शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

आत्महत्या केलेल्या रागिणीला ७८ टक्के गुण

By admin | Updated: May 30, 2017 17:47 IST

१२ वीचे पेपर खराब गेल्याच्या कारणावरून आत्महत्येसारखा दुर्दैवी मार्ग पत्करणाऱ्या वणीतील रागिणी गोडे या विज्ञान शाखेच्या विद्यार्थीनीला ६५० पैकी ५०४ गुण (७७.५४ टक्के) गुण प्राप्त झाले आहेत.

आॅनलाईन लोकमतवणी(यवतमाळ) : १२ वीचे पेपर खराब गेल्याच्या कारणावरून आत्महत्येसारखा दुर्दैवी मार्ग पत्करणाऱ्या वणीतील रागिणी गोडे या विज्ञान शाखेच्या विद्यार्थीनीला ६५० पैकी ५०४ गुण (७७.५४ टक्के) गुण प्राप्त झाले आहेत. उत्तम नर्तकी असलेली रागिणी नारायण गोडे ही येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयाची विद्यार्थीनी होती. १० वीच्या परीक्षेत तिने ९२.२० टक्के गुण प्राप्त केले होते. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात १२ वीची परीक्षा झाल्यानंतर पेपर खराब गेल्यामुळे रागिणी निराश झाली. ही बाब लक्षात आल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते असलेले तिचे वडील नारायण गोडे, आई सुमित्रा आणि तुषार व हितेश या भावंडांनी तिची समजुतही काढली. मात्र ती त्यानंतरही तणावातच वावरत होती. तिला डॉक्टर व्हायचे होते. यासाठी तिने नागपूर येथील एका नामांकित कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेशही घेतला होता. दरम्यान, तिची बिघडलेली मानसिक स्थिती पाहून वडिल नारायण गोडे यांनी तिला उपचारासाठी यवतमाळ येथे नेले. उपचार घेतल्यानंतर वातावरणात बदल म्हणून तिला बाभूळगाव तालुक्यातील वाई (झोला) येथे मामाच्या गावाला नेण्यात आले. मात्र १४ मार्चच्या सकाळी तिने मामाच्याच घरी विष प्राशन करून आत्महत्या केली. नृत्यात पारंगत असलेल्या रागिणीची ही अकाली एक्झीट रसिक मनाला चटका लावून गेली. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी जाऊन रागिणीने नृत्याच्या मैफीली गाजविल्या होत्या. त्यातून शेकडो पुरस्कारही तिने पटकाविले होते. मंगळवारी १२ वीचा निकाल जाहीर झाला. अनेकांनी उत्सुकतेपोटी रागिणीचा निकाल तपासला. तिला ७८ टक्के गुण मिळाल्याचे कळताच, सर्वांनाच धक्का बसला, आपण नापास होऊ या केवळ भीतीपोटी रागिणीने जीवन संपविल्याने हळहळ व्यक्त होत आहे.