शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

संपाचा जनसामान्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 01:36 IST

सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा, या मागणीसाठी एसटी कर्मचाºयांनी राज्यव्यापी संप पुकारला आहे. संपामुळे कर्मचाºयांची दिवाळी अंधारातच गेली तर खासगी वाहतूकदार प्रवाशांच्या अडचणींचा फायदा घेत भाडे आकारत आहेत.

ठळक मुद्देगणेशपेठ बसस्थानक पडले ओस प्रवाशांची सुरक्षा धोक्यात खासगी वाहतूकदारांची चांदी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा, या मागणीसाठी एसटी कर्मचाºयांनी राज्यव्यापी संप पुकारला आहे. संपामुळे कर्मचाºयांची दिवाळी अंधारातच गेली तर खासगी वाहतूकदार प्रवाशांच्या अडचणींचा फायदा घेत भाडे आकारत आहेत. एरवी हातात स्टेअरींग आणि तिकिटाची मशीन घेऊन बसमध्ये ड्युटी करणारे एसटीचे कर्मचारी मागील चार दिवसांपासून ड्युटी नसल्यामुळे गणेशपेठ आगाराच्या परिसरात थांबून आहेत. दरम्यान चौथ्या दिवशी संपकर्त्या कर्मचाºयांनी भजनाच्या माध्यमातून आपल्या मागण्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी कर्मचाºयांनी ढोल आणि टाळ मृदुंगाची खास व्यवस्था केली होती.ग्रामीण भागातील नागरिकांना मनस्तापएसटीच्या संपाचा फटका खºया अर्थाने ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक बसला. खेडेगावातील प्रवास व्यवस्था बºयाच अंशी एसटीवर अवलंबून असते. त्यामुळे गावापर्यंत येणारी एसटी बंद झाल्याने त्यांना गावावरून इतर साधने मिळतील अशा मोक्याच्या ठिकाणी पायी यावे लागते. त्यानंतरही खासगी साधने वेळेवर मिळतील याचा भरवसा नाही. विशेषत: काळीपिवळी, ट्रॅक्स अशी प्रवासी वाहने मार्गावरून धावतात. मात्र वाहनचालक गाडी भरून प्रवासी मिळेपर्यंत वाहने सोडत नाही. त्यामुळे अर्धा-एक तास वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नाही. गाडीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी अक्षरश: कोंबले जातात. चालकांच्या सीटवरही प्रवाशांना बसवून असुरक्षितपणे भरधाव वेगाने गाडी चालविली जाते. दूरचा प्रवास करणारे अधिक प्रवासी नसल्यास मध्येच बसलेल्या प्रवाशांना उतरवून दुसºया गाडीने जाण्याचे सांगितले जाते. या प्रकारामुळे सामान्य नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो आहे.भाडेवाढीमुळे होत आहेत भांडणेएसटी सुरू असताना खाजगी प्रवासी वाहने एसटीच्या तिकिटांपेक्षा कमी पैसे प्रवाशांकडून घेत असतात. मात्र संपामुळे एसटी बंद झाल्याने नागरिकांकडून अधिक पैसे उकळले जात आहेत. कुही ते नागपूरपर्यंत आधी ४० रुपये घेतले जायचे, मात्र संप सुरू होताच ६० ते ७० रुपये आकारले जात आहेत. अडचणीच्या काळात त्यापेक्षा अधिक पैसे घेतले जात आहेत. यामुळे प्रवासी आणि वाहनचालकांमध्ये भांडणाचे प्रकार होत आहेत.रुग्ण व ज्येष्ठांचे हालया संपामुळे विशेषत: अर्ध्या तिकिटाने प्रवास करणाºया ज्येष्ठ नागरिकांना आणि उपचारासाठी शहराकडे धाव घेणाºया रुग्णांना चांगलाच फटका बसला आहे. रुग्णाला सुरक्षितपणे प्रवास आवश्यक असतो. मात्र खासगी वाहनांमध्ये गर्दीत बसूनच त्यांना प्रवास करावा लागत आहे. एखाद्याला जखम असल्यास अधिकच त्रास सहन करावा लागतो आहे. अर्ध्या तिकीटने प्रवास करणाºया गरीब ज्येष्ठ नागरिकांना अधिकचे पैसे मोजावे लागत असल्याने त्यांनाही मनस्ताप होत आहे.२०० कर्मचारी पडले अडकूनएसटी महामंडळाच्या गणेशपेठ आगारात सोमवारी रात्री बाहेरगावावरून एसटीची बस घेऊन आलेले कंडक्टर, ड्रायव्हर मागील चार दिवसांपासून अडकून पडले आहेत. दिवाळीचा सण सुरू असल्यामुळे आपण आपल्या कुटुंबापासून दूर असल्याचा भाव त्यांच्या चेहºयावर स्पष्ट जाणवत आहे. नागपुरात कुणीच राहत नसल्यामुळे हे कर्मचारी आणखीनच अडचणीत सापडले आहेत. साधारणत: ड्युटीवर जाताना कंडक्टर, ड्रायव्हरच्या खिशात मोजके पैसे असतात. त्यामुळे चार दिवसांपासून ते नागपुरात मुक्कामी असल्यामुळे त्यांच्या भोजनाची व्यवस्था कशी होईल हा प्रश्न असताना नागपुरातील स्थानिक एसटी कर्मचाºयांनी आपली जबाबदारी ओळखून या २०० कर्मचाºयांच्या भोजनाची व्यवस्था केली आहे. त्यासाठी कर्मचारी स्वेच्छेने पैसे गोळा करून सकाळ-सायंकाळी भोजन तयार करीत असल्यामुळे या कर्मचाºयांची मोठी सुविधा झाली आहे. यासाठी एसटी महामंडळाचे स्थानिक कर्मचारी अजय हट्टेवार, शशिकांत वानखेडे, पुरुषोत्तम इंगोले, अरुण भागवत, सुनील राठोड, निशिकांत घोंडसे, अतुल निंबाळकर, प्रशांत बोकडे, माधुरी ताकसांडे, सविता केवाळे, प्रज्ञाकर चंदनखेडे, दिलीप महाजन, दिलीप माहुरे, दीपक बागेश्वर आदींनी पुढाकार घेतला आहे.तर कुटुंबासह जेलभरो करणारप्रवाशांना वेठीस धरणे हे आमचे धोरण नाही. प्रवासी हे आमचे दैवत आहे. सरकारने तोडगा काढावा. प्रवाशांची सोय शासनाने जरूर करावी परंतु त्यांच्या सुरक्षेचाही विचार करावा. सरकार व प्रशासनाने यावर तातडीने तोडगा काढावा. हा संप असाच दीर्घकाळ चालला तर कृती समिती कुटुंबासह जेलभरो आंदोलन करेल.- अजय हट्टेवार , विभागीय सचिव, एसटी कामगार संघटनासरकार व प्रशासनाने लादलेला संपसंघटनेच्यावतीने आम्ही ४० दिवसांपूर्वी संपाची नोटीस दिली होती. त्यानंतर १४ दिवसांची नोटीस दिली. परंतु शासन व प्रशासनाने काहीही पाऊल उचलले नाही. चर्चाही केली नाही. एक दिवसापूर्वी थेट मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली. त्यात निर्णय होऊ शकला नाही. दुसरीकडे आमचे पालक असलेले परिवहन मंत्री यांनी पुढाकार घेऊन आमची बाजू ऐकून घेण्याची गरज होती. परंतु तसे न करता त्यांनी चिथावणीखोर वक्तव्य केले. त्यामुळे हा संप एसटी कर्मचारी आणि प्रवाशांवर शासन आणि प्रशासनाने लादलेला आहे.- सुभाष गोजे , राज्य प्रसिद्धी प्रमुख, महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक)भाऊ-बहिणीच्या प्रेमात उभा ठाकला संपबसस्थानकावरून परतल्या बहिणी :-तर ओवाळणीला मुकतील अनेक भाऊलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बहीण-भावाच्या पवित्र प्रेमाचा मंगल आणि उत्कृष्ट सण म्हणजे भाऊबीज. सासूरवाशीण बहीण जेव्हा भाऊबीजेला भावाच्या घरी येते तेव्हा ती एकटी येत नाही. तिच्यासोबत येतात आनंद, उत्साह आणि चैतन्य. ओवाळणीच्या ताटात तेवणाºया पणत्या करीत असतात भावाच्या दीर्घायुष्याची कामना. हे आनंदी चित्र तसे दरवर्षीचेच. यात कधी खंड पडत नाही. पण, यंदा मात्र भाऊ-बहिणीच्या या प्रेमात एसटीचा संप उभा ठाकला आणि पहिल्यांदा ओवाळणीला मुकावे लागले. संप मिटला असेल या भाबड्या अपेक्षेत भावाच्या गावाला जाण्यासाठी आलेल्या अनेक बहिणी निराश मनाने बसस्थानकावरून परत फिरल्या. यावेळी लोकमतने नागपूर बसस्थानकावर अनुभवलेली त्यांच्या मनाची अवस्था शब्दातीत आहे. यातील अनेक महिला ग्रामीण भागातल्या होत्या. आधीच घरची आर्थिक स्थिती बेताची. दोन वेळच्या अन्नाचा संघर्ष पाचवीलाच पुजलेला. तरीही भावाच्या घरी जाताना रिकाम्या हाताने कसे जावे म्हणून अनेकींनी पदरमोड करून भेटवस्तू घेतली. एसटी ही परडणारी वाहन सेवा. पण, एसटीच्या कर्मचाºयांनी संप पुकारल्याने या महिलांची कोंडी झाली. खासगी वाहनाने जातो म्हटले तर अतिरिक्त पैसे जवळ नाही. तिकडे खासगी वाहनधारकांनीही अव्वाच्या सव्वा भाव वाढवलेले. आपण श्रीमंत असतो, आपल्याकडेही पैसे असते तर भाऊबीजेत खंड पडला नसता, अशी स्त्रीमनाची हळवी खंत या महिला व्यक्त करीत होत्या. यात जशा रायपूर येथील रहिवासी उमा तागडे होत्या तशाच मानेवाडा परिसरात राहणाºया मंदा भारस्करही होत्या. सर्वांच्या नजरा एसटी बसच्या रुतलेल्या चाकावर खिळल्या होत्या आणि बस एका क्षणालाही पुढे सरकायला तयार नव्हती.