शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

दिवसा उन्हाचे चटके, रात्री गारवा; दाेन दिवसांत पारा २ ते ३ अंशाने वाढण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2023 20:46 IST

Nagpur News बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या माेखा चक्रीवादळाचा कुठलाही प्रभाव विदर्भावर नसून पुढच्या दाेन दिवसांत दिवसाचे तापमान २ ते ३ अंशाने वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

नागपूर : सूर्याचा पारा दिवसागणिक संथगतीने वाढत आहे. गुरुवारी उन्हाच्या चटक्यांनी नागरिकांना हैराण केले. मात्र, रात्रीचा पारा आश्चर्यकारकरित्या घसरल्याचे दिसून येत आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या माेखा चक्रीवादळाचा कुठलाही प्रभाव विदर्भावर नसून पुढच्या दाेन दिवसांत दिवसाचे तापमान २ ते ३ अंशाने वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

गेल्या काही दिवसांपासून कमाल तापमानात सुरू असलेली संथगती वाढ गुरुवारीही दिसून आली. नागपुरात पारा ०.१ अंशाने वाढून ४१.३ अंशांवर पाेहोचला, तरीही ताे सरासरीपेक्षा अद्याप १.७ अंशाने कमी आहे. विदर्भात वर्धा आणि अकाेल्यात सर्वाधिक ४३ अंश तापमानाची नाेंद झाली. गडचिराेली व वाशिममध्ये पारा ४० अंशांवर आहे तर इतर शहरात ताे ४१ अंशाच्या वर गेला आहे. मात्र, रात्रीच्या पाऱ्यात झालेली घसरण आश्चर्य वाटणारी आहे. कदाचित माेखा चक्रीवादळाच्या प्रभावाने किमान तापमान घसरल्याचे बाेलले जात आहे.

गुरुवारी रात्रीचा पारा ३.१ अंशाने घसरून २१.६ अंशावर गेला, जाे सरासरीपेक्षा ५.९ अंशाने कमी आहे. गडचिराेली आणि यवतमाळ वगळता इतर सर्व शहरांत किमान तापमान २ ते ७ अंशांपर्यंत घसरले. गाेंदियात २४ तासांत सर्वाधिक ४.७ अंशाने घसरून १९.८ अंशाची नाेंद करण्यात आली. दरम्यान, पुढच्या दाेन दिवसांत दिवसाचा पारा २ ते ३ अंशाने वाढण्याचा आणि त्यानंतर तेवढ्याच अंशाने घटणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

टॅग्स :weatherहवामान