शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने झुडपी जंगलांच्या जागेवरील ५० हजार कुटुंबांचे घर-शेती वाचणार

By योगेश पांडे | Updated: September 1, 2025 23:41 IST

२२ मे २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयाने झुडपी जंगल क्षेत्रातील एकूण ३३,३९१ हेक्टर जमिनीचे वनक्षेत्रातून वगळण्यासाठी राज्य शासनास प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्याचे निर्देश दिले होते.

- योगेश पांडे लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सर्वोच्च न्यायालयाने झुडपी जंगल संदर्भातील ऐतिहासिक निर्णय देत राज्यातील लाखो नागरिकांचे भविष्य सुरक्षित केले आहे. विशेष म्हणजे या निर्णयामुळे झुडपी जंगलांच्या जागेवरील ५० हजार कुटुंबाचे घर व शेती वाचणार आहे. शिवाय विदर्भातील अनेक जमिनींवर विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.

२२ मे २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयाने झुडपी जंगल क्षेत्रातील एकूण ३३,३९१ हेक्टर जमिनीचे वनक्षेत्रातून वगळण्यासाठी राज्य शासनास प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्याचे निर्देश दिले होते. मात्र, अतिक्रमणांबाबतच्या काही बाबींमध्ये स्पष्टता आवश्यक असल्याने नागपूरचे विभागीय आयुक्त यांच्या मार्फत पुनर्विचार अर्ज दाखल करण्यात आला होता. यावर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला.

गावाकडच्या झुडपी जंगलाच्या जमिनीवर अनेक लोकं वर्षानुवर्षे राहात आहेत. कुणी झोपडी टाकून घर केलंय, कुणी शेती सुरू केलीय, तर कुठे शाळा, अंगणवाडी, पाणीपुरवठा योजना सुरू आहेत. पण या सगळ्या जमिनींची झुडुपी जंगल म्हणून नोंद असल्याने लोकांना भविष्यात आपल्या डोक्यावरील छत्र जाईल की काय अशी भिती होती. शिवाय नागपुरातील अनेक सरकारी इमारतीदेखील अशाच जमिनीवर आहेत. झुडपी जंगल क्षेत्रावरील १२ डिसेंबर १९९६ पूर्वी झालेली अतिक्रमणे संरक्षित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय न्यायालयाने दिल्याने थेट ५० हजार कुटुंबांना दिलासा मिळाला आहे. यात ४२ हजार ८४६ नागरिकांची कच्ची व पक्की घरे तसेच झोपड्या, ७ हजार ६१६ शेतीवरील अतिक्रमणए, ५११ सार्वजनिक उपयुक्ततेच्या इमारती तसेच ७३ शाळा व इतर सार्वजनिक बांधकामे यांचा समावेश आहे, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

त्याचप्रमाणे एकूण २९,०३१ हेक्टर विखुरलेली झुडपी जंगले (३ हेक्टरपेक्षा कमी क्षेत्राची) संरक्षित वन म्हणून जाहीर करण्यात आली असली तरी, राज्य शासनाला ही जमीन शाळा, अंगणवाडी, रस्ते, पाणीपुरवठा योजना यांसारख्या सार्वजनिक उपयोगासाठी वनअधिकार कायदा २००६ च्या कलम ३(२) अंतर्गत वापरण्याची परवानगी राहील. अशा वापरासाठी प्रत्येकी जास्तीत जास्त १ हेक्टर क्षेत्र देण्याचा अधिकार विभागीय वनाधिकाऱ्यांना राहणार आहे.

जर राज्य शासनास १२ डिसेंबर १९९६ नंतरची अतिक्रमणे नियमित करावयाची असतील, तर त्या संदर्भातील प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविता येईल. विशेषतः १९९६ ते २०११ दरम्यान झालेल्या अतिक्रमणांचे नियमितीकरण करण्यास न्यायालयाने मर्यादित प्रमाणात मुभा दिली आहे. यावर अंतिम निर्णय केंद्र पर्यावरण व वन मंत्रालयाच्या विचाराधीन राहील.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय