शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

गोष्ट एका व्यसनमुक्तीची!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 08:00 IST

पालक संवादातून पालकांनी आपली व्यसने सोडल्याची काही उदाहरणे समोर आली आहेत. विलास या विद्यार्थ्याने वडील दारू पितात मग मी त्यांच्याशी संवाद कसा साधू ? अशी समस्या शिक्षकांजवळ मांडली.

आमीन चौहाननागपूर:एके दिवशी ठरवलं. हिंमत केली अन मोहन महाराजांना शाळेजवळ हे दुकान लावू नका, अशी ताकीद दिली. त्यांनी साहजिकच प्रतिकार केला. पण मी शाळेत व ते एकटेच, म्हणून काहीशी माघार घेत ते ढकलगाडी लोटत शाळेपासून निघून गेले.या प्रसंगानंतर माझं मन मलाच खात होतं. संपली कटकट एकदाची, असं म्हणून मन आनंदित होत होतं तर कधी आता हा काय आफत आणतो म्हणून भीतीही वाटत होती. शाळा सुटली आणि आम्ही सगळे घरी आलो. दुसरे दिवशी तत्परतेने तयारी केली. गाडीने शाळा गाठली. शाळा उघडून शाळेजवळ फेरफटका मारला. गावातील सगळं वातावरण शांत वाटत होतं. मला खूप बरं वाटलं. जरा हिंमत आली. आपण थेट मोहन महाराजांचं घर गाठून त्यांची थेट भेट घ्यावी असा विचार मनात येतो न येतो तोच माझी पावलं त्यांच्या घराकडे वळली व थांबली ती थेट त्यांच्या दारातच! मला दारात पाहून महाराजही थोडे गडबडलेच. मीच बोलायला सुरुवात केली. इकडचे-तिकडचे बोलणे झाल्यावर ते कालच्या विषयावर बोलू लागले. दोन दिवसांपासून धंदा नाही. घराजवळ पाहिजे तशी विक्री होत नाही. गावात सारे विकतात मग मलाच ‘ना’ का? महाराजांनी थेट विषयाला हात घातला. असं बरंच ते सांगू लागले. एव्हाना काही लोकं जमली. मी त्यांचं सारं ऐकून घेतलं. त्यांचा नातू जवळच उभा होता. ढकलगाडीला लटकवलेली एक गुटखा पुडी मी तोडली व फोडली. म्हटलं, ‘हा तुमचा नातू ना! याला खाऊ घालू का?’ ते लगेच नाही म्हणाले. हे जहर आहे हे तुम्हाला माहीत आहे. ते तुम्ही आपल्या नातवाला कसे खाऊ घालणार, मी परत त्यांना प्रश्न केला. जसा हा तुमचा नातू तशीच ही गावातली मुलं समजा. हे जहर विकणं बंद करा. दुसरा छोटा-मोठा धंदा पाहा. आम्ही मदत करू. सुरुवातीला थोडा त्रास होईल. पुढे जमेलच की हळूहळू. असं म्हणून मी शाळेत आलो.आता शाळेत जाताना मोहन महाराज बरेच वेळा भेटतात. तीच ढकलगाडी घेऊन. पण गावात नव्हे तर दिग्रस शहरात. अन् गाडीवर असतो हिरवा व ताजा ताजा पौष्टिक भाजीपाला. बरेच वेळा मी त्यांच्याकडील भाजी विकत घेतो. अनेक वेळा गरज नसली तरीही!भाजी विकता विकता आज दोन वर्षे झाली मोहन महाराज यांना. त्यांनी आपली बरीच ओळख व अनेक ग्राहक जोडून ठेवले आहेत. याच ओळखीतून एका चांगल्या ग्राहकाने शेतात विहिरीची योजना सांगितली. योजनेसाठी अर्ज केला. विहीर मंजूर झाली. आज मोहन महाराज यांच्याकडे विहिरीचे काम सुरू आहे. आता ते लवकरच स्वत:च भाजीपाला पिकवून विकणार आहेत.

सुटली दारू, तंबाखूही!पालक संवादातून पालकांनी आपली व्यसने सोडल्याची काही उदाहरणे समोर आली आहेत. विलास या विद्यार्थ्याने वडील दारू पितात मग मी त्यांच्याशी संवाद कसा साधू ? अशी समस्या शिक्षकांजवळ मांडली. शिक्षकांनी विलासच्या वडिलांशी संपर्क साधून त्यांना वरील घटनाक्रम सांगितला. त्यांचे समुपदेशन केले. गुलाबरावांनी ही बाब गंभीरपणे घेतली. आज दोन वर्षे झाली त्यांनी आपली दारू सोडली आहे.

टॅग्स :Rural Developmentग्रामीण विकास