शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

रेल्वेचा अजब नियम; दोन ठिकाणचा पत्ता प्रवाशांसाठी डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2020 20:56 IST

Indian railway Nagpur News रेल्वेच्या वतीने जिथे जायचे आहे तेथील पत्ता टाकण्याची सक्ती करण्यात येत आहे. यामुळे प्रवाशांसह आरक्षणाचे तिकीट देणाऱ्या क्लर्कची डोकेदुखी वाढली असल्याची स्थिती आहे.

ठळक मुद्देतिकीट काऊंटरवर लागताहेत प्रवाशांच्या रांगा

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : रेल्वेचे आरक्षण केल्यानंतर आरक्षणाचा फॉर्म भरावा लागतो. त्यात जिथे जायचे ते गाव, गाडी क्रमांक, लिंग, वय आणि पत्ता टाकला की आरक्षण काऊंटरवरील क्लर्क तिकीट देतो. परंतु आता त्यात भर म्हणून रेल्वेच्या वतीने जिथे जायचे आहे तेथील पत्ता टाकण्याची सक्ती करण्यात येत आहे. यामुळे प्रवाशांसह आरक्षणाचे तिकीट देणाऱ्या क्लर्कची डोकेदुखी वाढली असल्याची स्थिती आहे.

रेल्वे प्रशासनाने कोरोनाच्या काळात प्रवाशांना स्थानिक पत्ता आणि जिथे जायचे आहे त्या ठिकाणचा पत्ता, जिल्हा, राज्य आणि पिनकोड टाकणे सक्तीचे केले आहे. अनेकदा तिकीट काढण्यासाठी गेलेल्या प्रवाशांना जेथे जायचे तेथील पत्ता, पिनकोड माहीत नसतो. अशा वेळी रांगेत क्रमांक लागल्यानंतरही त्यांना रांगेतून बाहेर निघून मोबाईलवरून तेथील पत्ता घ्यावा लागत आहे. यात प्रवाशांची गैरसोय होत आहे. अनेक प्रवाशांना जिथे जायचे तेथील पत्ता माहीत नसल्यामुळे तिकीट काऊंटरवर प्रवाशांच्या रांगा लागत आहेत. रेल्वेचा हा नवा नियम तिकीट काऊंटरवरील क्लर्क आणि नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे रेल्वेने हा नवा नियम रद्द करावा, अशी मागणी प्रादेशिक रेल्वे उपभोक्ता सल्लागार समितीचे सदस्य सतीश यादव यांनी केली आहे. रेल्वेच्या या नियमामुळे नागरिकांमध्ये असंतोष व्यक्त करण्यात येत असून, आरक्षण खिडक्यांवरील क्लर्कही या नव्या नियमांमुळे त्रस्त झाल्याची माहिती आहे.

रेल्वेने नवा नियम रद्द करावा

दोन ठिकाणचा पत्ता टाकण्याची सक्ती करणे चुकीचे आहे. यामुळे प्रवाशांना त्रास होत आहे. बुकिंग क्लार्कची या नव्या नियमामुळे डोकेदुखी वाढली असून, रेल्वेने हा नियम रद्द करण्याची गरज आहे.

-बसंत कुमार शुक्ला, महासचिव, भारतीय यात्री केंद्र

प्रवाशांसाठी चांगला नियम

कोरोनाच्या काळात प्रवाशांना संपर्क साधण्यासाठी दोन्ही ठिकाणचा पत्ता टाकण्याची सक्ती करण्यात येत आहे. प्रवाशांना शोधण्यासाठी हा नियम चांगला असल्यामुळे प्रवाशांनीही रेल्वेला सहकार्य करण्याची गरज आहे.

-एस. जी. राव, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, नागपूर विभाग

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे