शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

विषमुक्त खाद्यान्नासाठी सेंद्रिय शेती शाश्वत पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 9:17 PM

पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत पार पडलेल्या सेंद्रीय शेती जागतिक परिषदेचा समारोप मंगळवारी झाला. जगभरातील विषमुक्त खाद्यान्नावर सेंद्रीय शेती हाच शाश्वत पर्याय ठरू शकतो.त्यासाठी विदेशातील कृषी विभाग, निमशासकीय संस्था यांनी एकत्र कार्य करावे , असे आवाहन करण्यात आले.

ठळक मुद्देजागतिक परिषदेमध्ये एकमत : देशभारतील २७५ शास्त्रज्ञांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत पार पडलेल्या सेंद्रीय शेती जागतिक परिषदेचा समारोप मंगळवारी झाला. जगभरातील विषमुक्त खाद्यान्नावर सेंद्रीय शेती हाच शाश्वत पर्याय ठरू शकतो. त्यासाठी विदेशातील कृषी विभाग, निमशासकीय संस्था यांनी एकत्र कार्य करावे. तसेच विदेशात सेंद्रीय शेतीमध्ये कार्यरत असणाऱ्या संस्थांसोबत समन्वय ठेवावा, असे आवाहन करण्यात आले.या तीन दिवसीय परिषदेमध्ये पाच देशाचे शास्त्रज्ञ तसेच भारतातील २७५ शास्त्रज्ञांनी भाग घेतला. संशोधकांनी सेंद्रीय शेतीचे संशोधन आणि अनुभव सादर केले. परिषदेचा समारोप १७ सप्टेंबरला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डॉ. बी. एम. भाले, अपेडाचे संचालक डॉ. ए. के. यादव, माफसुचे कुलगुरू डॉ. आशिष पातूरकर, संचालक विस्तार शिक्षण डॉ. डी. एम. मानकर, संचालक डॉ. डी. पी. वासकर, तसेच स्वित्झर्लंडचे डॉ. अमरितबीर रायर, डॉ. चारू जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.डॉ. व्ही. एम. भाले यांनी अकोला विद्यापीठाचे सेंद्रीय शेतीमधील कार्य नमूद केले. ही परिषद विषमुक्त शेतीच्या दिशेने पहिले यशस्वी पाउल असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. पातुरकर यांनी, सेंद्रिय पध्दतीने केल्यास जनावरांना पशुखाद्य सुध्दा सेंद्रीय मिळतील आणि पशु उत्पादने सुध्दा विषमुक्त उपलब्ध होतील असे नमूद केले.याप्रसंगी विविध देशातील तसेच राज्यातील संशोधकांना उत्कृष्ट कार्य आणि सादरीकरणासाठी सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी आयोजन समितीचे सचिव डॉ. ए. एन. पासलावार, डॉ. व्ही. एस. खवले, डॉ. एस. आर. पोटदुखे, कोषाध्यक्ष डॉ. शांती पाटील तसेच डॉ. पी. आर. कडू, डॉ. डी. एम. पंचभाई आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :agricultureशेतीorganic vegetablesसेंद्रिय भाज्या