शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

रेल्वेचा अजब नियम; दोन ठिकाणचा पत्ता प्रवाशांसाठी डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2020 20:56 IST

Indian railway Nagpur News रेल्वेच्या वतीने जिथे जायचे आहे तेथील पत्ता टाकण्याची सक्ती करण्यात येत आहे. यामुळे प्रवाशांसह आरक्षणाचे तिकीट देणाऱ्या क्लर्कची डोकेदुखी वाढली असल्याची स्थिती आहे.

ठळक मुद्देतिकीट काऊंटरवर लागताहेत प्रवाशांच्या रांगा

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : रेल्वेचे आरक्षण केल्यानंतर आरक्षणाचा फॉर्म भरावा लागतो. त्यात जिथे जायचे ते गाव, गाडी क्रमांक, लिंग, वय आणि पत्ता टाकला की आरक्षण काऊंटरवरील क्लर्क तिकीट देतो. परंतु आता त्यात भर म्हणून रेल्वेच्या वतीने जिथे जायचे आहे तेथील पत्ता टाकण्याची सक्ती करण्यात येत आहे. यामुळे प्रवाशांसह आरक्षणाचे तिकीट देणाऱ्या क्लर्कची डोकेदुखी वाढली असल्याची स्थिती आहे.

रेल्वे प्रशासनाने कोरोनाच्या काळात प्रवाशांना स्थानिक पत्ता आणि जिथे जायचे आहे त्या ठिकाणचा पत्ता, जिल्हा, राज्य आणि पिनकोड टाकणे सक्तीचे केले आहे. अनेकदा तिकीट काढण्यासाठी गेलेल्या प्रवाशांना जेथे जायचे तेथील पत्ता, पिनकोड माहीत नसतो. अशा वेळी रांगेत क्रमांक लागल्यानंतरही त्यांना रांगेतून बाहेर निघून मोबाईलवरून तेथील पत्ता घ्यावा लागत आहे. यात प्रवाशांची गैरसोय होत आहे. अनेक प्रवाशांना जिथे जायचे तेथील पत्ता माहीत नसल्यामुळे तिकीट काऊंटरवर प्रवाशांच्या रांगा लागत आहेत. रेल्वेचा हा नवा नियम तिकीट काऊंटरवरील क्लर्क आणि नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे रेल्वेने हा नवा नियम रद्द करावा, अशी मागणी प्रादेशिक रेल्वे उपभोक्ता सल्लागार समितीचे सदस्य सतीश यादव यांनी केली आहे. रेल्वेच्या या नियमामुळे नागरिकांमध्ये असंतोष व्यक्त करण्यात येत असून, आरक्षण खिडक्यांवरील क्लर्कही या नव्या नियमांमुळे त्रस्त झाल्याची माहिती आहे.

रेल्वेने नवा नियम रद्द करावा

दोन ठिकाणचा पत्ता टाकण्याची सक्ती करणे चुकीचे आहे. यामुळे प्रवाशांना त्रास होत आहे. बुकिंग क्लार्कची या नव्या नियमामुळे डोकेदुखी वाढली असून, रेल्वेने हा नियम रद्द करण्याची गरज आहे.

-बसंत कुमार शुक्ला, महासचिव, भारतीय यात्री केंद्र

प्रवाशांसाठी चांगला नियम

कोरोनाच्या काळात प्रवाशांना संपर्क साधण्यासाठी दोन्ही ठिकाणचा पत्ता टाकण्याची सक्ती करण्यात येत आहे. प्रवाशांना शोधण्यासाठी हा नियम चांगला असल्यामुळे प्रवाशांनीही रेल्वेला सहकार्य करण्याची गरज आहे.

-एस. जी. राव, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, नागपूर विभाग

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे