. त्यांचा थकता काळ असल्याने, अर्जुनला त्यांनी परत गावी बोलाविले आहे. अर्जुनलाही आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला आहे. यापुढे आईवडिलांचा भविष्याचा आधार बनण्याचा संकल्प करून तो शनिवारी