शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-दिल्ली विमानाचे तिकीट झाले ५०-६० हजारांना; इंडिगोची विमाने रद्द, दुसऱ्या कंपन्यांनी लुटायला सुरुवात केली...
2
इंडिगोला मोठा दिलासा! डीजीसीएने क्रू विश्रांतीचा नियम मागे घेतला, तरीही उड्डाणे सुरळीत होण्यासाठी काही दिवस लागणार
3
नगरपालिकांची मतमोजणी २१ डिसेंबरलाच; सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवला, पण...
4
लहान मुले-वृद्धांनी बेंचवर झोपून रात्र काढली; इंडिगो संकटामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल;..!
5
जो रुट सुसाट! सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड धोक्यात! पण इंग्लंड बॅटरला खरंच ते शक्य होईल का?
6
१ लाखापर्यंतच्या रकमेसाठी समान व्याजदर, RBIकडून सर्व बँकांसाठी नवे नियम; होणार फायदा
7
एअरटेलने स्वस्तातले ३० दिवसांचे दोन प्लॅन बंद केले; आता जास्त पैसे मोजल्याशिवाय पर्याय नाही
8
ना गोवा ना काश्मीर, २०२५ मध्ये लोकांनी 'गुगल'वर 'या' छोट्या शहराला सर्वाधिक केले सर्च
9
प्रवाशांचे हाल! मुंबई-पुण्यासह देशभरातील ६००हून अधिक इंडिगो विमानांचे उड्डाण रद्द!
10
Gold Silver Price Today: सोन्याच्या दरात जोरदार तेजी, चांदीचा दर २ लाखांच्या जवळ; एकाच झटक्यात २४०० रुपयांची तेजी
11
जिद्दीला सलाम ! डोळ्याला इन्फेक्शन... तरीही गॉगल लावून मैदानात उतरला अन् पठ्ठाने शतकच ठोकलं
12
सनी देओल रुपेरी पडद्यावर धमाका करण्यासाठी सज्ज, या दिवशी रिलीज होणार 'बॉर्डर २'चा टीझर
13
आसिम मुनीर यांची ताकद वाढली; पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे 'हे' ५ मोठे अधिकार संपुष्टात!
14
पुतिन-मोदींची 'सरप्राइज राइड', सफेद रंगाच्या Fortuner ची सगळीकडे चर्चा, महाराष्ट्राशी कनेक्शन
15
Matthew Hayden: 'कपडे काढून धावेन' म्हणणारा मॅथ्यू हेडन जो रूटच्या शतकानंतर काय म्हणाला?
16
"आईशप्पथ हे पुन्हा करणार नाही"; तरुणाचा मास्टर प्लॅन बघून स्कॅमरने टेकले हात, लोकेशन कळताच आरोपी घाबरला
17
एआय: महासत्ता की महासंकट?, गरीब-श्रीमंतांमधील...; 'संयुक्त राष्ट्र संघा'ने या तंत्रज्ञानाबद्दल दिला गंभीर इशारा
18
टाटा समूहावर शोककळा! 'लॅक्मे' आणि 'वेस्टसाइड'च्या संस्थापिका सिमोन टाटा यांचे ९५व्या वर्षी निधन
19
इन्स्टावरच्या गर्लफ्रेंडशी लग्न करायला पोहोचला तरुण; वरातही वाजत निघाली अन् अचानक मुलगी फोनच उचलेना..
20
BB 19: "असं संपायला नको होतं...", मालती चहर घराबाहेर गेल्यानंतर प्रणित मोरेची अशी अवस्था
Daily Top 2Weekly Top 5

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने झुडपी जंगलांच्या जागेवरील ५० हजार कुटुंबांचे घर-शेती वाचणार

By योगेश पांडे | Updated: September 1, 2025 23:41 IST

२२ मे २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयाने झुडपी जंगल क्षेत्रातील एकूण ३३,३९१ हेक्टर जमिनीचे वनक्षेत्रातून वगळण्यासाठी राज्य शासनास प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्याचे निर्देश दिले होते.

- योगेश पांडे लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सर्वोच्च न्यायालयाने झुडपी जंगल संदर्भातील ऐतिहासिक निर्णय देत राज्यातील लाखो नागरिकांचे भविष्य सुरक्षित केले आहे. विशेष म्हणजे या निर्णयामुळे झुडपी जंगलांच्या जागेवरील ५० हजार कुटुंबाचे घर व शेती वाचणार आहे. शिवाय विदर्भातील अनेक जमिनींवर विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.

२२ मे २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयाने झुडपी जंगल क्षेत्रातील एकूण ३३,३९१ हेक्टर जमिनीचे वनक्षेत्रातून वगळण्यासाठी राज्य शासनास प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्याचे निर्देश दिले होते. मात्र, अतिक्रमणांबाबतच्या काही बाबींमध्ये स्पष्टता आवश्यक असल्याने नागपूरचे विभागीय आयुक्त यांच्या मार्फत पुनर्विचार अर्ज दाखल करण्यात आला होता. यावर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला.

गावाकडच्या झुडपी जंगलाच्या जमिनीवर अनेक लोकं वर्षानुवर्षे राहात आहेत. कुणी झोपडी टाकून घर केलंय, कुणी शेती सुरू केलीय, तर कुठे शाळा, अंगणवाडी, पाणीपुरवठा योजना सुरू आहेत. पण या सगळ्या जमिनींची झुडुपी जंगल म्हणून नोंद असल्याने लोकांना भविष्यात आपल्या डोक्यावरील छत्र जाईल की काय अशी भिती होती. शिवाय नागपुरातील अनेक सरकारी इमारतीदेखील अशाच जमिनीवर आहेत. झुडपी जंगल क्षेत्रावरील १२ डिसेंबर १९९६ पूर्वी झालेली अतिक्रमणे संरक्षित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय न्यायालयाने दिल्याने थेट ५० हजार कुटुंबांना दिलासा मिळाला आहे. यात ४२ हजार ८४६ नागरिकांची कच्ची व पक्की घरे तसेच झोपड्या, ७ हजार ६१६ शेतीवरील अतिक्रमणए, ५११ सार्वजनिक उपयुक्ततेच्या इमारती तसेच ७३ शाळा व इतर सार्वजनिक बांधकामे यांचा समावेश आहे, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

त्याचप्रमाणे एकूण २९,०३१ हेक्टर विखुरलेली झुडपी जंगले (३ हेक्टरपेक्षा कमी क्षेत्राची) संरक्षित वन म्हणून जाहीर करण्यात आली असली तरी, राज्य शासनाला ही जमीन शाळा, अंगणवाडी, रस्ते, पाणीपुरवठा योजना यांसारख्या सार्वजनिक उपयोगासाठी वनअधिकार कायदा २००६ च्या कलम ३(२) अंतर्गत वापरण्याची परवानगी राहील. अशा वापरासाठी प्रत्येकी जास्तीत जास्त १ हेक्टर क्षेत्र देण्याचा अधिकार विभागीय वनाधिकाऱ्यांना राहणार आहे.

जर राज्य शासनास १२ डिसेंबर १९९६ नंतरची अतिक्रमणे नियमित करावयाची असतील, तर त्या संदर्भातील प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविता येईल. विशेषतः १९९६ ते २०११ दरम्यान झालेल्या अतिक्रमणांचे नियमितीकरण करण्यास न्यायालयाने मर्यादित प्रमाणात मुभा दिली आहे. यावर अंतिम निर्णय केंद्र पर्यावरण व वन मंत्रालयाच्या विचाराधीन राहील.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय