शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

विद्यार्थी संघ निवडणुका : निवडणूक लढायचीय आधी पास व्हा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 01:17 IST

दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर राज्य शासनाने महाविद्यालय व विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या निवडणुकीची नियमावली जाहीर केली आहे. यानुसार निवडणूक लढण्यासाठी उत्तीर्ण विद्यार्थीच पात्र ठरणार आहे. जो विद्यार्थी अनुत्तीर्ण होईल तो निवडणूक लढू शकणार नाही. सरकारच्या या नियमांमुळे विद्यार्थी संघाच्या माध्यमातून नेता बनण्याची स्वप्ने पाहणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांच्या हाती निराशा लागली आहे.

ठळक मुद्देअनुत्तीर्ण विद्यार्थी राहू शकणार नाहीत उमेदवार

नागपूर : दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर राज्य शासनाने महाविद्यालय व विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या निवडणुकीची नियमावली जाहीर केली आहे. यानुसार निवडणूक लढण्यासाठी उत्तीर्ण विद्यार्थीच पात्र ठरणार आहे. जो विद्यार्थी अनुत्तीर्ण होईल तो निवडणूक लढू शकणार नाही. सरकारच्या या नियमांमुळे विद्यार्थी संघाच्या माध्यमातून नेता बनण्याची स्वप्ने पाहणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांच्या हाती निराशा लागली आहे.राज्य शासनाने निश्चित केलेल्या नियमांनुसार निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असलेला उमेदवार हा महाविद्यालय किंवा विद्यापीठाचा नियमित विद्यार्थी असला पाहिजे. कुठल्याही विषयात ‘एटीकेटी’ असेल तरी तो उमेदवार म्हणून उभा राहू शकतो. मात्र पूर्ण अनुत्तीर्ण झाला असेल तर मात्र तो लढण्यास पात्र राहणार नाही. उमेदवाराचे कमाल वय हे ३० सप्टेंबर रोजी २५ वर्षांहून अधिक नको व तो परीक्षेत ‘कॉपी’ करणे किंवा इतर बेकायदेशीर कृत्यात अडकलेला नको, असेदेखील राज्य शासनाने नियमावली स्पष्ट केले आहे.विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत हुशार व गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये फारसा उत्साह नसतो. या अगोदर महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४ च्या अंतर्गत निवडणुकीऐवजी निवड प्रक्रियेवर भर देण्यात आला होता. या प्रक्रियेला नवीन पद्धतीने लागू करण्यात आले आहे. विद्यार्थी संघटनांसाठी असे पात्र उमेदवार शोधणे ही एक मोठी परीक्षाच राहणार आहे.या सत्रात निवडणुका अशक्यराज्य शासनातर्फे घोषित नियमावलीनुसार यंदाच्या सत्रात निवडणुका घेणे अशक्यच असल्याचे चित्र आहे. याऐवजी निवड प्रक्रिया राबविण्यात येण्याची शक्यता आहे. ही प्रक्रिया डिसेंबरशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. सद्यस्थितीत महाविद्यालयांमध्ये दिवाळीच्या सुट्या लागलेल्या आहेत. सोबतच हिवाळी परीक्षादेखील सुरू आहेत. नोव्हेंबर महिन्यात विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ आयोजित करण्यात आला आहे.अशी होईल निवडणूक प्रक्रियामहाविद्यालयाचे प्राचार्य हे निवडणूक अधिकारी असतील. विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूंशी चर्चा केल्यानंतर विद्यार्थी विकास संचालक एखाद्या शिक्षकाला निवडणूक अधिकारी म्हणून नेमतील. मतदान मतपत्रिकेद्वारे होईल व प्राधान्यक्रमाने मतदान होईल. एका महाविद्यालयातून पाच जागांसाठी निवडणूक होईल.खर्चाची मर्यादा ५ हजारांचीनिवडणुकीसाठी असलेली आचारसंहितादेखील निश्चित झाली आहे. निवडणुकीदरम्यान कुठल्याही टप्प्यात उमेवादारांचे ‘पॅनल’ बनविण्यात येणार नाही. प्रतिनिधी निवडणुकीसाठी हजार रुपये तर अध्यक्ष, सचिव, महिला प्रतिनिधी व आरक्षित प्रवर्गातील उमेदवारासाठी खर्चाची सीमा ५ हजार रुपये ठरविण्यात आली आहे. कुठलाही उमेदवार निवडणुकीदरम्यान धर्म, जाती, सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, व्यक्तीचे चिन्ह किंवा छायाचित्राचा वापर करणार नाही. तसेच महाविद्यालय परिसरात रॅली किंवा संमेलन आयोजित करण्याची परवानगी देण्यात येणार नाही. माईक व वाहनाचा उपयोग करण्याचीदेखील परवानगी राहणार नाही. निवडणूक अधिकाऱ्याने निश्चित केलेल्या जागेवरच ‘पोस्टर’ लावावे लागतील.

 

टॅग्स :Studentविद्यार्थीElectionनिवडणूक