शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

विद्यार्थ्यांतील ताणतणाव, निराशा दूर करणार : ‘समुपदेशन सेल’ अनिवार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 10:33 IST

विद्यार्थ्यांमधील निराशा दूर करण्यासाठी प्रत्येक व्यावसायिक महाविद्यालयात ‘समुपदेशन सेल’ अनिवार्य करण्यात आला आहे.

ठळक मुद्देमहाविद्यालये वाढविणार ‘मनोबल’

योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्पर्धात्मक युगामध्ये विद्यार्थ्यांसमोर अभ्यासासोबतच कौशल्यविकासाचादेखील ताण असतो. अनेकांना योग्य मार्गदर्शनाअभावी निराशेचा सामना करता येत नाही व ते नको तो निर्णय घेऊन बसतात. मात्र मनातील ताणतणाव दूर करण्यासाठी विद्यार्थ्यांना फारसे दूर जावे लागणार नाही. विद्यार्थ्यांना पुस्तकी शिक्षण न देता आता महाविद्यालयांना विद्यार्थ्यांना जगण्याचे धडेदेखील द्यावे लागणार आहे. विद्यार्थ्यांमधील निराशा दूर करण्यासाठी प्रत्येक व्यावसायिक महाविद्यालयात ‘समुपदेशन सेल’ अनिवार्य करण्यात आला आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्याची जबाबदारी महाविद्यालयांकडे राहणार आहे हे विशेष.व्यावसायिक अभ्यासक्रमांमधील विद्यार्थ्यांसमोर आव्हानांचा ताण असतो. भविष्यातील संधी, ‘प्रोजेक्ट’ पूर्ण करण्याची धावपळ, अभ्यासाचे ओझे यांच्या विचाराने अनेक विद्यार्थी प्रचंड तणावाने ग्रस्त असतात. तीव्र स्पर्धात्मक युगामुळे ही निराशेची भावना टोकाला पोहोचते अन् त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या एकूणच जडणघडणीवर होतो. हीच बाब लक्षात घेऊन ‘डीटीई’तर्फे (डायरेक्टोरेट आॅफ टेक्निकल एज्युकेशन) पुढाकार घेण्यात आला आहे. ‘डीटीई’ने व्यावसायिक अभ्यासक्रम संचालित करणाऱ्या सर्व महाविद्यालयांना ‘समुपदेशन सेल’ स्थापन करण्याचे निर्देशच दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांच्याशी योग्य संवाद साधावा व विद्यार्थ्यांना योग्य सूचना द्याव्या, अशी सूचनादेखील देण्यात आली आहे.

मानसिक आरोग्य जपावे लागणारनागपूर विभागीय सहसंचालक कार्यालयाकडून याबाबत महाविद्यालयांना सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य निरोगी कसे राहील, याबाबत महाविद्यालयांना पावले उचलावी लागणार आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी सांघिक चर्चासत्रे, मार्गदर्शनपर व स्फूर्ती देणारी व्याख्याने, उद्योजकता वाढविणारी शिबिरे नियमितपणे आयोजित करावी लागणार आहेत. विशेष म्हणजे महाविद्यालयांना याचा नियमितपणे विभागीय सहसंचालकांना दर महिन्याच्या ३० तारखेला अहवाल सादर करावा लागणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र