शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना करावी लागते आठ किमी पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:08 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क बेसूर : काेराेना संक्रमण कमी हाेताच राज्य शासनाच्या आदेशान्वये इयत्ता सातवी ते बारावीपर्यंतचे वर्ग आणि लांब ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

बेसूर : काेराेना संक्रमण कमी हाेताच राज्य शासनाच्या आदेशान्वये इयत्ता सातवी ते बारावीपर्यंतचे वर्ग आणि लांब पल्ल्याची बससेवा सुरू करण्यात आली. आखूड पल्ल्याच्या बसेस अजूनही बंद असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी व शाळेतून घरी परत जाण्यासाठी राेज पाच ते आठ किमी म्हणजेच १० ते १६ किमी पायपीट करावी लागते. त्यामुळे आखूड पल्ल्याच्यी बससेवा तातडीने सुरू करण्याची मागणी विद्यार्थ्यांसह पालकांनी केली आहे.

सिर्सी हे उमरेड तालुक्यातील माेठ्या व महत्त्वाच्या गावापैकी एक गाव आहे. ही माेठी बाजारपेठ असून, येथे विविध शासकीय कार्यालये, बँक, दवाखाना तसेच शाळा, महाविद्यालय आहे. त्यामुळे बोथली, किनाळा, केसलापार, मनोरी यासह अन्य गावांमधील विद्यार्थी येथे शिक्षणासाठी तर शेतकरी व नागरिक शासकीय कामे व खरेदीसाठी सिर्सी येथे नियमित येतात. ही गावे सिर्सीपासून पाच ते आठ किमी अंतरावर आहेत.

पूर्वी या गावांमधील विद्यार्थी सिर्सी येथे शाळांमध्ये बसने यायचे व घरी परत जायचे. काेराेना संक्रमणामुळे बसेस बंद झाल्या. शिवाय, मध्यंतरी शाळाही बंद हाेत्या. त्यामुळे ही समस्या फारशी जाणवली नाही. हल्ली राज्य शासनाने इयत्ता सातवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू केले. मात्र, आखूड पल्ल्याच्या व छाेट्या गावांना जाेडणाऱ्या बसेस सुरू केल्या नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना राेज पायपीट करीत शाळेत यावे लागते आणि घरी परत जावे लागते.

मुलामुलींना शाळेत ये-जा करताना त्रास हाेत असून, या भागातील उमरेड-सिर्सी-बेला ही बससेवा तातडीने सुरू करावी, अशी मागणी प्रदीप डेकाटे, सचिन भोयर, बोथली, सोमेश्वर धारणे, सरपंच मंगला पोहधरे, किन्हाळा, निखिल गळमडे, एजाज पठाण, रोशन मेहरकुरे, भूषण भोयर, अंकित डाखोडे, विशाल राऊत यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी केली आहे.

...

विद्यार्थ्यांच्या जीवितास धाेका

सिर्सी परिसरात रानडुकरांचा वावर वाढला आहे. ही रानडुकरे पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसानही करतात. विद्यार्थी व विद्यार्थिनी शाळेत येताना तसेच शाळेतून घरी परत जाताना गटागटाने जातात. त्या राेडलगत दाेन्ही बाजूंनी शेती व झुडपे आहेत. या रानडुकरांमुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास धाेका उद्भवण्याची शक्यताही काही जाणकार व्यक्तींनी व्यक्त केली आहे.

240921\img_20210924_154755_hdr.jpg

पाई प्रवास करीत असताना किनाळा येथील विध्यार्थी