शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

वसतिगृहातील ‘त्या’ विद्यार्थ्यांना कुलगुरूंचा ‘अल्टिमेटम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 23:42 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वसतिगृहात नियमबाह्य पद्धतीने राहणाऱ्या विद्यार्थ्यांना कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी ‘अल्टिमेटम’च दिला आहे. मंगळवारी सायंकाळपर्यंत जर विद्यार्थ्यांनी खोल्या रिकाम्या केल्या नाहीत तर त्यांना थेट ‘रस्टिकेट’ करण्याचा इशाराच त्यांनी दिला आहे. विद्यापीठाच्या वसतिगृहांमध्ये अनेक विद्यार्थी वर्षानुवर्षे राहत असून त्यांच्यामुळे नवीन विद्यार्थ्यांना खोल्या उपलब्ध झालेल्या नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

ठळक मुद्देनागपूर विद्यापीठ : मंगळवारपर्यंत खोल्या रिकाम्या केल्या नाहीत तर ‘रस्टिकेट’ करणार : वर्षानुवर्षे राहत आहेत विद्यार्थी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वसतिगृहात नियमबाह्य पद्धतीने राहणाऱ्या विद्यार्थ्यांना कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी ‘अल्टिमेटम’च दिला आहे. मंगळवारी सायंकाळपर्यंत जर विद्यार्थ्यांनी खोल्या रिकाम्या केल्या नाहीत तर त्यांना थेट ‘रस्टिकेट’ करण्याचा इशाराच त्यांनी दिला आहे. विद्यापीठाच्या वसतिगृहांमध्ये अनेक विद्यार्थी वर्षानुवर्षे राहत असून त्यांच्यामुळे नवीन विद्यार्थ्यांना खोल्या उपलब्ध झालेल्या नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.नागपूर विद्यापीठाच्या विधी महाविद्यालय परिसरातील वसतिगृहामध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या ११९ विद्यार्थ्यांची ही समस्या आहे. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी ३० एप्रिलला वसतिगृह रिकामे करावे, असे निर्देश विद्यापीठाकडून देण्यात आले होते. मात्र काही जणांच्या परीक्षा बाकी असल्याने विद्यापीठाने ही मुदत १० जूनपर्यंत वाढविली. मात्र तरीदेखील विद्यार्थी निघाले नाहीत. त्यानंतर ही मुदत १० जुलैपर्यंत वाढविण्यात आली. तोपर्यंत नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांचे वसतिगृहासाठी अर्ज येण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे ११९ विद्यार्थ्यांनी १० आॅगस्टपर्यंत खोल्या रिकाम्या करण्याचे स्पष्ट निर्देश प्रशासनाने दिले. तरीदेखील विद्यार्थ्यांनी खोल्या सोडल्या नाहीत. अखेर नाईलाजाने विनापरवानगी राहणाºया विद्यार्थ्यांच्या खोल्यांना सुरक्षारक्षकांनी टाळे ठोकले.या मुद्यावरुन विद्यार्थ्यांनी दोनदा विद्यापीठात आंदोलन केले. एकदा तर ‘कॅम्पस’च्या प्रवेशद्वाराला टाळेदेखील ठोकले.सोमवारी विद्यार्थ्यांनी कुलगुरूंची भेट घेतली व वसतिगृहात राहू देण्याची विनंती केली. मात्र कुलगुरूंनी ही विनंती फेटाळून लावली. एकदा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करताना वसतिगृहात राहिलेल्या विद्यार्थ्याला परत दुसºया पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रवेश घेतल्यानंतर नियमानुसार लगेच वसतिगृह देता येत नाही. त्यामुळे पहिल्यांदा प्रथम वर्ष प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांना संधी दिली जाणार आहे. त्यानंतर जर काही जागा रिक्त राहिल्यास दुसºयांदा पदव्युत्तर प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी दिली जाईल, असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. ११९ विद्यार्थ्यांपैकी ८० जणांनी दुसरीकडे राहण्याची सोय केली आहे. मात्र इतर विद्यार्थ्यांनी अद्याप आपले सामान नेलेले नाही. या विद्यार्थ्यांनी मंगळवारपर्यंत खोल्या रिकाम्या केल्या नाहीत तर थेट ‘रस्टिकेट’च करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.नवे विद्यार्थी खोळंबलेदरम्यान, विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया आटोपली असून, बाहेरील अनेक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. वसतिगृहाच्या खोल्यांचे या विद्यार्थ्यांना कागदोपत्री वाटप झाले आहे. मात्र जुन्या विद्यार्थ्यांनी अद्याप खोल्या रिकाम्या केल्या नसल्यामुळे नवीन विद्यार्थी तेथे राहायला जाऊ शकलेले नाहीत. जुन्या विद्यार्थ्यांनी नवीन विद्यार्थ्यांचा विचार करायला हवा, असे कुलगुरूंनी सांगितले.आता कशाला हवे वसतिगृह?वसतिगृहात वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी काही जणांनी तर तिस ऱ्यांदा पदव्युत्तर पदवीसाठी प्रवेश घेतला आहे. काही जण तर नोकरीदेखील करीत आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे काही जण तर कुठलेच विद्यार्थी नसतानादेखील तेथे राहत आहेत. अशा विद्यार्थ्यांना वसतिगृह कशाला हवे व नव्यांना संधी मिळणार कधी, असा प्रश्न कुलगुरूंनी उपस्थित केला.

 

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठStudentविद्यार्थी