शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

१६,०९४ कोटी रुपयांच्या पूरक मागण्या

By admin | Updated: December 9, 2015 03:22 IST

राज्य सरकारच्या ५४,९९९ कोटी रुपयांच्या वार्षिक बजेमध्ये एकट्या हिवाळी अधिवेशनातच १६,०९४ कोटी रुपयांच्या पूरक...

दोन्ही सभागृहात प्रस्ताव सादर : वित्त राज्यमंत्री केसरकर यांची माहितीनागपूर : राज्य सरकारच्या ५४,९९९ कोटी रुपयांच्या वार्षिक बजेमध्ये एकट्या हिवाळी अधिवेशनातच १६,०९४ कोटी रुपयांच्या पूरक मागण्यांचा प्रस्ताव मंगळवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सादर करण्यात आला. हा प्रस्ताव मंजूर व्हायचा आहे. सर्वाधिक रक्कम दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मागण्यात आली आहे, अशी माहिती वित्त, नियोजन व ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रपरिषदेत दिली. केसरकर यांनी सांगितले की, मंगळवारी दोन्ही सभागृहाच्या पटलावर १६,०९४ कोटी रुपयांच्या पूरक मागण्यांचा प्रस्ताव ठेवण्यात आला. यात ९३७४ कोटी रुपये अनियोजित खर्चांसाठी आणि ५९१३ कोटी रुपये नियोजित खर्चांसाठी मागण्यात आली आहे. सर्वाधिक जोर दुष्काळग्रस्तांच्या मदतीवर देण्यात आला आहे. पूरक मागण्यांमध्ये शेतकऱ्यांच्या मदतीला अधिक महत्त्व देण्यात आले आहे. यात पीक विमा, अल्पावधीतील कर्जाला दीर्घकालीन कर्जात रुपांतरीत करणे, पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेवर ही रक्कम खर्च केली जाईल.दुष्काळामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी चार हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम खर्च केली जाईल. केंद्र सरकारच्या आपत्ती निवारण निधीतूनही आवश्यक आर्थिक मदत प्राप्त केली जात आहे. दुष्काळग्रस्त भागातील शाळकरी मुलांना शिक्षण शुल्कात सवलत देणे, सामाजिक सुरक्षा योजना (श्रावणबाळ, संजय गांधी निराधार योजना) साठी सुद्धा पूरक मागण्यांच्या माध्यमातून तरतूद करण्यात आली आहे. महसूल विभागाला दुष्काळग्रस्त क्षेत्रात अधिकाधिक मदत कार्य करण्यासाठी ५५०५ कोटी रुपये देण्याची तरतूद करण्यात आली आहे. नगर विकास विभागासाठी २८१६ कोटी रुपये, एलबीटी रद्द केल्याने मनपाला झालेल्या नुकसान भरपाईसाठी १२२९ कोटी रुपये आणि रस्ते आणि सुधार कामासाठी बांधकाम विभागासाठी १५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दुष्काळग्रस्त भागातील शाळकरी मुलांसाठी पासेसच्या सुविधेसाठी रकमेची तरतूद करण्यात आली आहे. जलयुक्त शिवारच्या कामासाठी ६०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ही रक्कम जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून दिली जाणार आहे. आमदारांचा निधी परत घेण्याऐवजी त्याला पुढील वर्षी कॅरी फॉरवर्ड करण्यासाठी सुद्धा निधीची तरतूद करण्यात आली आहे. राज्यमंत्री केसरकर यांनी सांगितले की, पोलीस घरकुल योजनेसाठी २०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. श्रावणबाळ योजनेसाठी १७६ कोटी रुपये, एसटी महामंडळासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. रस्त्यांच्या पॅचवर्कसाठी अभियान चालवण्यासाठी तरतूद केली आहे. याशिवाय उत्पन्नाचे स्रोत वाढविणे, खर्चांमध्ये कपात करणे, केंद्र सरकारच्या योजनांसाठी अधिकाधिक निधी मिळविण्यावर विशेष जोर दिला जात असल्याचेही केसरकर यांनी सांगितले. गोसीखुर्दसाठी ३५० कोटी राज्य सरकारतर्फे देन्ही सभागृहात सादर करण्यात आलेल्या पूरक मागण्यांमध्ये गोसीखुर्द प्रकल्पासाठी ३५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती राज्यमंत्री केसरकर यांनी दिली. विकास मंडळाची पुनर्स्थापना लवकरच राज्यात जितके विकास महामंडळ आहेत. त्यांच्या पुनर्स्थापनेचे काम पुढील एक-दोन महिन्यात पूर्ण होईल असा विश्वास असल्याचे राज्यमंत्री केसरकर यांनी सांगितले. चांदा टू बांदा वाढवणार प्रति व्यक्ती उत्पन्न राज्य सरकार चांदा टू बांदा योजने अंतर्गत राज्यभरात प्रति व्यक्ती उत्पन्न वाढविण्याचा विचार करीत आहे. यासाठी खासगी कंपन्यांची मदत घेतली जाईल. कंपन्या शेतकऱ्यांना कृषी उत्पादन वाढविणे आणि नुकसान कमी करण्यास मदत करतील. (प्रतिनिधी)