शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

पुतळ्याच्या देखभालीला विद्यार्थ्यांचा हातभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:08 IST

मनपा-विद्यापीठात सामंजस्य करार: वर्षभरात ७५० विद्यार्थ्यांना अग्निशमन प्रशिक्षण लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहरातील थोर पुरुषांच्या पुतळ्यांची दैनावस्था आहे. ...

मनपा-विद्यापीठात सामंजस्य करार: वर्षभरात ७५० विद्यार्थ्यांना अग्निशमन प्रशिक्षण

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शहरातील थोर पुरुषांच्या पुतळ्यांची दैनावस्था आहे. मनपाची यासाठी सक्षम अशी यंत्रणा नाही. याचा विचार करता पुतळ्यांची देखभाल करण्याची जबाबदारी राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) विद्यार्थ्यांवर सोपविण्यात आली आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयातील एनएसएसचे विद्यार्थी आता नागपूर शहरातील पुतळ्यांची देखभाल करतील. महापौर दयाशंकर तिवारी यांच्या संकल्पनेतील मनपाच्या या प्रस्तावाला विद्यापीठाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. महापालिका व नागपूर विद्यापीठात सामंजस्य करार झाला आहे. लवकरच महाविद्यालयांना या जबाबदारीचे वाटप होणार आहे.

यासंदर्भात महापौरांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी महापौर कक्षात बैठक पार पडली. उपमहापौर मनीषा धावडे, स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर, सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे, अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे, उपायुक्त विजय देशमुख, मिलिंद मेश्राम, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजू हिवसे, रासेयोचे संचालक डॉ. सोपान देव पिसे, कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण आदी उपस्थित होते.

मनपा क्षेत्रात ६८ पुतळे आणि १४ स्मारके आहेत. या पुतळ्यांची आणि स्मारकांची देखभाल लोकसहभागातून व्हावी, अशी संकल्पना मांडली. हा प्रस्ताव आपण कुलगुरूंसमोर मांडला. प्रस्तावाला त्यांनी होकार देत विद्यापीठाच्या बैठकीत त्याला मंजुरी दिली. शहरातील पुतळ्यांच्या परिसरात जी महाविद्यालये आहेत, त्यांना पुतळ्यांचे पालकत्व देऊन रासेयोचे विद्यार्थी मनपाच्या अग्निशमन विभाग आणि स्थावर विभागाशी समन्वयन करून पुतळ्यांची निगा राखेल. या मोबदल्यात मनपातर्फे विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल. या उपक्रमात दरवर्षी सहभागी होणाऱ्या सुमारे ७५० विद्यार्थ्यांना मनपाच्या अग्निशमन महाविद्यालयाच्या माध्यमातून अग्निशमन प्रशिक्षण देण्यात येईल.

विद्यापीठांतर्गत असलेल्या चार जिल्ह्यांतील महापालिका, नगरपालिका क्षेत्रातही जर विद्यापीठ असा उपक्रम राबवित असेल तर नागपूर मनपाचा अग्निशमन विभाग तेथील विद्यार्थ्यांनाही प्रशिक्षण देईल, असेही महापौरांनी यावेळी सुचविले.

डॉ. राजू हिवसे यांनी या उपक्रमाचे स्वागत करीत शहरात जेवढे पुतळे आहे, त्या व्यक्तींची माहिती देणारे पुस्तक विद्यापीठातर्फे प्रकाशित करण्याचा मानस व्यक्त केला. प्रारंभी मिलिंद मेश्राम यांनी उपक्रमाची पार्श्वभूमी विशद केली. हा प्रकल्प राबविण्यासाठी मनपा आणि विद्यापीठांच्या अधिकाऱ्यांची समिती स्थापन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.