शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

वडिलांवरील कर्ज आणि बहिणीचे लग्न या चिंतेतून तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 10:27 IST

सततची नापिकी, वडिलांवर वाढत चाललेला कर्जाचा डोंगर, त्यातच मोठ्या बहिणीच्या लग्नाच्या चिंतेतून १९ वर्षीय तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केली. कळमेश्वर तालुक्यातील सुसुंद्री येथे ही घटना घडली़

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: सततची नापिकी, वडिलांवर वाढत चाललेला कर्जाचा डोंगर, त्यातच मोठ्या बहिणीच्या लग्नाच्या चिंतेतून १९ वर्षीय तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केली. कळमेश्वर तालुक्यातील सुसुंद्री येथे ही घटना घडली़. गौरव चंद्रशेखर काळे असे मृत तरुणाचे नाव आहे़ गौरवने १ जुलै रोजी विष प्राशन केले होते. सोमवारी (दि.६) रोजी त्याचा उपचारादरम्यान नागपुरातील मेयो रुग्णालयात मृत्यू झाला.घरी आईवडील व तीन थोरल्या बहिणी असे सहा जणांचे कुटुंब़ तीन ते चार एकर शेती असल्याने इतक्यांचा उदरनिर्वाह चालविणेही कठीणच. वडिलांनी मुलांच्या शिक्षणासाठी व शेतीसाठी बँक व सावकाराकडून कर्ज काढले़ शेतीत नुकसान होत असताना दोन थोरल्या बहिणींचे विवाह झाले़ त्यामुळे घरी परिस्थिती आणखीनच बिकट झाली़ वाढत चाललेल्या कर्जाच्या डोंगरामुळे वडील नेहमीच चिंतेत असायचे़ तसेच एक बहिण लग्नाची असल्याने पैशाची जुळवाजुळव कशी करायची या विवंचनेतून गौरवने मृत्यूला कवटाळले.एनडीएचे स्वप्नही भंगलेगौरव हा अभ्यासात हुशार होता़ त्याला एनडीएमध्ये जायचे होते़ त्या दृष्टिकोनातून त्याचे प्रयत्नही सुरू होते. मात्र, वडिलांच्या वाढत्या वयामुळे त्यांना शेतीत काम करणे जमेनासे झाल्याने गौरवने महाविद्यालयीन शिक्षण मध्येच सोडून वडिलांना शेतीत मदत करायला सुरुवात केली. त्यामुळे त्यांचे एनडीएचे स्वप्नही भंगले़

 

टॅग्स :Suicideआत्महत्या