शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

आरटीईअंतर्गत प्रवेशापासून वंचित विद्यार्थ्यांना मिळणार न्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 20:25 IST

आरटीईच्या प्रथम टप्प्यात लॉटरी लागल्यानंतरही प्रवेशापासून वंचित राहिलेल्या बालकांना पुन्हा प्रवेशाची संधी मिळणार आहे. आरटीईच्या दुसºया टप्प्यात या मुलांना प्रवेश देण्यात येणार आहे. राज्याचे अवर सचिव संतोष गायकवाड यांनी राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोग (एनसीपीसीआर) ला ही माहिती दिली.

ठळक मुद्देदुसऱ्या टप्प्यात मिळणार प्रवेश : चुकीच्या मॅपिंगमुळे प्रवेशात अडचण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आरटीईच्या प्रथम टप्प्यात लॉटरी लागल्यानंतरही प्रवेशापासून वंचित राहिलेल्या बालकांना पुन्हा प्रवेशाची संधी मिळणार आहे. आरटीईच्या दुसºया टप्प्यात या मुलांना प्रवेश देण्यात येणार आहे. राज्याचे अवर सचिव संतोष गायकवाड यांनी राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोग (एनसीपीसीआर) ला ही माहिती दिली.आरटीईच्या पहिल्या टप्प्यात ज्या बालकांची निवड झाली होती. त्यातील काही बालकांचे प्रवेश रद्द करण्यात आले होते. नियमानुसार त्यांच्या घराचे अंतर शाळेपासून एक ते तीन किलोमीटरच्या परिघात येत नाही. नागपूरच नाही तर संपूर्ण राज्यात या अडचणी आल्या होत्या. यासंदर्भात आरटीई अ‍ॅक्शन कमिटीचे मो. शाहीद शरीफ यांनी यासंदर्भात राज्य शासनाला पत्र लिहिले. यात उल्लेख केला की चुकीच्या गुगल मॅपिंगमुळे बालक पात्र असूनही त्याला आरटीईचा लाभ मिळू शकला नाही. या प्रकरणाचा तपास करून गरीब व वंचित वर्गाच्या विद्यार्थ्यांना न्याय देण्याची त्यांनी मागणी केली. शाहीद शरीफ यांच्या पत्राची शिक्षण विभागाने दखल घेतली.शाहीद शरीफ यांनी एनसीपीसीआरलासुद्धा पत्र लिहिले होते. एनसीपीसीआरचे वरिष्ठ समन्वयक रमन गौर यांनी याप्रकरणी राज्य शासनाला पत्र पाठविले. त्यामुळे शिक्षण विभागाने यावर लगेच दखल घेतली.दुसºया टप्प्याच्या प्रक्रियेला उशीरआरटीईच्या पहिल्या टप्प्याची प्रक्रिया १० मे ला संपली. लगेच दुसरी प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले होते. मात्र एक महिना झाल्यानंतरही प्रक्रिया सुरू झाली नाही. प्रक्रियेच्या नावावर अर्जामध्ये सुधार करण्याची संधी पालकांना दिली आहे. शिवाय ज्या मुलांचे आॅनलाईन अर्ज काही कारणास्तव जमा झाले नव्हते. त्यांना पुन्हा अर्ज जमा करण्याची संधी देण्यात आली आहे. लवकरच दुसरा ड्रॉ काढण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे.३९०४ जागेवर झाले प्रवेश६७५ शाळांमध्ये आरटीईच्या ७२०४ जागा आरक्षित करण्यात आल्या होत्या. त्यासाठी २६००० बालकांचे आॅनलाईन अर्ज आले होते. पहिल्या टप्प्यासाठी झालेल्या लॉटरीमध्ये ५७०१ बालकांची निवड करण्यात आली होती. १० मेपर्यंत ३९०४ मुलांनी प्रवेश घेतले होते.

 

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदाStudentविद्यार्थी