शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
3
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
4
अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवरही पाकिस्तान बॅन? भारताचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्पष्ट आदेश, यापुढे..
5
"मित्रा, भारतात ॲपलचं उत्पादन करू नकोस"; डोनाल्ड ट्रम्प यांचा टीम कूकना सल्ला... काय आहे नेमका मुद्दा?
6
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला
7
"अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत..." ; मरियम सोलेमानाखिल यांनी पाकिस्तासोबतच्या संबंधावर भाष्य केले
8
Purnam Kumar Shaw : "डोळ्यावर पट्टी बांधून नेलं, टॉर्चर केलं..."; पाकिस्तानातून परतलेल्या BSF जवानाची आपबीती
9
३५ चेंडूत शतक झळकवणारा वैभव सूर्यवंशी दहावीत नापास झाला?; व्हायरल दाव्याचं सत्य जाणून घ्या
10
'पाकिस्तानचा अणुबॉम्ब IAEA च्या देखरेखीखाली आणावा', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी
11
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
12
एका झटक्यात सोनं २ हजार रुपयांपेक्षा अधिक झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; काय आहेत नवे दर?
13
पिता न तू वैरी! किन्नर म्हणत पोटच्या मुलीचा जीव घेतला, नंतर पत्नीच्या पायावर डोकं ठेवत म्हणाला...
14
पाकिस्तानशी यारी, तुर्की-अझरबैजानला पडणार भारी; भारतीयांनी अख्खा बाजार उठवला
15
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
16
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं
17
Rajnath Singh : "पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारुन मारलं, आम्ही त्यांचं कर्म पाहून त्यांना अद्दल घडवली"
18
दिल्ली कॅपिटल्सनं ६ कोटींचा डाव लावला त्यानं दुबईचं फ्लाइट पकडलं! PSL कनेक्शनमुळे तो IPL ला मुकणार?
19
५० हजार पगार, घराचे स्वप्न पूर्ण होईल का? की भाड्यानेच राहणे परवडेल...; असं आहे सोपं गणित
20
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं

स्वरगुंजन : मैं हवा हुँ कहाँ वतन मेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 00:17 IST

नागपूर आकाशवाणी केंद्रातर्फे अभिजात प्रतिभावान गायकांच्या गीत-गजल गायनाच्या ‘स्वरगुंजन’ या कार्यक्रमाचे आयोजन लक्ष्मीनगर येथील सायंटिफिक सभागृहात उत्साहात पार पडले.

ठळक मुद्देआकाशवाणी नागपूरतर्फे ‘गीत-गजल मैफिल’

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रतिभेचे वरदान लाभलेल्या कलाकारांनी निर्माण केलेले कलाविश्व हा रसिक मनाचा उत्सवच असतो. प्रसार भारती, नागपूर आकाशवाणी केंद्रातर्फे अशाच अभिजात प्रतिभावान गायकांच्या गीत-गजल गायनाच्या ‘स्वरगुंजन’ या कार्यक्रमाचे आयोजन लक्ष्मीनगर येथील सायंटिफिक सभागृहात उत्साहात पार पडले. अविरत बरसणाऱ्या शितल पाऊस धारा आणि श्रोत्यांच्या कानामनाला रोमांचित करणाऱ्या अर्थभावपूर्ण संगीत शलाका, असा हा अनुभव होता.कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्र प्रमुख (अभियांत्रिकी) प्रवीण कुमार कावडे, सहा संचालक डॉ. हरीश पाराशर, संगीत विभाग कार्यक्रम अधिकारी प्रकाश आत्राम, कार्यक्रम अधिकारी मृणालिनी शर्मा, माजी केंद्र संचालक गुणवंत थोरात, माजी सहायक संचालक चंद्रमणी बेसेकर यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात भोपाळ येथील कीर्ती सूद या मधूर आवाजाच्या गायिकेच्या गायनाने झाली. अंगभूत गायन क्षमता, विलक्षण दाणेदार स्वर व भावपूर्ण आवाज अशा वैशिष्ट्यांचे हे गायन होते. गायिकेने सुरुवातीला ‘काहे को बिसारा हरिनाम’ हे भजन सादर केले. यानंतर, सध्याच्या वातावरणाला अनुरूप असे गीत ‘बरसो मेरो द्वारे मेघा..’ व ‘तुम को चाहा तो खता क्या है’ व ‘लगता नहीं है दिल मेरा उजडे दयार में’ अशा खास लोकप्रिय गजल सादर करून, त्यांनी श्रोत्यांना जिंकले.यानंतर, मूळ इम्फाल येथील व सध्या नागपूर निवासी ख्यातनाम गजल गायिका लीना चॅटर्जी यांच्या अप्रतिम गायनाने श्रोत्यांशी हृदयी संवाद साधला. नाद सुरांच्या उद्यानात सहज विहार करण्याची दैवी प्रतिभा, लाजवाब शब्दस्वर विभ्रम, भावस्पर्शी गजलचे घरंदाज सादरीकरण असे हे मधूर गजल गायन होते. ‘हाये लोगो की करम फरमाईंयाँ बदनामियाँ मोहोबते रुसवाईयाँ’, ‘दिल के हर वक्त तस्सली का गुमा होता है, दर्द तो होता है मग जाने कहाँ होता है’, ‘मुझसे कितने राज है बतलाऊ क्या’ अशा या श्रुतीमधूर गजल होत्या.तद्नंतर, श्रोत्यांच्या खास प्रतीक्षा व अपेक्षेचे असे आंतरराष्ट्रीय कीर्ती प्राप्त गजल गायक बंधू उस्ताद अहमद हुसैन व उस्ताद मोहम्मद हुसैन, जयपूर यांच्या गायनाने अवघी मैफिल झळाळून गेली. मधाळ स्वर, गजलचे गहिरे शब्द व स्वर विभ्रमही गेहरा, सुरेल गमत व गळ्याला शास्त्रीय स्वरांचे रेशमी अस्तर, अशी ही अनुभूती होती. ‘उनसे कहने की जरूरत क्या है, मेरी ख्वाबोंकी हकिकत क्या है’, ‘मैं हवा हुँ कहाँ वतन मेरा, मौसम आऐंगे जाऐंगे हम तुम्हे भूला न पाऐंगे’ अशा सारख्या या सदाबहार गजल होत्या. प्रत्येक गजलच्या अर्थभावासह या गायकांनी सादर केलेला दिलकश शेर लाजवाब होता. तबल्यावर संदेश पोपटकर, राम खडसे, संवादिनीवर संदीप गुरमुले, व्हायोलिनवर शिरीष भालेराव, की-बोर्डवर आर.एफ. लतिफ, सतारवर अवनिंद्र शेवलिकर व उस्ताद नासिर खान यांनी साथसंगत केली. राधिका पात्रीकर व रिमा चढ्ढा यांनी निवेदनातून कार्यक्रमाची रंगत वाढविली. श्रोत्यांचा उत्स्फूर्त व भरगच्च प्रतिसाद यावेळी मिळाला. एकूण, हुसैन बंधूंच्या गायनाने या मैफिलीला चार चाँद लागले.

टॅग्स :musicसंगीतnagpurनागपूर