शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
2
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
3
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
4
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
5
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
6
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
7
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
8
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
9
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
10
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
11
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
12
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
13
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
14
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
15
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
16
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
17
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
18
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
19
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
20
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..

सहकारी बँकेच्या दोषी संचालकांवर कारवाई करा!

By admin | Updated: June 1, 2014 00:58 IST

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या शेकडो कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराबद्दल तत्कालीन संचालक व अधिकार्‍यांना दोषी धरण्याच्या सहकार खात्याच्या अहवालामुळे आपण विधिमंडळात मांडलेला हा गैरव्यवहार सिद्ध

राज्य सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरण :   देवेंद्र फडणवीस यांची मागणी नागपूर :  महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या शेकडो कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराबद्दल तत्कालीन  संचालक व अधिकार्‍यांना दोषी धरण्याच्या सहकार खात्याच्या अहवालामुळे आपण  विधिमंडळात मांडलेला हा गैरव्यवहार सिद्ध झाला आहे. या प्रकरणातील दोषींवर सहकार  कायद्याच्या कलम ८८ (३) नुसार गुन्हा दाखल करून फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी  भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केली. सहकार खात्याने दोषी ठरवलेल्यांमध्ये राज्य सरकारमधील विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या  नेत्यांचा समावेश आहे. सरकारी यंत्रणेने कोणत्याही दबावाला बळी पडू नये व या प्रकरणी  निर्भिडपणे कारवाई करावी, अशीही मागणी फडणवीस यांनी केली. राज्य सहकारी बँकेतील गैरव्यवहार देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात १९ एप्रिल २0११ रोजी  सर्वप्रथम मांडला होता. त्यावेळी त्यांना पुरावे सादर करून आरोप सिद्ध केले होते. सरकारने  तातडीने संचालक मंडळ हटवले नाही व कारवाई केली नाही तर वर्षभरात ही संस्था बँकेचा दर्जाही  गमावून बसेल, अशी भीती त्यावेळी आपण व्यक्त केली होती. संचालकांनी घरातीलच लोकांच्या  नावे कंपन्या उघडून विनातारण कर्ज घेतले आहे. चेअरमन व उपाध्यक्ष यांच्यासाठी घेतलेल्या  गाड्यांना विशेष नंबर मिळावे म्हणून सुमारे एक लाख रुपये उधळण्यात आले. २0१0 साली बँक  नफ्यात असल्याचे राज्यभर सांगण्यात आले. पण प्रत्यक्षात तूट कमी दाखविण्यासाठी बँकेने ७७८  कोटी रुपयांची तरतूद केली नव्हती. बँकेने सहकारी साखर कारखाने व सूतगिरण्यांना दिलेले कर्ज  ७५ टक्क्यांच्यावर थकीत आहे, असे अनेक गंभीर मुद्दे त्यावेळी आपण निदर्शनास आणले होते. मोठे आर्थिक नुकसान झाल्यामुळे २0११ मध्ये या बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून  प्रशासकाची नेमणूक करण्यात आली होती. या प्रकरणी चौकशी अधिकार्‍याचा अहवाल आता  समोर आला असून त्यांनी तत्कालीन संचालक मंडळामुळे बँकेचे नुकसान झाले असल्याचा स्पष्ट  निष्कर्ष काढला आहे. बँकेच्या आर्थिक तोट्यांची संचालकांवरील जबाबदारी निश्‍चित करण्यासाठी कलम ८८ नुसार  चौकशी करण्याचा आदेश सहकार आयुक्तांनी काढला आहे. सहकार खात्याच्या चौकशी  अहवालामुळे व संचालकांवर जबाबदारी निश्‍चित करण्याच्या निर्णयामुळे बँकेच्या संचालक  मंडळावर केलेले आरोप पुन्हा सिद्ध झाले असल्याचे आ. फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.   (प्रतिनिधी)