शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द झाल्याने घोटाळ्याची शंका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2022 20:49 IST

Nagpur News पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द झाल्यामुळे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.

ठळक मुद्देकितीही हल्ले केले तरी राज्य सरकारची पोलखोल थांबणार नाही

नागपूर : पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द झाल्यामुळे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. दुसऱ्याच दिवशी बदल्या रद्द झाल्यामुळे कुठे घोटाळा तर झालेला नाही, अशी शंका येत आहे. राज्य शासनाने याचे स्पष्टीकरण दिले पाहिजे, असे ते म्हणाले. नागपुरात गुरुवारी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

याअगोदरदेखील बदल्यांमध्ये घोटाळा झाला होता. पोलीस उपायुक्तांच्या बदल्यादेखील रद्द झाल्या आहेत. सीबीआय काही बदल्यांची चौकशी करत आहे. त्यामुळे परत घोटाळा झालेला नाही ना, अशी शंका येत आहे, असे ते म्हणाले.

भाजप रोज पोलखोल करत आहे. त्यामुळे सत्तापक्ष अस्वस्थ आहे. त्यामुळे रथावर हल्ला झाला. भाजपच्या पोलखोल रथाच्या यात्रेवर कितीही हल्ले केले तरी पोलखोल थांबणार नाही. पोलिसांनी जर संरक्षण दिले नाही तर त्यांचीदेखील पोलखोल करणार असल्याचा इशारा फडणवीस यांनी दिला. अमरावतीत हिंदूंना निशाणा बनविले जात असून, मंत्र्यांच्या भूमिकेमुळे तणाव वाढत असल्याचा दावा त्यांनी केला. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्यासोबत होते तेव्हा त्यांचे बोल गुलुगुलू वाटत होते. आता राज ठाकरे सत्य बोलायला लागले तर त्यांचे शब्द वर्मी लागत असल्याचेदेखील ते म्हणाले.

राऊतांना सद्बुद्धी मिळेल

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या नागपुरातील वाढत्या सक्रियतेबाबत विचारणा केली असता, नागपूरच्या वातावरणातच वेगळेपणा आहे. संजय राऊत वारंवार नागपूरला आल्यामुळे त्यांना सुबुद्धी येईल, असा चिमटा त्यांनी काढला.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस