शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
2
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
3
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
4
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
5
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
6
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
7
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
8
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
9
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
10
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
11
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
12
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
13
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
14
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
15
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
16
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
17
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
18
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
19
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
20
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?

पेंच, गोसेखुर्दतील चोरीचे मासे नागपुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 21:32 IST

Pench, Gasekhurd stolen Fish Nagpur, News मध्य भारतातील सर्वात मोठे मत्स्यविक्री केंद्र असलेल्या नागपुरात मोठ्या प्रमाणात चोरी करून आणलेल्या माशांची विक्री होत आहे. गोसेखुर्द तसेच पेंच अभयारण्यातील तोतलाडोह जलाशयातून चोरट्या पद्धतीने मासेमारी करून जवळपास १० टन मासे शहरात आणून विकले जात आहेत.

ठळक मुद्देदररोज १० टनावर अनधिकृत मासेविक्री : जिल्हा प्रशासन, वनविभागाचे दुर्लक्ष

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : मध्य भारतातील सर्वात मोठे मत्स्यविक्री केंद्र असलेल्या नागपुरात मोठ्या प्रमाणात चोरी करून आणलेल्या माशांची विक्री होत आहे. गोसेखुर्द तसेच पेंच अभयारण्यातील तोतलाडोह जलाशयातून चोरट्या पद्धतीने मासेमारी करून जवळपास १० टन मासे शहरात आणून विकले जात आहेत.

पेंच अभयारण्य घोषित झाल्यानंतर तोतलाडोह जलाशयातील मासेमारीवर बंदी घालण्यात आली आहे. असे असताना या जलाशयातून मोठ्या प्रमाणात चोरट्या मार्गाने मासे पकडण्यात येतात व नागपूरला आणून विक्री केले जातात. येथून जवळपास चोरीचा ५ टन माल नागपुरात येत असल्याचे विदर्भ मासेमार संघटनेचा आरोप आहे. हीच परिस्थिती गोसेखुर्द प्रकल्पाबाबतही आहे. प्रकल्पातून गेल्या काही वर्षापासून वेगवेगळया कारणाने मासेमारीचे कंत्राट काढण्यात आलेले नाही. मात्र लहानमोठे ५०० ते ६०० लाेक जलाशयातून चोरट्या मार्गाने मासेमारी करून विक्री करतात. जिल्ह्यातील कंत्राट असलेल्या ५०० च्यावर तलावातूनही अधिकृत व्यक्ती उपस्थिती नसल्यावर चोरी करून मासे पकडले जात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. आश्चर्य म्हणजे शहरातील मासे मार्केटमध्ये हे चोरीचे मासे सर्रासपणे विकले जातात. त्यांच्याकडून जलाशयाची व मार्केटचीही पावती मागितली जात नाही. यामुळे शासनाचा महसूल बुडत आहे. याबाबत जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षकांनाही तक्रार केली आहे, मात्र कुठलीही कारवाई झाली नसल्याचे विदर्भ विभागीय मच्छिमार सहकारी संघाचे अध्यक्ष प्रकाश लोणारे यांनी सांगितले.

अधिकृत मासेमारांना नुकसान

जिल्ह्यात १२१ मत्स्यपालन संस्था असून १५ हजाराच्या जवळपास अधिकृत मासेमार सदस्य आहेत. चोरीचे मासे मार्केटमध्ये येत असल्याने अधिकृत मासेमारी करणाऱ्यांचा माशाला भाव मिळत नाही व आर्थिक नुकसान सोसावे लागते.

मत्स्यव्यवसाय मंत्र्यांना दिले पत्र

तोतलाडोह जलाशयातील बंदी पूर्णपणे लागू करावी, चोरीने मासेमारी करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी किंवा हे जलाशय अधिकृत तरी करावे. गोसेखुर्द जलाशयावरही मासेमारीसाठी निविदा काढावी किंवा दोन्हीबाबत योग्य तो निर्णय शासनाने घ्यावा. अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याने पुढील दोन वर्षासाठी तलाव ठेका रक्कम शासनाने माफ करावी आणि मासेमारांसाठी २०० कोटींचे पॅकेज जाहीर करावे. याबाबत राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री यांना पत्र दिले आहे.

 प्रकाश लोणारे, अध्यक्ष, विदर्भ विभागीय मच्छिमार सहकारी संघ

टॅग्स :fishermanमच्छीमारGosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्पtheftचोरी