शहरं
Join us  
Trending Stories
1
Apple Awe Dropping Event : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
2
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
3
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
4
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
5
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
6
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
7
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
8
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
9
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
10
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
11
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
12
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
13
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
14
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
15
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
16
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
17
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
18
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
19
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
20
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल

संगीतात असाध्य आजारही बरा करण्याची ताकद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 23:46 IST

जगप्रसिद्ध बासुरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया शुक्रवारी एका कार्यक्रमात सादरीकरणासाठी नागपूरला आले होते. यावेळी त्यांनी लोकमतशी संवाद साधला. त्यांच्या मते शास्त्रीय संगीत हे औषधाप्रमाणे काम करीत असून यामध्ये कोणताही आजार बरा करण्याची शक्ती आहे.

ठळक मुद्देपं. हरिप्रसाद चौरसिया यांचे मनोगत : लोकमतशी संवाद

  लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जगप्रसिद्ध बासुरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया शुक्रवारी एका कार्यक्रमात सादरीकरणासाठी नागपूरला आले होते. यावेळी त्यांनी लोकमतशी संवाद साधला. त्यांच्या मते शास्त्रीय संगीत हे औषधाप्रमाणे काम करीत असून यामध्ये कोणताही आजार बरा करण्याची शक्ती आहे. त्यांनी सांगितले, अमेरिकेमध्ये विविध आजारांच्या उपचारासाठी याचा उपयोग केला जात आहे व संगीतातील रागांवर प्रचंड संशोधन केले जात आहे. कोणता राग कोणत्या आजारावर प्रभावी काम करतो, यावर मंथन केले जात आहे. काही विद्यापीठांमध्ये ‘म्युझिक थेरेपी’ हा विषयही शिकविला जात आहे. हा गहन विषय आहे. आजाराच्या उपचारासाठी राग माहिती असणे केवळ महत्त्वाचे नाही तर ज्याच्यावर उपचार करायचा आहे, त्याचे नेचर जाणणेही महत्त्वाचे असते. त्याच्या आवडी निवडी जाणणे आवश्यक आहे. याशिवाय कोणत्या वेळी कोणता राग गायला तर त्याचा लाभ होईल, हेही महत्त्वाचे आहे. संगीतात असाध्य आजारही बरा करण्याची शक्ती आहे, त्यासाठी केवळ विश्वास असणे आवश्यक आहे. विदेशींनी हा विश्वास केला, मात्र आपल्याच देशात हा विश्वास स्वीकारला जात नसल्याची खंत या ८० वर्षीय कलावंताने व्यक्त केली.उत्तर भारतातील या बासुरी वादकाला भारतातच नव्हे तर जगभरात सन्मानाने ओळखले जाते. कर्नाटकी संगीत व हिंदूस्थानी शास्त्रीय संगीतातील फरक विचारला असता, हा केवळ मूळत: भाषेचाच फरक असल्याचे ते म्हणाले. आम्ही बंधू आहोत. जी बासरी ते वाजवितात तीच आम्हीही वाजवितो. ह केवळ भाषेचा फरक आहे, मात्र संगीताला कुठलीही भाषा नसल्याचे ते म्हणाले. संगीतामध्ये विविध राग व रस आहेत व यांच्यामध्ये अतुट नाते आहे. ते चांगले आहेत तेव्हा चांगले आहेत आणि नाहीत तेव्हा नाहीत. मात्र आम्ही जेव्हा बासरी वाजवितो, तेव्हा गाण्यांचा प्रभाव असतो. गाणे मुख्य गोष्ट आहे. आवाजाशिवाय संगीत नाही, त्याचप्रमाणे संगीताशिवाय आवाज महत्त्वाचा नाही. बासरीमध्ये गिटार किंवा सतारीप्रमाणे तारा नाहीत किंवा तबल्याप्रमाणे बीट्सही नाहीत. तरीही त्याच्या स्वरलहरीने लोकांना भुरळ पडते. बासरीचे सुर कानी पडताच विविध भावना जागृत होतात. हे सर्वांनाच संमोहित करणारे आहे कारण ते ईश्वराची निर्मिती असल्याची भावना पं. चौरसिया यांनी व्यक्त केली.

टॅग्स :musicसंगीतnagpurनागपूर