शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

योग्य नियोजन होईपर्यंत नवीन सिमेंट रोड बांधणे थांबवा

By निशांत वानखेडे | Updated: July 24, 2024 19:11 IST

जनमंचकडून कळकळीची मागणी : प्रशासनाच्या हलगर्जीमुळे नागपूरकरांचे हाल

‘लाेकमत’ वृत्तमालिकेची दखलनागपूर : २० जुलै राेजी शहरात झालेल्या मुसळधार पावसाने नागपूरकरांची दाणादाण उडाली. एका दिवसाच्या अतिवृष्टीने शेकडाे वस्त्या जलमय केल्या. चुकीच्या पद्धतीने बांधलेल्या सिमेंट रस्त्यांमुळेच शहराची ही दैनावस्था झाली, अशी टीका जनमंचने केली आहे. त्यामुळे यापुढे याेग्य नियाेजन हाेईपर्यंत नवीन सिमेंट राेड बांधणे  थांबवा, अशी कळकळीची मागणी जनमंचने केली आहे.

गेल्या वर्षी २३ सप्टेंबर आणि यंदा २० जुलै राेजी नागपूरकरांनी पुराचा हाहाकार अनुभवला. अवघ्या ७ तासात २३२ मि.मी. पावसाची नाेंद झाली आणि या अतिवृष्टीमुळे अवघे शहर जलमय झाल्याचे दिसून आले. जवळच्याच नाही तर शहरातील पाॅश वस्त्यांनाही हा तडाखा बसला. प्रशासनाच्या आकडेवारीनुसार या पुरस्थितीत जवळपास १० हजार घरांचे नुकसान झाले व नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. कित्येकांचे संसार उघड्यावर आले. हा आकडा त्याहून अधिक असण्याची शक्यता आहे.

‘लाेकमत’ने पावसात केलेले सर्वेक्षणात अयोग्य पद्धतीने बांधलेल्या सिमेंट राेडमुळे पुरस्थिती निर्माण झाल्याचे अधाेरेखित केले हाेते. जनमंचनेही या गाेष्टीची दखल घेतली. जनमंचचे अध्यक्ष राजीव जगताप म्हणाले, चुकीच्या पद्धतीने बांधलेल्या सिमेंट राेडमुळेच नागपूरची अशी दैनावस्था झाली आहे. पाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसणे, तसेच आजूबाजूच्या घरांपेक्षा रोडची उंची जास्त झाल्याने लाेकांच्या घरात पाणी शिरले. ही बाब सामान्य लाेकांना समजत असताना गलेलठ्ठ पगार घेणाऱ्या महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, नागपूर सुधार प्रन्यास सारख्या शासकीय यंत्रणांना हे समजले नाही, अशी टीका त्यांनी केली. त्यानंतर अधिकाऱ्यांची जबाबदारी झटकून मुसळधार पावसालाच जबाबदार धरले जाते, हे दुर्देव हाेय. 

रस्त्याची उंची आजूबाजूच्या घरांपेक्षा जास्त नसावी, तसेच पाण्याचा निचरा होण्याची योग्य व्यवस्था असावी. अशी व्यवस्था हाेईपर्यंत सिमेंट रोडची नवीन कामे थांबवण्याची मागणी जनमंचने पत्रकाद्वारे केली. या निवेदनात महासचिव विठ्ठलराव जावळकर, उपाध्यक्ष मनोहर रडके, खरसने, शरद पाटील, रमेश बोरकुटे, दादा झोडे, शिंदे, कोरडे, रामेकर, देवळे, भुसे, सावलकर, पांडे, राम आखरे, टी बी जगताप, निनावे, उत्तम सुळके, मिलिंद राऊत यांचा समावेश आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाnagpurनागपूर