शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

नागपूरच्या दुकानदाराचा संशयास्पद मृत्यू

By admin | Updated: October 22, 2014 00:57 IST

शहरात सायकल दुरुस्तीचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यक्तीचा यवतमाळ जिल्ह्यात संशयास्पद मृत्यू झाला. या व्यक्तीच्या हत्येचा आरोप असलेल्या पती, पत्नी व मुलाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर

हायकोर्ट : यवतमाळ जिल्ह्यातील घटना, तिघे निर्दोषनागपूर : शहरात सायकल दुरुस्तीचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यक्तीचा यवतमाळ जिल्ह्यात संशयास्पद मृत्यू झाला. या व्यक्तीच्या हत्येचा आरोप असलेल्या पती, पत्नी व मुलाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निर्दोष ठरविले आहे.नरेश महादेव भगत (५५), नंदा नरेश भगत (४५) व विशाल नरेश भगत (२३) अशी आरोपींची नावे असून ते आमसेट, ता. दारव्हा येथील रहिवासी आहेत. मृताचे नाव मनोहर होते. आरोपी नरेश नागपुरात सायकल रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. तो मनोहरच्या दुकानात सायकल रिक्षा दुरुस्त करण्यासाठी जात होता. यामुळे दोघांची घट्ट मैत्री झाली होती. मनोहर नरेशच्या घरी जात होता. दरम्यान, मनोहर व नंदाचे अनैतिक संबंध निर्माण झाले. परिणामी नरेश पत्नी व मुलासह गावात परतून वडिलोपार्जित शेती वाहायला लागला. यानंतरही मनोहरचे नंदासोबतचे संबंध कायम होते. तो आमसेटमध्ये येऊन नंदाला भेटत होता. तिच्या घरी मुक्काम करीत होता. नरेशने मनोहरला अनेकदा समजावले, पण तो मानला नाही. यामुळे मनोहरची हत्या करण्यात आली, असे सरकारी पक्षाचे म्हणणे होते. १८ जुलै २००९ रोजी मनोहर आरोपीच्या घरी गेला होता. त्याच दिवशी मध्यरात्रीनंतर त्याचा मृतदेह आढळून आला. मनोहरची पत्नी निर्मलाने १३ आॅगस्ट रोजी लाडखेड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून आरोपींवर हत्येचा संशय व्यक्त केला होता. दारव्हा सत्र न्यायालयाने २७ एप्रिल २०१२ रोजी तिन्ही आरोपींना भादंविच्या कलम ३०२ (हत्या) अंतर्गत आजन्म कारावास व ३००० रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली होती. याविरुद्ध आरोपींनी उच्च न्यायालयात अपील केले होते. न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व विनय देशपांडे यांनी सत्र न्यायालयाचा निर्णय रद्द करून आरोपींना निर्दोष सोडण्याचे निर्देश दिलेत. मनोहरची विजेचा शॉक देऊन हत्या झाल्याचा दावा सरकारी पक्षाने केला होता. परंतु, रासायनिक अहवालात ही बाब स्पष्ट झाली नाही. तसेच, मनोहरला आरोपींनी विजेचा धक्का दिल्याचे सरकारी पक्षाला सिद्ध करता आले नाही. निर्मलाने सुमारे एक महिना विलंबाने तक्रार नोंदविली. या विलंबाचे कारणही स्पष्ट करण्यात आले नाही. उच्च न्यायालयाने निर्णय देताना यासह विविध बाबी लक्षात घेतल्या.(प्रतिनिधी)