शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
3
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
4
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
5
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
6
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
7
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
8
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
9
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
10
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
11
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
12
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
13
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
14
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना
15
गेल्या २४ तासांत जपानमध्ये भूकंपाचे धक्के, सर्वात मोठा भूकंप ६.८ रिश्टर स्केलचा; त्सुनामीचा इशारा जारी
16
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
17
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
18
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
19
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
20
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश

नागपुरात ७१ टक्क्यांनी वाढले गोवर संशयित रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2022 07:55 IST

Nagpur News नागपूर जिल्ह्यात या आजाराचे ९ रुग्ण पॉझिटिव्ह असलेतरी मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी संशयित रुग्णांच्या संख्येत ७१ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

ठळक मुद्दे२७८ संशयितांची नोंद, ९ रुग्ण पॉझिटिव्ह

सुमेध वाघमारे

नागपूर : मुंबईत गोवरच्या साथीमुळे प्रशासन हादरले आहे. नागपूर जिल्ह्यात या आजाराचे ९ रुग्ण पॉझिटिव्ह असलेतरी मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी संशयित रुग्णांच्या संख्येत ७१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. नागपूर शहर व ग्रामीण मिळून २७८ संशयित रुग्ण आहेत.

‘ब्रायेरीॲस मॉर्बिलोरम’ या विषाणूंमुळे होणारा गोवर हा श्वसनसंस्थेचा संसर्गजन्य रोग आहे. मुख्यत्वे हा रोग लहान मुलांमध्ये आढळतो; परंतु काही वेळा प्रौढांनाही होऊ शकतो. या आजाराचा उद्रेक मुंबईत झाला आहे. येथे २९२ रुग्ण आढळून आले असून १० रुग्णांच्या मृत्यूची नोंद आहे. नागपूर जिल्ह्यात सध्या गोवरचे दहाच्या आत रुग्ण असलेतरी खबरदारी म्हणून लसीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. परंतु संशयित रुग्णांमध्ये गोवरची लक्षणे दिसून येत असल्याने आरोग्य विभागाची झोप उडाली आहे.

मागील वर्षी होते १६२ संशयित रुग्ण

आरोग्य विभागाच्या उपसंचालक कार्यालयाकडून उपलब्ध माहितीनुसार, मागील वर्षी शहरात ६४ संशयित व २ पॉझिटिव्ह तर, ग्रामीणमध्ये ९८ संशयित व ६ पॉझिटिव्ह, असे एकूण १६२ संशयित व ८ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद होती. सध्या जानेवारी ते २६ नोव्हेंबर २०२२ या दरम्यान शहरात ११४ संशयित व २ पॉझिटिव्ह तर ग्रामीणमध्ये १६४ संशयित व ७ पॉझिटिव्ह असे एकूण २७८ संशयित रुग्ण व ९ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद आहे.

-गोवर बालकांच्या मृत्यूचे मुख्य कारण

गोवर हा अत्यंत संसर्गजन्य रोग आहे. संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर १० ते १२ दिवसांनंतर लक्षणे दिसू लागतात आणि ७ ते १० दिवसांपर्यंत टिकतात. या आजारांमध्ये उद्भवणारा अतिसार, न्यूमोनिया आणि मेंदू संसर्ग यांसारख्या गुंतागुंतीमुळे मृत्यू होऊ शकतो. गोवर बालकांच्या मृत्यूचे मुख्य कारण ठरले आहे. परंतु लसीचे दोन्ही डोसमुळे ९४ टक्के मृत्यूचा धोका टाळता येऊ शकतो.

- ही घ्या काळजी

गोवर हा विषाणूजन्य आजार असल्याने त्यावर विशिष्ट असे औषध नाही. लक्षणांनुसार त्यावर उपचार केले जातात. गोवर झालेल्या रुग्णांने पुरेशी विश्रांती घेणे, इतरांपासून वेगळे ठेवणे गरजेचे असते. पुरेशा प्रमाणात द्रव पदार्थांचे सेवन करणे व ताप नियंत्रणात ठेवणे अतिशय महत्त्वाचे ठरते.

 

 

टॅग्स :Healthआरोग्य