शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
3
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
5
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
6
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
7
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
8
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
9
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
10
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
11
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
12
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
13
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
14
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
15
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
16
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
17
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
18
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
19
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
20
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार

कोरोना काळातदेखील ‘आयआयएम’च्या १०० टक्के विद्यार्थ्यांचे ‘समर प्लेसमेन्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 11:20 IST

Nagpur News ‘आयआयएम-नागपूर’च्या सातव्या ‘बॅच’मधील विद्यार्थ्यांच्या ‘समर प्लेसमेन्ट’ची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. कोरोनाचा प्रकोप कायम असतानादेखील १०० टक्के विद्यार्थ्यांचे ‘समर प्लेसमेन्ट’ झाले आहे.

ठळक मुद्देस्टायपेंडमध्ये सरासरी १२ टक्क्यांनी वाढ विद्यार्थ्यांचे ‘बँकिंग’, वित्त, विमा, ‘एज्युकेशन टेक्नॉलॉजी’ क्षेत्राला प्राधान्य

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : ‘आयआयएम-नागपूर’च्या सातव्या ‘बॅच’मधील विद्यार्थ्यांच्या ‘समर प्लेसमेन्ट’ची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यंदा यासाठी मागील वर्षीच्या तुलनेत कंपन्यांची संख्या वाढली. निम्म्याहून अधिक विद्यार्थ्यांचा कल हा ‘बँकिंग’, वित्त, विमा, तसेच ‘एज्युकेशन टेक्नॉलॉजी’साठी काम करणाऱ्या कंपन्यांकडे जास्त राहिला. विशेष म्हणजे कोरोनाचा प्रकोप कायम असतानादेखील १०० टक्के विद्यार्थ्यांचे ‘समर प्लेसमेन्ट’ झाले आहे.

‘आयआयएम-नागपूरच्या’ सातव्या ‘बॅच’मधील विद्यार्थ्यांची प्रवेशसंख्या मागील वर्षीच्या तुलनेत दुप्पट झाली आहे. यंदा २१२ विद्यार्थी ‘समर प्लेसमेन्ट’च्या प्रक्रियेला सामोरे गेले. यातील १०० टक्के विद्यार्थ्यांचे देशातील नामांकित कंपन्यांमध्ये ‘प्लेसमेन्ट’ झाले आहे. यंदा येथे ‘समर प्लेसमेन्ट’च्या प्रक्रियेत शंभरहून अधिक कंपन्या सहभागी झाल्या. मागील वर्षीच्या तुलनेत मोठ्या कंपन्या आल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. यंदा सर्वात जास्त ‘स्टायपेन्ड’ २.५ लाख इतका आहे. मागील वर्षीच्या तुलनेत हा आकडा दुप्पट आहे, तर सरासरी ‘स्टायपेन्ड’ ६० हजार ९५३ इतका आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यात १२.७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. विद्यार्थ्यांनी ‘फिनटेक’, फार्मा कंपन्या, तसेच ‘ई-कॉमर्स’लादेखील प्राधान्य दिले आहे.

‘लॉजिस्टिक हब’ला मिळणार बळ

‘आयआयएम’मधील अभ्यासक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना ‘समर इंटर्नशिप’ करणे अनिवार्य असते. ‘आयआयएम’चा दर्जा लक्षात घेता नामांकित कंपन्यांकडे जाण्यासाठी विद्यार्थ्यांचा प्रयत्न असतो. ‘आयटी कन्सल्टिंग’, ‘लॉजिस्टिक्स’, ‘रिटेल’, ‘एफएमसीजी’, ‘मीडिया’, ‘बँकिंग’ इत्यादी क्षेत्रातील कंपन्या या प्रक्रियेत सहभागी झाल्या होत्या. विशेष म्हणजे ‘लॉजिस्टिक हब’ म्हणून नागपूर उदयाला येत असून, या क्षेत्रातील कंपन्यादेखील ‘आयआयएम’मध्ये आल्या होत्या.

उद्योग क्षेत्रात योगदान देण्याचा प्रयत्न

कोरोनाच्या काळातदेखील आयआयएम-नागपूरला उद्योग क्षेत्राने पसंती दिली आहे. यंदा आव्हानांत वाढ झाली होती. मात्र, त्यातून विद्यार्थ्यांना जास्त शिकायला मिळाले. शिकतानाच उद्योग क्षेत्राचा अनुभव मिळाला, तर दर्जेदार व कुशल विद्यार्थी घडतात. यामुळे व्यवस्थापन क्षेत्रात सकारात्मक वातावरणनिर्मितीदेखील होते. यंदा ‘आयआयएम-नागपूर’ने ‘समर प्लेसमेन्ट’च्या प्रक्रियेत दर्जेदार कंपन्या सहभागी झाल्या. यातूनच संस्थेचा दर्जा वाढत असल्याचे दिसून येते, असे मत ‘आयआयएम-नागपूर’चे संचालक डॉ. भीमराया मेत्री यांनी व्यक्त केले...

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र