शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
2
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
6
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
7
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
8
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
9
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
10
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
11
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
12
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
13
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
14
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
15
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
16
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
17
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
18
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
19
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
20
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!

मराठा-कुणबी प्रमाणे भटक्या विमुक्तांची जनगणना करा; बेलदार समाज संघर्ष समितीचे मागासवर्ग आयोगाला निवेदन 

By मंगेश व्यवहारे | Updated: January 29, 2024 12:13 IST

केंद्र सरकारने इदाते आयोगाच्या शिफारशीनुसार १८ ऑगस्ट २०२० रोजी पत्र पाठवून भटक्या विमुक्तांची स्वतंत्र जनगणना करण्याचे राज्य शासनाला कळविले होते.

नागपूर : राज्यात सुरु असलेल्या मराठा-कुणबी जनगणना सर्वेक्षणात भटक्या विमुक्तांची सुध्दा जनगणना करावी, अशी मागणी बेलदार समाज संघर्ष समितीने राज्य मागासवर्ग आयोगाकडे केली आहे. रविभवन नागपूर येथे राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य ॲड. चंदालाल मेश्राम शासकीय दौऱ्यावर आले होते. त्यावेळी बेलदार समाज संघर्ष समितीतर्फे प्रदेश अध्यक्ष राजेंद्र बढिये यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन चर्चा केली.

केंद्र सरकारने इदाते आयोगाच्या शिफारशीनुसार १८ ऑगस्ट २०२० रोजी पत्र पाठवून भटक्या विमुक्तांची स्वतंत्र जनगणना करण्याचे राज्य शासनाला कळविले होते. मात्र यद्यापही भटक्या विमुक्तांची जनगणना करण्यात आली नाही. त्यामुळे मराठा-कुणबी जनगणना सर्वेक्षणासोबतच भटक्या विमुक्तांची जनगणना करण्याची मागणी त्यांनी केली.  यावर राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य ॲड. चंदालाल मेश्राम यांनी सांगितले की, भटक्या विमुक्तांच्या जनगणना सर्वेक्षणाचा अहवाल आयोगाने भारत सरकारला पाठवला पण भारत सरकारने त्यावर पैसे व काही उत्तर पाठवले नाही. त्यामुळे भटक्या विमुक्तांची जनगणना थांबली असल्याचे सांगितले.  समाज संघटनेसोबतच लोकप्रतिनिधींनी राज्य व केंद्र सरकारकडे त्यासंदर्भात पाठपुरावा करावा, असा सल्ला त्यांनी दिला.  याप्रसंगी बेलदार समाज संघर्ष समितीचे मिलिंद वानखेडे,  खिमेश बढिये,  मुकुंद अडेवार, प्रेमचंद राठोड, दिनेश गेटमे,  भिमराव शिंदे,  किशोर सायगन यांच्या समवेत भटक्या विमुक्त चळवळीतील कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :nagpurनागपूर