शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

१४ नव्या अभयारण्यांच्या निर्मितीसाठी उपसमिती करणार चाचपणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2021 12:30 IST

Nagpur News राज्यातील वन क्षेत्रात असलेल्या १४ नव्या अभयारण्यांच्या निर्मितीची घोषणा करण्याच्या पडताळणीसाठी तीन उपसमिती गठित करण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देमुनिया, कोलामार्कसह अन्य संवर्धन राखीव क्षेत्रांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राज्य वन्यजीव मंडळाच्या १६ व्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, राज्यातील वन क्षेत्रात असलेल्या १४ नव्या अभयारण्यांच्या निर्मितीची घोषणा करण्याच्या पडताळणीसाठी तीन उपसमिती गठित करण्यात आल्या आहेत. यात नागपूर जिल्ह्यातील मुनियासह गडचिरोली जिल्ह्यातील कोलमार्काचा समावेश आहे.

राज्य वन्यजीव अभ्यास मंडळाच्या ४ डिसेंबर २०२० ला झालेल्या बैठकीत समितीचे अध्यक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर राज्यातील १४ नव्या संवर्धन राखीव क्षेत्र अभयारण्यांच्या निर्मितीसाठी प्रस्ताव आला होता. त्यानंतर मोगरकसा वगळता अन्य १० संवर्धन राखीव क्षेत्राला मान्यता प्रदान केली होती. मोगरकसासाठी अतिरिक्त क्षेत्र वाढविण्याच्या दृष्टीनेही या बैठकीत शिफारस करण्यात आली होती, तसेच काही संवर्धन राखीव क्षेत्रातील भागाला अभयारण्य म्हणून मान्यता देण्यासाठी पडताळणी करण्यासाठी उपसमिती गठित करण्याचे ठरले होते. त्यानुसार ५ आगस्टला वन विभागाने अधिसूचना काढून तीन उपसमित्यांची घोषणा केली आहे. यात राज्य वन्यजीव मंडळाच्या अशासकीय सदस्यांचा समावेश करून त्या क्षेत्रातील अधिकाऱ्यांचाही समावेश करण्यात आला आहे.

अशा आहेत जबाबदाऱ्या

उपसमिती क्रमांक एकमध्ये भोरगड, ममदापूर, अंजनेरी, मुक्ताई भवानी आणि तोरणमाळ या पाच संवर्धन राखीव क्षेत्र आहेत. यासाठी नाशिक येथील मुख्य वन संरक्षक (प्रादेशिक) यांना अध्यक्ष नेमण्यात आले आहे.

उपसमिती क्रमांक दोनमध्ये तिलारी, जोर-जांभळी, पन्हाळगड, चंदगड, विशाळगड, आंबोली-दोडामार्ग आणि मायणी संवर्धन राखीव या सात क्षेत्रांसाठी मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) कोल्हापूर यांना अध्यक्ष नेमण्यात आले आहे.

उपसमिती क्रमांक तीनमध्ये मुनिया संवर्धन राखीव आणि कोलामाका संवर्धन राखीव या दोन क्षेत्रांचा समावेश असून, मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) नागपूर यांना अध्यक्ष नेमण्यात आले आहे. या समितीमध्ये उपवनसंरक्षक (प्रादेशिक) सिरोंचा, पुनम धनवटे, कुंदन हाते, बंडू धोत्रे, किशोर रिठे यांना सदस्य म्हणून तर उपवनसंरक्षक (प्रादेशिक) नागपूर यांना सदस्य सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

समिती तीन महिन्यात अहवाल देणार

येत्या तीन महिन्यात अहवाल देण्याच्या सूचना या उपसमित्यांना देण्यात आल्या आहेत. स्थानिक नागरिकांशी चर्चा करणे व कोणता ताण पडणार आहे, याचा अभ्यास करणे, स्थानिक लोकांचे वनांवरील हक्क आणि सवलतींचा तसेच त्यांच्या उपजीविकेचा अभ्यास करणे आदी बाजूंनी या उपसमितींना जबाबदारी सांभाळावी लागणार आहे.

...

टॅग्स :Tigerवाघ