शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

स्वप्निल व श्रेयसची लोकमतला सदिच्छा भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 11:07 IST

गेल्या काही वर्षांत मराठी चित्रपटसृष्टीने दमदार कथानकाची अनुभूती चोखंदळ रसिकांना करून दिली आहे. त्यामुळे हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गजही आता मराठीकडे वळले आहे, असे मत अभिनेते स्वप्निल जोशी यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देमराठी चित्रपटांचे कथानक दर्जेदार

मंगेश व्यवहारे/अंकिता देशकर ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मराठी रसिक हे चोखंदळ आहेत. त्यामुळे मराठी चित्रपट केवळ अभिनेते अथवा अभिनेत्रीवर चालत नाही. मराठी रसिकांना आनंद देण्यासाठी दमदार कथानकाची आवश्यकता आहे. गेल्या काही वर्षांत मराठी चित्रपटसृष्टीने दमदार कथानकाची अनुभूती चोखंदळ रसिकांना करून दिली आहे. त्यामुळे हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गजही आता मराठीकडे वळले आहे, असे मत अभिनेते स्वप्निल जोशी यांनी व्यक्त केले.दिग्दर्शक श्रेयस जाधव यांच्या ‘मी पण सचिन’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ते नागपुरात आले असता त्यांनी लोकमतला सदिच्छा भेट दिली. खेळ या क्षेत्रावर मराठीत ‘मी पण सचिन’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट सचिन तेंडुलकर यांच्या चाहत्यावर आधारित आहे. त्या चाहत्याचे स्वप्न लॉर्डस्च्या मैदानावर खेळण्याचे आहे. या फॅन्सचा प्रवास आणि त्यात आलेले संघर्ष आणि आनंदाचे क्षण यावर तो चित्रपट चित्रित केला आहे. खेळावर मराठीतील हा पहिलाच चित्रपट असल्याचे स्वप्निल म्हणाले. चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेल्या स्वप्निलने चित्रपटासाठी विशेष मेहनत घेतली आहे. त्यासाठी त्याने १३ किलो वजन कमी केले आहे. मराठी आणि हिंदी चित्रपटाची तुलना कशी कराल, याविषयी स्वप्निल म्हणाले की, केवळ चित्रपटाचे बजेट सोडल्यास काहीच फरक नसतो. मराठी चित्रपट हा कमी बजेटमध्ये बनत असल्याने सोबतच चांगले कथानक पुढे येत असल्याने हिंदी चित्रपटातील दिग्दर्शक, अभिनेते आता मराठी चित्रपटात रस घेऊ लागले आहेत.‘मी पण सचिन’ या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक असलेले श्रेयस जाधव हे मूळचे नागपूरचे आहेत. त्यांनी व्यावसायिक क्रिकेट खेळले आहे. सध्या ते चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. क्रिकेटची आवड असल्यामुळे त्यांनी या चित्रपटाची निर्मिती केली. पहिलाच चित्रपट असतानाही स्वप्निलसारख्या दर्जेदार कलावंतांनी त्यात मुख्य भूमिका साकारल्याचा आनंद श्रेयसने व्यक्त केला. पुण्यातील भोर येथे चित्रपटाचे शुटींग झाले आहे. २० मिनिटांची क्रिकेट मॅच यात दाखविली आहे.१ फेब्रुवारीला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे डायलॉग अजिता काळे यांनी लिहिले आहे. चित्रपटात स्वप्निल जोशी यांच्यासोबत अभिजित खांडेकर, प्रियदर्शन जाधव, कल्याणी मुळे, अविनाश नारकर, अनुजा साठे आणि सुहिता थेट्टे आहे.

टॅग्स :Swapnil Joshiस्वप्निल जोशी