शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

गोष्ट एका व्यसनमुक्तीची!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 08:00 IST

पालक संवादातून पालकांनी आपली व्यसने सोडल्याची काही उदाहरणे समोर आली आहेत. विलास या विद्यार्थ्याने वडील दारू पितात मग मी त्यांच्याशी संवाद कसा साधू ? अशी समस्या शिक्षकांजवळ मांडली.

आमीन चौहाननागपूर:एके दिवशी ठरवलं. हिंमत केली अन मोहन महाराजांना शाळेजवळ हे दुकान लावू नका, अशी ताकीद दिली. त्यांनी साहजिकच प्रतिकार केला. पण मी शाळेत व ते एकटेच, म्हणून काहीशी माघार घेत ते ढकलगाडी लोटत शाळेपासून निघून गेले.या प्रसंगानंतर माझं मन मलाच खात होतं. संपली कटकट एकदाची, असं म्हणून मन आनंदित होत होतं तर कधी आता हा काय आफत आणतो म्हणून भीतीही वाटत होती. शाळा सुटली आणि आम्ही सगळे घरी आलो. दुसरे दिवशी तत्परतेने तयारी केली. गाडीने शाळा गाठली. शाळा उघडून शाळेजवळ फेरफटका मारला. गावातील सगळं वातावरण शांत वाटत होतं. मला खूप बरं वाटलं. जरा हिंमत आली. आपण थेट मोहन महाराजांचं घर गाठून त्यांची थेट भेट घ्यावी असा विचार मनात येतो न येतो तोच माझी पावलं त्यांच्या घराकडे वळली व थांबली ती थेट त्यांच्या दारातच! मला दारात पाहून महाराजही थोडे गडबडलेच. मीच बोलायला सुरुवात केली. इकडचे-तिकडचे बोलणे झाल्यावर ते कालच्या विषयावर बोलू लागले. दोन दिवसांपासून धंदा नाही. घराजवळ पाहिजे तशी विक्री होत नाही. गावात सारे विकतात मग मलाच ‘ना’ का? महाराजांनी थेट विषयाला हात घातला. असं बरंच ते सांगू लागले. एव्हाना काही लोकं जमली. मी त्यांचं सारं ऐकून घेतलं. त्यांचा नातू जवळच उभा होता. ढकलगाडीला लटकवलेली एक गुटखा पुडी मी तोडली व फोडली. म्हटलं, ‘हा तुमचा नातू ना! याला खाऊ घालू का?’ ते लगेच नाही म्हणाले. हे जहर आहे हे तुम्हाला माहीत आहे. ते तुम्ही आपल्या नातवाला कसे खाऊ घालणार, मी परत त्यांना प्रश्न केला. जसा हा तुमचा नातू तशीच ही गावातली मुलं समजा. हे जहर विकणं बंद करा. दुसरा छोटा-मोठा धंदा पाहा. आम्ही मदत करू. सुरुवातीला थोडा त्रास होईल. पुढे जमेलच की हळूहळू. असं म्हणून मी शाळेत आलो.आता शाळेत जाताना मोहन महाराज बरेच वेळा भेटतात. तीच ढकलगाडी घेऊन. पण गावात नव्हे तर दिग्रस शहरात. अन् गाडीवर असतो हिरवा व ताजा ताजा पौष्टिक भाजीपाला. बरेच वेळा मी त्यांच्याकडील भाजी विकत घेतो. अनेक वेळा गरज नसली तरीही!भाजी विकता विकता आज दोन वर्षे झाली मोहन महाराज यांना. त्यांनी आपली बरीच ओळख व अनेक ग्राहक जोडून ठेवले आहेत. याच ओळखीतून एका चांगल्या ग्राहकाने शेतात विहिरीची योजना सांगितली. योजनेसाठी अर्ज केला. विहीर मंजूर झाली. आज मोहन महाराज यांच्याकडे विहिरीचे काम सुरू आहे. आता ते लवकरच स्वत:च भाजीपाला पिकवून विकणार आहेत.

सुटली दारू, तंबाखूही!पालक संवादातून पालकांनी आपली व्यसने सोडल्याची काही उदाहरणे समोर आली आहेत. विलास या विद्यार्थ्याने वडील दारू पितात मग मी त्यांच्याशी संवाद कसा साधू ? अशी समस्या शिक्षकांजवळ मांडली. शिक्षकांनी विलासच्या वडिलांशी संपर्क साधून त्यांना वरील घटनाक्रम सांगितला. त्यांचे समुपदेशन केले. गुलाबरावांनी ही बाब गंभीरपणे घेतली. आज दोन वर्षे झाली त्यांनी आपली दारू सोडली आहे.

टॅग्स :Rural Developmentग्रामीण विकास