शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
7
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
8
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
9
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
10
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
11
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
12
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
13
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
14
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
15
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
16
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
17
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
18
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
19
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
20
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले

आंतरजातीय विवाहाला समाजकल्याणचे बळ : १२६ दाम्पत्यांना ६३ लाखांच्या अनुदानाचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 23:12 IST

आंतरजातीय विवाहाला आजही समाजातून पाठिंबा मिळत नाही. नवदाम्पत्याला घरच्यांच्याच रोषाला बळी पडावे लागते. घरापासून दूर राहून संसार थाटावा लागतो. अशा जोडप्यांना समाजकल्याण विभागाने बळ मिळवून दिले आहे. समाजातून जातीचा अंत करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या जोडप्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने केंद्र व राज्य शासनाकडून अनुदान दिले जाते. यासाठी नागपूर जिल्ह्यातील १२६ जोडप्यांची निवड करण्यात आली आहे. त्यांना ६३ लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे ६०० दाम्पत्यांनी केले अर्ज

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : आंतरजातीय विवाहाला आजही समाजातून पाठिंबा मिळत नाही. नवदाम्पत्याला घरच्यांच्याच रोषाला बळी पडावे लागते. घरापासून दूर राहून संसार थाटावा लागतो. अशा जोडप्यांना समाजकल्याण विभागाने बळ मिळवून दिले आहे. समाजातून जातीचा अंत करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या जोडप्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने केंद्र व राज्य शासनाकडून अनुदान दिले जाते. यासाठी नागपूर जिल्ह्यातील १२६ जोडप्यांची निवड करण्यात आली आहे. त्यांना ६३ लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे.जी जात नाही, ती जात अशी एक म्हण आहे. भारतातून जातीचा अंत कधी होईल हा मोठा प्रश्न असला तरी नागपूर जिल्ह्यातील शेकडो तरुण-तरुणी मात्र जाती-धर्माला दूर लोटत असल्याचे चित्र आहे. बऱ्याच कुटुंबात तर आंतरजातीय विवाहाला जीवनभर विरोध केल्याचीही उदाहरणे समाजात दिसून येतात. या परिस्थितीत अशा जोडप्यांना मानसिक व आर्थिक आधार मिळावा म्हणून केंद्र व राज्य शासनातर्फे प्रतिजोडप्यांना ५० हजार रुपये अनुदान देण्यात आले. समसमान आलेले अनुदान जोडप्यांना वाटण्याची जबाबदारी समाजकल्याण विभागावर आहे. मागील वर्षी नागपूर जिल्ह्यात तब्बल ८४३ आंतरजातीय विवाहित जोडप्यांना अनुदान देऊन सत्कार करण्यात आला. यावर्षी ६०० जोडप्यांची नोंदणी झाली असून, लवकरच ६०० पैकी १२६ जोडप्यांना ६३ लाख रुपयांचे अनुदान वाटप करून सत्कार करण्यात येणार आहे. अनुदानाबाबत केंद्र शासनाचा हात आखडता!दरवर्षी केंद्राकडून दोन कोटी व राज्य शासनाकडून दोन कोटी असे चार कोटी रुपये जोडप्यांना वाटप केले जातात. राज्य शासनाचे दोन कोटी रुपये समाजकल्याणच्या खात्यात जमा झाले आहे. मात्र, केंद्र शासनाकडून दोन कोटींपैकी केवळ ३१ लाख ५० हजार रुपयेच आले आहे. यावरून अनुदान देण्याबाबत केंद्र शासनाचा हात आखडता असल्याचे दिसून येत आहे. समसमान अनुदान वाटप करण्याचा नियम असल्याने मनात असूनही समाजकल्याण विभागाला दोन कोटी खर्च करता येणार नाही. त्यामुळे केंद्राचे ३१ लाख ५० हजार व राज्याचाही तेवढाच निधी वापरून ६३ लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात येईल. उरलेल्या ४७४ जोडप्यांना केंद्राचे अनुदान आल्यानंतरच वाटप करण्यात येणार आहे.

टॅग्स :marriageलग्नSocial welfare divisional officeसमाजकल्याण उपायुक्त कार्यालय