शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

बाल कर्करुग्णांना अद्ययावत उपचाराचा आधार  : 'कॅनकिड' संस्थेशी सामंजस्य करार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 23:29 IST

अर्धवट उपचारामुळे अकाली दगावणाऱ्या बाल कर्करोग रुग्णांची संख्या मोठी आहे. यातून मार्ग काढण्यासाठी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने नागपूरसह मुंबई, पुणे व औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांचा ‘कॅनकिड’ या संस्थेशी सामंजस्य करार केला आहे.

ठळक मुद्देनागपूरसह मुंबई, पुणे, औरंगाबाद वैद्यकीय महाविद्यालयांचा समावेश

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : भारतात दरवर्षी सुमारे ३० ते ४० हजार मुलांना कर्करोग (कॅन्सर) होतो. त्यापैकी ७० ते ८० टक्के बालकांचा जागरूकतेचा अभाव, उशिरा निदान, अपुऱ्या उपचारांच्या सोयी किंवा आवाक्याबाहेरचा खर्च यामुळे मृत्यू होतो. बालपणातील कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण १६.२३ टक्के एवढा आहे. विशेषत: अर्धवट उपचारामुळे अकाली दगावणाऱ्या बाल कर्करोग रुग्णांची संख्या मोठी आहे. यातून मार्ग काढण्यासाठी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने नागपूरसह मुंबई, पुणे व औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांचा ‘कॅनकिड’ या संस्थेशी सामंजस्य करार केला आहे.नागपूर मेडिकलच्या बालरोग विभागाच्यावतीने नुकतेच कर्करोगावर आधारित दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी यांनी या सामंजस्य कराराची माहिती दिली. कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने, नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. आनंद पाठक, मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ. दीप्ती जैन, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, डॉ. हरीश वरभे, डॉ. पंकज द्विवेदी व डॉ. रत्ना शर्मा उपस्थित होते.करारामुळे अद्ययावत उपचार व आर्थिक मदतडॉ. मुखर्जी म्हणाले, २०१२ पासून मेडिकलमधील कर्करोगाच्या बालरुग्णांना ‘कॅनकिडस्’कडून सेवा दिली जात आहे. या करारामुळे ही सेवा आता अधिकृत झाली आहे. यात चार रुग्णालयांचा समावेशही करण्यात आला आहे. या रुग्णालयांत उपचार घेणाऱ्याबाल कर्करुग्णांचा पाठपुरावा घेणे, उपचार सोडलेल्या रुग्णांचा शोध घेणे, रुग्णांच्या येण्या-जाण्याची आर्थिक अडचण सोडविणे, त्यांच्या शिक्षणाची सोय करारामध्ये अंतर्भूत आहे. दुर्गम भागात वैद्यकीय सेवा पोहचविण्याची गरजडॉ. लहाने म्हणाले की, गावखेड्यासोबतच दुर्गम भागात डॉक्टरांनी वैद्यकीय सेवा पोहचविण्याची गरज आहे. यासाठी वैद्यकीय महाविद्यालयांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. बाल कर्करुग्णांसाठी स्वतंत्र खाटांची सोय व इतरही अद्ययावत सुविधा उपलब्ध करून दिली जाईल, अशी ग्वाही डॉ. मित्रा यांनी दिली. प्रास्ताविक डॉ. जैन यांनी केले.

टॅग्स :cancerकर्करोगMedicalवैद्यकीय