शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
3
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
4
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
5
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
6
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
7
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
8
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
9
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
10
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
11
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
12
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
13
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
14
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
15
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
16
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
17
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
18
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
19
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
20
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेचा अजब नियम; दोन ठिकाणचा पत्ता प्रवाशांसाठी डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2020 20:56 IST

Indian railway Nagpur News रेल्वेच्या वतीने जिथे जायचे आहे तेथील पत्ता टाकण्याची सक्ती करण्यात येत आहे. यामुळे प्रवाशांसह आरक्षणाचे तिकीट देणाऱ्या क्लर्कची डोकेदुखी वाढली असल्याची स्थिती आहे.

ठळक मुद्देतिकीट काऊंटरवर लागताहेत प्रवाशांच्या रांगा

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : रेल्वेचे आरक्षण केल्यानंतर आरक्षणाचा फॉर्म भरावा लागतो. त्यात जिथे जायचे ते गाव, गाडी क्रमांक, लिंग, वय आणि पत्ता टाकला की आरक्षण काऊंटरवरील क्लर्क तिकीट देतो. परंतु आता त्यात भर म्हणून रेल्वेच्या वतीने जिथे जायचे आहे तेथील पत्ता टाकण्याची सक्ती करण्यात येत आहे. यामुळे प्रवाशांसह आरक्षणाचे तिकीट देणाऱ्या क्लर्कची डोकेदुखी वाढली असल्याची स्थिती आहे.

रेल्वे प्रशासनाने कोरोनाच्या काळात प्रवाशांना स्थानिक पत्ता आणि जिथे जायचे आहे त्या ठिकाणचा पत्ता, जिल्हा, राज्य आणि पिनकोड टाकणे सक्तीचे केले आहे. अनेकदा तिकीट काढण्यासाठी गेलेल्या प्रवाशांना जेथे जायचे तेथील पत्ता, पिनकोड माहीत नसतो. अशा वेळी रांगेत क्रमांक लागल्यानंतरही त्यांना रांगेतून बाहेर निघून मोबाईलवरून तेथील पत्ता घ्यावा लागत आहे. यात प्रवाशांची गैरसोय होत आहे. अनेक प्रवाशांना जिथे जायचे तेथील पत्ता माहीत नसल्यामुळे तिकीट काऊंटरवर प्रवाशांच्या रांगा लागत आहेत. रेल्वेचा हा नवा नियम तिकीट काऊंटरवरील क्लर्क आणि नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे रेल्वेने हा नवा नियम रद्द करावा, अशी मागणी प्रादेशिक रेल्वे उपभोक्ता सल्लागार समितीचे सदस्य सतीश यादव यांनी केली आहे. रेल्वेच्या या नियमामुळे नागरिकांमध्ये असंतोष व्यक्त करण्यात येत असून, आरक्षण खिडक्यांवरील क्लर्कही या नव्या नियमांमुळे त्रस्त झाल्याची माहिती आहे.

रेल्वेने नवा नियम रद्द करावा

दोन ठिकाणचा पत्ता टाकण्याची सक्ती करणे चुकीचे आहे. यामुळे प्रवाशांना त्रास होत आहे. बुकिंग क्लार्कची या नव्या नियमामुळे डोकेदुखी वाढली असून, रेल्वेने हा नियम रद्द करण्याची गरज आहे.

-बसंत कुमार शुक्ला, महासचिव, भारतीय यात्री केंद्र

प्रवाशांसाठी चांगला नियम

कोरोनाच्या काळात प्रवाशांना संपर्क साधण्यासाठी दोन्ही ठिकाणचा पत्ता टाकण्याची सक्ती करण्यात येत आहे. प्रवाशांना शोधण्यासाठी हा नियम चांगला असल्यामुळे प्रवाशांनीही रेल्वेला सहकार्य करण्याची गरज आहे.

-एस. जी. राव, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, नागपूर विभाग

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे