शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

टंकलेखन परीक्षेत बाेगसगिरीचा संशय, शहरापासून २५ किमी दूर परीक्षा केंद्र कसे?

By निशांत वानखेडे | Updated: June 11, 2024 18:18 IST

संघर्ष समितीचा आराेप : सुविधा नसल्याने पाेहचण्यास शेकडाे विद्यार्थ्यांना मनस्ताप

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : संगणक टंकलेखन (टायपिंग) परीक्षेसाठी आवश्यक सुविधा असलेले अनेक केंद्र नागपूर शहरात असताना येथील विद्यार्थ्यांना शहरापासून २५ किलाेमीटर दूरचे केंद्र देण्यावर आक्षेप घेतला जात आहे. केंद्रावर पाेहचण्यास सुविधा नसल्याने शेकडाे विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. केवळ गैरप्रकार करण्यासाठी असे केंद्र देण्यात आल्याचा आराेप महाराष्ट्र राज्य संगणक टायपिंग संघर्ष समितीने केला आहे.

राज्यात विविध अस्थापनांच्या क्लरिकल पदांसाठी टंकलेखन पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र आवश्यक असते. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणेच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात सध्या दाेन सत्रात संगणक टंकलेखन प्रमाणपत्र परीक्षा घेण्यात येत आहे. इंग्रजी टायपिंगसाठी १० ते १४ जून या कालावधीत आणि मराठी, हिंदी टायपिंग प्रमाणपत्र परीक्षा १८ ते २० जून या कालावधीत घेण्यात येत आहे. नागपूर जिल्ह्यातून ८ ते १० हजार विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत. त्यासाठी तालुकास्तरावर प्रत्येकी एक केंद्र आहेत. नागपूर शहरात आदर्श हायस्कूल, श्रीकृष्णनगर आणि विदर्भ बुनियादी हायस्कूल, सक्करदरा असे दाेन केंद्र आहेत. मात्र शहरातील शेकडाे विद्यार्थ्यांना २५ किमी दूर आठवामैल, दृगधामना येथील श्री साई ताज पाॅलिटेक्निक काॅलेजचे सेंटर देण्यात आले आहे. टायपिंग इन्स्टिट्यूटच्या जवळच परीक्षा केंद्र असताना असे डाेंगराळ अनिवासी परिसरात परीक्षा केंद्र का दिले, असा प्रश्न संघर्ष समितीचे अध्यक्ष दिनेश हरणे यांनी उपस्थित केला.

हरणे यांनी सांगितले, श्री साई पॉलीटेक्निक कॉलेज परिसरात नागरी वसाहत नाही, अतिशय खराब रस्ता, तसेंच एसटी बस/शहर स्टार बस पोहचत नाही. अशा डोंगराळ परिसरात परीक्षा केंद्र निवड करण्याचा हेतू काय, असा सवाल त्यांनी केला. परीक्षार्थींना मनस्ताप सहन करावा लागताे. या केंद्रावर भरारी पथकही वेळेवर पाेहचू शकत नाही. त्यामुळे केवळ गैरप्रकार करण्यासाठी शहरातील काही संस्था चालकांनी याची मागणी करून, हे परीक्षा केंद्र निवडल्याची चर्चा आहे. मिळालेल्या माहितीनुसार खरबी येथील संस्थेचे ३० विद्यार्थी परीक्षेसाठी सुनसान रस्त्याने या केंद्रावर कसेबसे पाेहचले. त्यामुळे पालक व विद्यार्थ्यांनीही राेष व्यक्त केला.

परीक्षा परिषद अध्यक्षांच्या पत्रात इशारापरीक्षा केंद्रावर डमी विद्यार्थी बसविणे, टंकलेखनात निपूण उमेदवारांकडून इतर उमेदवारांची उत्तरपत्रिका टंकलिखित करणे, जाणीवपूर्वक संगणक बंद करून वेळ वाया घालविणे व नंतर इतरांकडून उत्तरपत्रिका साेडवून घेणे, परीक्षार्थी अदलाबदल करणे, असा प्रकार चालताे. त्यामुळे उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार, नगरपरिषद मुख्याधिकारी यांनी परीक्षा केंद्रावर आकस्मिक भेटी देण्याचे निर्देश परीक्षा परिषद अधिकाऱ्यांनी दिले आहेत. या निर्देशांचे पालन हाेते का, हा प्रश्न आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रfraudधोकेबाजीnagpurनागपूर