शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांची शाळाच असेल दहावी, बारावीचे परीक्षा केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:08 IST

- कोरोना संक्रमणाचा परिणाम : शाळा, कॉलेजलाच करावे लागेल परीक्षांचे नियोजन - नव्या परीक्षा पॅटर्नची घोषणा, बोर्ड पाठवेल प्रश्नपत्रिका ...

- कोरोना संक्रमणाचा परिणाम : शाळा, कॉलेजलाच करावे लागेल परीक्षांचे नियोजन

- नव्या परीक्षा पॅटर्नची घोषणा, बोर्ड पाठवेल प्रश्नपत्रिका

- दहावीच्या प्रॅक्टिकल परीक्षा रद्द, १२ वी विज्ञानचे प्रॅक्टिकल झाले कमी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोना संक्रमणाचा वेग बघता बोर्डाने परीक्षा पॅटर्नमध्ये परिवर्तन केले आहे. शनिवारी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी नव्या पॅटर्नची घोषणा केली. त्यानुसार विद्यार्थी ज्या शाळेत, कनिष्ठ महाविद्यालयात शिकत आहेत, तेथेच त्यांचे परीक्षा केंद्र असणार आहे. पूर्वीप्रमाणे त्यांना दुसऱ्या शाळेत अथवा कॉलेजमध्ये परीक्षा देण्यास जाण्याची गरज पडणार नाही. प्रश्नपत्रिका बोर्ड पाठविणार आहे. शाळा, महाविद्यालयांनाच परीक्षेचे नियोजन करावे लागणार आहे.

या दोन्ही वर्गाच्या परीक्षा ऑफलाईन होणार असल्याचे यावेळी गायकवाड यांनी स्पष्ट केले. दहाव्या वर्गाची लिखित परीक्षा २९ एप्रिल ते २० मे व १२ व्या वर्गाची लिखित परीक्षा २३ एप्रिल ते २१ मेदरम्यान होईल. नव्या पॅटर्ननुसार यावेळी लिखित परीक्षेकरिता वेगळे केंद्र नसतील. विद्यार्थ्यांना संबंधित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातच जाऊन परीक्षा द्यावी लागणार आहे. विशेष म्हणजे, यंदा दहावीची प्रॅक्टिकल परीक्षा होणार नाही. प्रॅक्टिकलऐवजी विद्यार्थ्यांना असाईनमेंटस्‌ दिल्या जातील. हे असाईनमेंटस्‌ २१ मे ते १० जूनदरम्यान जमा करावे लागणार आहेत. १२ व्या वर्गाच्या लिखित परीक्षेनंतर विज्ञान विषयातील विद्यार्थ्यांची प्रॅक्टिकल परीक्षा २२ मे ते १० जूनदरम्यान होतील. कोरोना संक्रमण बघता प्रॅक्टिकलचे प्रमाण कमी करण्यात आले आहे. ही माहिती संबंधित महाविद्यालयांद्वारे विद्यार्थ्यांना दिली जाईल. आर्ट्स, कॉमर्स व व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना लिखित परीक्षेनंतर १५ दिवसाच्या आत असाईनमेंटस्‌ जमा करावे लागणार आहेत. प्रॅक्टिकल किंवा असाईनमेंटस्‌च्या काळात कोणी विद्यार्थी किंवा त्याचे कुटुंबीय कोरोना संक्रमित आढळले किंवा त्यांच्या क्षेत्रात लॉकडाऊन, कंटेन्मेंट झोन, संचारबंदी लागू झाली असेल अशास्थितीत त्यांना १५ दिवसाचा अवधी वाढवून दिला जाईल.

------------

उत्तरपत्रिकेसाठी मिळेल अतिरिक्त वेळ

दरवर्षी ८० अंकांची प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी विद्यार्थ्यांना तीन तासाचा वेळ दिला जात होता. नव्या पॅटर्ननुसार विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेसाठी अर्धा तास अतिरिक्त वेळ दिला जाणार आहे. ४० व ५० गुणांचा पेपर सोडविण्यासाठी १५ मिनिट अतिरिक्त वेळ दिला जाईल. दिव्यांग विद्यार्थ्यांना सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या तुलनेत अधिक वेळ दिला जाईल.

------------

विशेष परीक्षेचे होईल आयोजन

परीक्षेदरम्यान विद्यार्थी कोरोना संक्रमित आढळला किंवा लॉकडाऊन, कंटेन्मेंट झोन, संचारबंदीमुळे परीक्षा देऊ शकला नाही तर त्याच्यासाठी जून महिन्यात विशेष परीक्षेचे आयोजन केले जाईल.

------

पूरक परीक्षेचे आयोजन जुलैमध्ये

बोर्डाकडून पूरक परीक्षेचे आयोजन जुलै-ऑगस्टमध्ये करण्यात येणार आहे. परीक्षेसाठी शहरात निश्चित स्थळांवर व ग्रामीण क्षेत्रात तालुका मुख्यालयातच परीक्षा केंद्र बनविले जातील.

-----------

पालक झाले चिंतामुक्त

परीक्षेबाबत राज्य सरकारने स्थिती स्पष्ट केल्यामुळे पालक चिंतामुक्त झाले आहेत. फेब्रुवारीमध्ये कोरोना संक्रमण वाढायला लागल्याने आणि त्यानंतर लागू झालेल्या टाळेबंदीमुळे पालकवर्ग चिंतित होता. परीक्षा होणार की नाही, ही भीती त्यांना सतावत होती. विद्यार्थ्यांच्या भविष्याबाबतही त्यांचा तणाव वाढत होता.

--

परीक्षेच्या तारखा

दहावीची लिखित परीक्षा : २९ एप्रिल ते २० मे

बारावीची लिखित परीक्षा : २३ एप्रिल ते २१ मे

दहावीची असाईनमेंट : २१ मे ते १० जून

बारावी विज्ञानचे प्रॅक्टिकल : २२ मे ते १० जून

बारावीच्या इतर शाखेतील असाईनमेंट : लिखित परीक्षेनंतर १५ दिवसाच्या आत

.............