शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

आत्महत्या केलेल्या रागिणीला ७८ टक्के गुण

By admin | Updated: May 30, 2017 17:47 IST

१२ वीचे पेपर खराब गेल्याच्या कारणावरून आत्महत्येसारखा दुर्दैवी मार्ग पत्करणाऱ्या वणीतील रागिणी गोडे या विज्ञान शाखेच्या विद्यार्थीनीला ६५० पैकी ५०४ गुण (७७.५४ टक्के) गुण प्राप्त झाले आहेत.

आॅनलाईन लोकमतवणी(यवतमाळ) : १२ वीचे पेपर खराब गेल्याच्या कारणावरून आत्महत्येसारखा दुर्दैवी मार्ग पत्करणाऱ्या वणीतील रागिणी गोडे या विज्ञान शाखेच्या विद्यार्थीनीला ६५० पैकी ५०४ गुण (७७.५४ टक्के) गुण प्राप्त झाले आहेत. उत्तम नर्तकी असलेली रागिणी नारायण गोडे ही येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयाची विद्यार्थीनी होती. १० वीच्या परीक्षेत तिने ९२.२० टक्के गुण प्राप्त केले होते. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात १२ वीची परीक्षा झाल्यानंतर पेपर खराब गेल्यामुळे रागिणी निराश झाली. ही बाब लक्षात आल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते असलेले तिचे वडील नारायण गोडे, आई सुमित्रा आणि तुषार व हितेश या भावंडांनी तिची समजुतही काढली. मात्र ती त्यानंतरही तणावातच वावरत होती. तिला डॉक्टर व्हायचे होते. यासाठी तिने नागपूर येथील एका नामांकित कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेशही घेतला होता. दरम्यान, तिची बिघडलेली मानसिक स्थिती पाहून वडिल नारायण गोडे यांनी तिला उपचारासाठी यवतमाळ येथे नेले. उपचार घेतल्यानंतर वातावरणात बदल म्हणून तिला बाभूळगाव तालुक्यातील वाई (झोला) येथे मामाच्या गावाला नेण्यात आले. मात्र १४ मार्चच्या सकाळी तिने मामाच्याच घरी विष प्राशन करून आत्महत्या केली. नृत्यात पारंगत असलेल्या रागिणीची ही अकाली एक्झीट रसिक मनाला चटका लावून गेली. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी जाऊन रागिणीने नृत्याच्या मैफीली गाजविल्या होत्या. त्यातून शेकडो पुरस्कारही तिने पटकाविले होते. मंगळवारी १२ वीचा निकाल जाहीर झाला. अनेकांनी उत्सुकतेपोटी रागिणीचा निकाल तपासला. तिला ७८ टक्के गुण मिळाल्याचे कळताच, सर्वांनाच धक्का बसला, आपण नापास होऊ या केवळ भीतीपोटी रागिणीने जीवन संपविल्याने हळहळ व्यक्त होत आहे.