शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

आला उन्हाळा, तब्येत सांभाळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2022 20:39 IST

Nagpur News मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. गेल्या दहा वर्षांतील तापमानावर नजर टाकल्यास नागपुरातील तापमान किमान ४५-४८ अंश सेल्सिअसपर्यंत चढतीवर गेल्याचे दिसते.

ठळक मुद्देउष्माघात, गॅस्ट्रोची लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घ्या

 

नागपूर : नागपूरकर दरवर्षी दाहक उन्हाळा अनुभवतात. यावर्षीही त्याची सुरुवात झाली आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. गेल्या दहा वर्षांतील तापमानावर नजर टाकल्यास नागपुरातील तापमान किमान ४५-४८ अंश सेल्सिअसपर्यंत चढतीवर गेल्याचे दिसते. एवढ्या प्रचंड उकाड्यात शारीरिक क्षमतेची कसोटी लागते. उन्हाळ्याची दहशत कमी करण्यासाठी जो-तो आपल्यापरीने प्रयत्न करत असल्याचे शहरातील चित्र आहे.

-जास्त पाणी प्या

वाढत्या तापमानात कष्टाची कामे करू नयेत, कष्टाची कामे सकाळी लवकर अथवा सायंकाळी कमी तापमानात करावीत, उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. सैल पांढऱ्या रंगाचे कपडे वापरावेत. पाणी जास्त प्यावे. उन्हात बाहेर जाताना योग्य प्रतीचा गॉगल्स, डोक्यावर टोपी, दुपट्ट्याचा वापर करावा.

-उष्माघाताची लक्षणे

रक्तदाब वाढणे, मानसिक बेचैन व अस्वस्थता, बेशुद्धावस्था ही उष्माघाताची लक्षणे आहेत. याशिवाय थकवा येणे, ताप येणे, त्वचा कोरडी पडणे ही लक्षणेही दिसून येतात. भूक न लागणे, चक्कर येणे, निरुत्साह असणे, डोकेदुखी आदी लक्षणे दिसल्यास वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

-उष्माघातावरील उपाय

उष्माघात झालेल्या रुग्णास हवेशीर खोलीत ठेवावे, पंखे, कूलर लावावेत, रुग्णाच्या शरीराचे तापमान कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत, रुग्णास गार पाण्याने अंघोळ घालावी, त्याच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात, आइस पॅक लावावेत. वैद्यकीय सल्ला घ्यावा.

-गॅस्ट्रोची लक्षणे

दूषित अन्न व पाण्यामुळे गॅस्ट्रो होतो. उलटी होणे, मळमळणे, पोट दुखणे, अशक्तपणा जाणवणे आदी लक्षणे आहेत. ही लक्षणे दिसताच रुग्णांनी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. औषधोपचार सुरू करावेत.

-पाणी उकळून प्यावे

या दिवसात पाणी उकळून, थंड करून प्यावे. रस्त्याकडील शीतपेय, उसाचा रस टाळावा. शिळे खाद्यपदार्थ तसेच उघड्यावर ठेवलेले खाद्यपदार्थ खाऊ नयेत. गॅस्ट्रोसदृश लागण झालेल्या रुग्णास घरगुती उपाय म्हणून सहा कप पाण्यात चिमूटभर मीठ व मूठभर साखर पाण्याचे मिश्रण क्षारसंजीवनी म्हणून पाजावे.

टॅग्स :weatherहवामान