शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

विद्यार्थ्यांतील ताणतणाव, निराशा दूर करणार : ‘समुपदेशन सेल’ अनिवार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 10:33 IST

विद्यार्थ्यांमधील निराशा दूर करण्यासाठी प्रत्येक व्यावसायिक महाविद्यालयात ‘समुपदेशन सेल’ अनिवार्य करण्यात आला आहे.

ठळक मुद्देमहाविद्यालये वाढविणार ‘मनोबल’

योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्पर्धात्मक युगामध्ये विद्यार्थ्यांसमोर अभ्यासासोबतच कौशल्यविकासाचादेखील ताण असतो. अनेकांना योग्य मार्गदर्शनाअभावी निराशेचा सामना करता येत नाही व ते नको तो निर्णय घेऊन बसतात. मात्र मनातील ताणतणाव दूर करण्यासाठी विद्यार्थ्यांना फारसे दूर जावे लागणार नाही. विद्यार्थ्यांना पुस्तकी शिक्षण न देता आता महाविद्यालयांना विद्यार्थ्यांना जगण्याचे धडेदेखील द्यावे लागणार आहे. विद्यार्थ्यांमधील निराशा दूर करण्यासाठी प्रत्येक व्यावसायिक महाविद्यालयात ‘समुपदेशन सेल’ अनिवार्य करण्यात आला आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्याची जबाबदारी महाविद्यालयांकडे राहणार आहे हे विशेष.व्यावसायिक अभ्यासक्रमांमधील विद्यार्थ्यांसमोर आव्हानांचा ताण असतो. भविष्यातील संधी, ‘प्रोजेक्ट’ पूर्ण करण्याची धावपळ, अभ्यासाचे ओझे यांच्या विचाराने अनेक विद्यार्थी प्रचंड तणावाने ग्रस्त असतात. तीव्र स्पर्धात्मक युगामुळे ही निराशेची भावना टोकाला पोहोचते अन् त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या एकूणच जडणघडणीवर होतो. हीच बाब लक्षात घेऊन ‘डीटीई’तर्फे (डायरेक्टोरेट आॅफ टेक्निकल एज्युकेशन) पुढाकार घेण्यात आला आहे. ‘डीटीई’ने व्यावसायिक अभ्यासक्रम संचालित करणाऱ्या सर्व महाविद्यालयांना ‘समुपदेशन सेल’ स्थापन करण्याचे निर्देशच दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांच्याशी योग्य संवाद साधावा व विद्यार्थ्यांना योग्य सूचना द्याव्या, अशी सूचनादेखील देण्यात आली आहे.

मानसिक आरोग्य जपावे लागणारनागपूर विभागीय सहसंचालक कार्यालयाकडून याबाबत महाविद्यालयांना सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य निरोगी कसे राहील, याबाबत महाविद्यालयांना पावले उचलावी लागणार आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी सांघिक चर्चासत्रे, मार्गदर्शनपर व स्फूर्ती देणारी व्याख्याने, उद्योजकता वाढविणारी शिबिरे नियमितपणे आयोजित करावी लागणार आहेत. विशेष म्हणजे महाविद्यालयांना याचा नियमितपणे विभागीय सहसंचालकांना दर महिन्याच्या ३० तारखेला अहवाल सादर करावा लागणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र