शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

स्वच्छ भारत अभियानात जिल्ह्याला ३,८५१ शौचालयाचे टार्गेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:08 IST

नागपूर : स्वच्छ भारत अभियानाचा दुसरा टप्पा २०२० पासून सुरू झाला आहे. दुसऱ्या टप्प्यातील पाच वर्षांच्या या अभियानात ...

नागपूर : स्वच्छ भारत अभियानाचा दुसरा टप्पा २०२० पासून सुरू झाला आहे. दुसऱ्या टप्प्यातील पाच वर्षांच्या या अभियानात नागपूर जिल्ह्याला २५ हजार शौचालयाचे टार्गेट दिले आहे. त्यातून २०२०-२१ या वर्षात ३,८५१ शौचालयाचे काम पूर्ण करायचे होते. या आर्थिक सत्रातील शेवटचा महिना सुरू असून, अद्यापपर्यंत १२६१ कामे अजूनही शिल्लक आहेत.

विशेष म्हणजे २०१४ ते २०१९ या कालावधीत पार पडलेल्या स्वच्छ भारत अभियानाच्या पहिल्या टप्प्यात नागपूर जिल्ह्यात १ लाख २५ हजार शौचालयाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यानंतर आता स्वच्छ भारत अभियानाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. या दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्याला ३८५१ शौचालय निर्मितीचे उद्दिष्ट देण्यात आले असून, त्यापैकी २,५९० शौचालयांची निर्मितीही झाली आहे. केंद्र सरकारने या अभियानात शौचालयाच्या बांधकामाबरोबरच सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची जोड दिली आहे. यावर्षीच्या टार्गेटमधील शिल्लक असलेली कामे पूर्णत्वास होण्याच्या मार्गावर आहेत. मार्चच्या अखेरपर्यंत हे टार्गेट नक्कीच पूर्ण होईल, असा विश्वास जि.प.च्या पाणी व स्वच्छता मिशन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल किटे यांनी व्यक्त केला.

- शौचालय न बांधल्यास दंडात्मक कारवाई

१५ मार्च २०२१ पर्यंत शौचालय बांधकाम झाल्यास प्रोत्साहनपर १२ हजार अनुदानाचा लाभ मिळेल. शौचालय बांधकामास सुरुवात न केल्यास दंडात्मक कारवाई करण्यासोबतच शासनाकडून मिळत असलेल्या योजनेचा लाभही मिळणार नाही, असे पत्र बीडीओ, तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांच्या संयुक्त स्वाक्षरीने काढण्यात आले आहे.

- तालुकानिहाय लक्ष्यांक

तालुका एकूण उद्दिष्ट साध्य शिल्लक

भिवापूर ४३८ २३९ १९९

हिंगणा १०२ ६९ ३३

कळमेश्वर ४२८ २४७ १८१

कामठी ३०४ २४० ६४

काटोल १४६ १०४ ४२

कुही २८० १८२ ९८

मौदा ४४६ ३७६ ७०

नागपूर (ग्रा.) १५५ १२७ २८

नरखेड ४३८ २८९ १४९

पारशिवनी ३१५ १६९ १४६

रामटेक ४२५ २५० १७५

सावनेर २१६ १६४ ५२

उमरेड १५८ १३४ २४