शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
5
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
6
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
7
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
8
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
9
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
10
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
11
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
12
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
13
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
14
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
15
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
16
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
17
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
18
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
19
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
20
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...

नागपूरच्या दुकानदाराचा संशयास्पद मृत्यू

By admin | Updated: October 22, 2014 00:57 IST

शहरात सायकल दुरुस्तीचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यक्तीचा यवतमाळ जिल्ह्यात संशयास्पद मृत्यू झाला. या व्यक्तीच्या हत्येचा आरोप असलेल्या पती, पत्नी व मुलाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर

हायकोर्ट : यवतमाळ जिल्ह्यातील घटना, तिघे निर्दोषनागपूर : शहरात सायकल दुरुस्तीचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यक्तीचा यवतमाळ जिल्ह्यात संशयास्पद मृत्यू झाला. या व्यक्तीच्या हत्येचा आरोप असलेल्या पती, पत्नी व मुलाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निर्दोष ठरविले आहे.नरेश महादेव भगत (५५), नंदा नरेश भगत (४५) व विशाल नरेश भगत (२३) अशी आरोपींची नावे असून ते आमसेट, ता. दारव्हा येथील रहिवासी आहेत. मृताचे नाव मनोहर होते. आरोपी नरेश नागपुरात सायकल रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. तो मनोहरच्या दुकानात सायकल रिक्षा दुरुस्त करण्यासाठी जात होता. यामुळे दोघांची घट्ट मैत्री झाली होती. मनोहर नरेशच्या घरी जात होता. दरम्यान, मनोहर व नंदाचे अनैतिक संबंध निर्माण झाले. परिणामी नरेश पत्नी व मुलासह गावात परतून वडिलोपार्जित शेती वाहायला लागला. यानंतरही मनोहरचे नंदासोबतचे संबंध कायम होते. तो आमसेटमध्ये येऊन नंदाला भेटत होता. तिच्या घरी मुक्काम करीत होता. नरेशने मनोहरला अनेकदा समजावले, पण तो मानला नाही. यामुळे मनोहरची हत्या करण्यात आली, असे सरकारी पक्षाचे म्हणणे होते. १८ जुलै २००९ रोजी मनोहर आरोपीच्या घरी गेला होता. त्याच दिवशी मध्यरात्रीनंतर त्याचा मृतदेह आढळून आला. मनोहरची पत्नी निर्मलाने १३ आॅगस्ट रोजी लाडखेड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून आरोपींवर हत्येचा संशय व्यक्त केला होता. दारव्हा सत्र न्यायालयाने २७ एप्रिल २०१२ रोजी तिन्ही आरोपींना भादंविच्या कलम ३०२ (हत्या) अंतर्गत आजन्म कारावास व ३००० रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली होती. याविरुद्ध आरोपींनी उच्च न्यायालयात अपील केले होते. न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व विनय देशपांडे यांनी सत्र न्यायालयाचा निर्णय रद्द करून आरोपींना निर्दोष सोडण्याचे निर्देश दिलेत. मनोहरची विजेचा शॉक देऊन हत्या झाल्याचा दावा सरकारी पक्षाने केला होता. परंतु, रासायनिक अहवालात ही बाब स्पष्ट झाली नाही. तसेच, मनोहरला आरोपींनी विजेचा धक्का दिल्याचे सरकारी पक्षाला सिद्ध करता आले नाही. निर्मलाने सुमारे एक महिना विलंबाने तक्रार नोंदविली. या विलंबाचे कारणही स्पष्ट करण्यात आले नाही. उच्च न्यायालयाने निर्णय देताना यासह विविध बाबी लक्षात घेतल्या.(प्रतिनिधी)