शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

इंग्रजीचा पेपर लिहून लिहून विद्यार्थी दमले; साेपा वाटला पण कठीण झाला 

By निशांत वानखेडे | Updated: February 21, 2024 17:16 IST

बारावीच्या परीक्षेला बुधवारपासून सुरुवात झाली आणि पहिल्याच दिवशी मुलांचा इंग्रजी या कठीण वाटणाऱ्या विषयाशी सामना झाला.

निशांत वानखेडे, नागपूर : बारावीच्या परीक्षेला बुधवारपासून सुरुवात झाली आणि पहिल्याच दिवशी मुलांचा इंग्रजी या कठीण वाटणाऱ्या विषयाशी सामना झाला. टेंशन घेऊनच परीक्षा हॉलमध्ये गेलेल्या विद्यार्थ्यांवर पेपर संपवून बाहेर पडताना काहीसे दडपण आल्याचे जाणवले. पेपर सोपा होता पण खुपच वर्णनात्मक होता. लिहून लिहून हात दुखले, दमायला आले पण पूर्ण प्रश्न सोडवायला दमछाक झाल्याची प्रतिक्रिया मुलांनी हॉलमधून बाहेर पडताना दिली.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने बारावीच्या परीक्षेला बुधवारपासून सुरुवात झाली. नागपूर जिल्ह्यातून ६६ हजार ४४५ विद्यार्थी यंदा परीक्षा देत असून शहरातील ३९,८३४ आणि ग्रामीण भागातील २६,२७९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. शहरात ८५ आणि ग्रामीण भागात ८३ केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. इंग्रजीचा पेपर असला की विद्यार्थ्यांवर दडपण असते. विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी हा विषय फारसा कठीण वाटत नाही पण कला व वाणिज्य शाेखतील विद्यार्थ्यांसाठी टेंशन देणारा असताे. मात्र बुधवारचा पेपर शाखानिहाय फरकापेक्षा लेखनाच्या गतीवर अवलंबून ठरला. ज्यांची लिहिण्याची गती चांगली, त्यांच्या साठी समाधानकारक तर लेखनगती कमी असलेल्यांची मात्र दमछाक झाली.

खुपच वर्णनात्मक, लिहून हात दुखले :

पेपर खुप ‘लेंदी’ असल्याचे मुलांचे म्हणणे हाेते. प्रश्नपत्रिकेतील निबंध असलेल्या पहिल्याच प्रश्नाचे उत्तर साेडविताना खुप वेळ लागल्याचे काही विद्यार्थ्यांनी सांगितले. शेवटचा ‘नाॅव्हेल’वरील प्रश्नही दमायला लावणारा हाेता. उत्तर साेपे हाेते पण लिहावे खुप लागल्याचे मुलांनी सांगितले. लिहून लिहून हात दुखले पण पेपर काही पूर्ण झाला नाही, असेही काहींनी सांगितले.

वेळेचे नियोजन गडबडले :

खुप वर्णनात्मक असल्याने वेळेचे नियाेजन गडबडल्याचे काहींनी सांगितले. काेणता प्रश्न आधी साेडवायचा याचा विचार करून साेडविणे आवश्यक होते. काही प्रश्न सोडवायला खुप चेळ लागल्याने पूर्ण पेपर साेडविता आला नाही, असे काहींचे म्हणणे हाेते, तर काही विद्यार्थ्यांनी शेवटच्या अर्ध्या तासात घाईघाईत पेपर पूर्ण केल्याचे सांगितले. लिहिण्याची गती चांगली असलेल्यांनी मात्र पेपर खुप चांगला गेल्याचे सांगितले.

मिळालेले १० मिनिटेही कमी पडले :

यावेळी पेपर संपल्यानंतर अतिरिक्त १० मिनिटे विद्यार्थ्यांना देण्यात आले हाेते. मात्र हा वेळही कमी पडल्याची भावना काहींनी व्यक्त केली. पेपर साेपा असला तरी लिहायला कठीण झाल्याचे त्यांचे म्हणणे हाेते.

टॅग्स :nagpurनागपूरHSC / 12th Exam12वी परीक्षा