शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

निलंबित कुलगुरू सुभाष चौधरी विद्यापीठात परतणार? उच्च न्यायालयाने निलंबनाचा निर्णय ठरवला अवैध 

By निशांत वानखेडे | Updated: April 9, 2024 18:22 IST

राज्यपालांकडून सर्वाेच्च न्यायालयात आव्हान नाही.

निशांत वानखेडे, नागपूर : राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूरविद्यापीठाचे निलंबित कुलगुरू डाॅ. सुभाष चाैधरी हे पुन्हा एकदा त्यांच्या पदावर परतण्याची शक्यता दिसून येत आहे. राज्यपालांनी दिलेला डाॅ. चाैधरी यांच्या निलंबनाचा निर्णय उच्च न्यायालयाने अवैध ठरवला हाेता. उच्च न्यायालयाच्या निर्णयाला राज्यपाल कार्यालयाकडून सर्वाेच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलेले नाही. यासाठी आता केवळ दाेन दिवस उरले आहेत. त्यामुळे डाॅ. चाैधरी परतणार, अशी चर्चा विद्यापीठ वर्तुळात आहे.

नागपूर विद्यापीठात विविध कामात झालेल्या गैरप्रकाराचा ठपका कुलगुरू डाॅ. चाैधरी यांच्यावर ठेवण्यात आला हाेता. एमकेसीएलला दिलेल्या कंत्राटापासून विना निविदा कामे करण्यावरून डाॅ. चाैधरींच्या भूमिकेवर संशय व्यक्त करीत आक्षेप घेण्यात आला हाेता. चाैकशीसाठी स्थापित बाविस्कर समितीनेही विराेधात अहवाल दिल्यानंतर राज्यपाल रमेश बैस यांनी डाॅ. चाैधरी यांच्या निलंबनाचे आदेश दिले. त्यांच्या जागेवर गाेंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. प्रशांत बाेकारे यांच्याकडे नागपूर विद्यापीठाचा प्रभार साेपविण्यात आला. याविराेधात डाॅ. चाैधरी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली.

विद्यापीठातील अनियमिततेची चाैकशी आधी झाली व कुलगुरुंच्या निलंबनाचा कायदा नंतर आल्याचे तांत्रिक कारण देत उच्च न्यायालयाने डाॅ. चाैधरी यांच्या निलंबनाचा निर्णय अवैध ठरविला हाेता. या निर्णयाविराेधात सर्वाेच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी राज्यपाल कार्यालयाला चार आठवड्याची मुदन देण्यात आली हाेती. ही मुदत ११ एप्रिल म्हणजे गुरुवारी संपणार आहे. आतापर्यंत राज्यपाल कार्यालयाकडून याबाबत हालचाली करण्यात आलेल्या नाहीत. आता केवळ दाेन दिवस उरलेले आहेत. दाेन दिवसात राज्यपालांनी सर्वाेच्च न्यायालयात आव्हान दिले नाहीत, तर डाॅ. चाैधरी पुन्हा कुलगुरूच्या खुर्चीवर बसतील, अशी शक्यता आहे.

ऑडिटरच्या अहवालावर नजरा-

या सर्वा घडामाेडीदरम्यान सरकारतर्फे ऑडिटची एक टीम चाैकशीसाठी नागपूरला पाठविण्यात आली हाेती. या टीमने येथे ५-६ दिवस राहून नागपूर विद्यापीठातील संदिग्ध फाईल्सचा अभ्यास केल्याचे सांगण्यात येत आहे. ही टीम परत गेली असून सरकारकडे काय अहवाल देते, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. या अहवालानंतर सरकारच्या निर्णयाकडेही सर्वांचे लक्ष लागले राहिल.

राज्यपाल-कुलगुरू सामना रंगणार?

राज्यपालांच्या आदेशामुळे कुलगुरू यांचे व त्यानंतर उच्च न्यायालयाच्या निर्णयाने राज्यपालांचेही हसे झाले. मात्र राज्यपाल-कुलगुरू यांच्यात पुढेही सामना रंगण्याची चर्चा विद्यापीठ वर्तुळात आहे. राज्यपाल स्वत:ची एक टीम चाैकशीसाठी पाठविणार का, अशीही चर्चा आहे.

टॅग्स :nagpurनागपूरuniversityविद्यापीठ