शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

इंग्रजीचा पेपर लिहून लिहून विद्यार्थी दमले; साेपा वाटला पण कठीण झाला 

By निशांत वानखेडे | Updated: February 21, 2024 17:16 IST

बारावीच्या परीक्षेला बुधवारपासून सुरुवात झाली आणि पहिल्याच दिवशी मुलांचा इंग्रजी या कठीण वाटणाऱ्या विषयाशी सामना झाला.

निशांत वानखेडे, नागपूर : बारावीच्या परीक्षेला बुधवारपासून सुरुवात झाली आणि पहिल्याच दिवशी मुलांचा इंग्रजी या कठीण वाटणाऱ्या विषयाशी सामना झाला. टेंशन घेऊनच परीक्षा हॉलमध्ये गेलेल्या विद्यार्थ्यांवर पेपर संपवून बाहेर पडताना काहीसे दडपण आल्याचे जाणवले. पेपर सोपा होता पण खुपच वर्णनात्मक होता. लिहून लिहून हात दुखले, दमायला आले पण पूर्ण प्रश्न सोडवायला दमछाक झाल्याची प्रतिक्रिया मुलांनी हॉलमधून बाहेर पडताना दिली.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने बारावीच्या परीक्षेला बुधवारपासून सुरुवात झाली. नागपूर जिल्ह्यातून ६६ हजार ४४५ विद्यार्थी यंदा परीक्षा देत असून शहरातील ३९,८३४ आणि ग्रामीण भागातील २६,२७९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. शहरात ८५ आणि ग्रामीण भागात ८३ केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. इंग्रजीचा पेपर असला की विद्यार्थ्यांवर दडपण असते. विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी हा विषय फारसा कठीण वाटत नाही पण कला व वाणिज्य शाेखतील विद्यार्थ्यांसाठी टेंशन देणारा असताे. मात्र बुधवारचा पेपर शाखानिहाय फरकापेक्षा लेखनाच्या गतीवर अवलंबून ठरला. ज्यांची लिहिण्याची गती चांगली, त्यांच्या साठी समाधानकारक तर लेखनगती कमी असलेल्यांची मात्र दमछाक झाली.

खुपच वर्णनात्मक, लिहून हात दुखले :

पेपर खुप ‘लेंदी’ असल्याचे मुलांचे म्हणणे हाेते. प्रश्नपत्रिकेतील निबंध असलेल्या पहिल्याच प्रश्नाचे उत्तर साेडविताना खुप वेळ लागल्याचे काही विद्यार्थ्यांनी सांगितले. शेवटचा ‘नाॅव्हेल’वरील प्रश्नही दमायला लावणारा हाेता. उत्तर साेपे हाेते पण लिहावे खुप लागल्याचे मुलांनी सांगितले. लिहून लिहून हात दुखले पण पेपर काही पूर्ण झाला नाही, असेही काहींनी सांगितले.

वेळेचे नियोजन गडबडले :

खुप वर्णनात्मक असल्याने वेळेचे नियाेजन गडबडल्याचे काहींनी सांगितले. काेणता प्रश्न आधी साेडवायचा याचा विचार करून साेडविणे आवश्यक होते. काही प्रश्न सोडवायला खुप चेळ लागल्याने पूर्ण पेपर साेडविता आला नाही, असे काहींचे म्हणणे हाेते, तर काही विद्यार्थ्यांनी शेवटच्या अर्ध्या तासात घाईघाईत पेपर पूर्ण केल्याचे सांगितले. लिहिण्याची गती चांगली असलेल्यांनी मात्र पेपर खुप चांगला गेल्याचे सांगितले.

मिळालेले १० मिनिटेही कमी पडले :

यावेळी पेपर संपल्यानंतर अतिरिक्त १० मिनिटे विद्यार्थ्यांना देण्यात आले हाेते. मात्र हा वेळही कमी पडल्याची भावना काहींनी व्यक्त केली. पेपर साेपा असला तरी लिहायला कठीण झाल्याचे त्यांचे म्हणणे हाेते.

टॅग्स :nagpurनागपूरHSC / 12th Exam12वी परीक्षा