शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

विद्यार्थ्यांनो ‘अपडेट’ राहा

By admin | Updated: September 16, 2015 03:27 IST

आजच्या तारखेत तंत्रज्ञानात किंचितही स्थिरता नसून यातील बदलांचा भन्नाट वेग थक्क करणारा आहे.

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा सल्ला : सकारात्मक बदलांसाठी प्रयत्न करानागपूर : आजच्या तारखेत तंत्रज्ञानात किंचितही स्थिरता नसून यातील बदलांचा भन्नाट वेग थक्क करणारा आहे. त्यामुळे या बदलांशी एकरूप होऊन प्रगती करण्यासाठी अभ्यास ही निरंतर प्रक्रिया ठरणार आहे. या वेगामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी स्वत:ला सदैव ‘अपडेट’ ठेवा, असा सल्ला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी विद्यार्थ्यांना दिला. ‘व्हीएनआयटी’च्या (विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी) १३ व्या दीक्षांत समारंभादरम्यान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी विद्यार्थ्यांना आयुष्यासाठी शिदोरी ठरतील असे मौलिक सल्ले दिले.राष्ट्रपती प्रणव मुखर्जी म्हणाले, आजच्या तारखेत ज्ञानासोबतच कौशल्यालादेखील महत्त्व आहे. त्यामुळे बदलते तंत्रज्ञान आत्मसात करताना कौशल्य विकासावरदेखील भर दिला पाहिजे. यातूनच समाज व देशाला प्रगतीच्या शिखरावर नेता येईल. तंत्रज्ञान हे दुधारी तलवारीसारखे आहे. याचा उपयोग मानवजातीच्या कल्याणासाठीच झाला पाहिजे. या कार्यक्रमाला राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी तसेच शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात खासदार अजय संचेती, महापौर प्रवीण दटके, विभागीय आयुक्त अनुपकुमार, महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मोहन खेडकर, महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आदित्यकुमार मिश्रा, तंत्रशिक्षण संचालनालयाचे विभागीय सहसंचालक गुलाबराव ठाकरे यांचा समावेश होता.