शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
2
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
3
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
4
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
5
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
6
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
7
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
8
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
9
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
10
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
11
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
12
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
13
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
14
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
15
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
16
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
17
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
18
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
19
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
20
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...

साठेबाजांनी कृत्रिमरित्या वाढविले खाद्यतेलाचे दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 12:03 IST

edible oil Nagpur News भाज्या, डाळींच्या किमती वाढल्यानंतर आता खाद्यतेल खरेदीसाठी ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागत आहे. महागाईचा चढता आलेख पाहता साठेबाजांवर कारवाई करण्याची मागणी किरकोळ विक्रेत्यांनी केली आहे.

ठळक मुद्देदरवाढीचा गरीब व सामान्यांना फटका सोयाबीन प्रति किलो ८ तर सोयाबीन २० रुपयांनी वाढले

मोरेश्वर मानापुरेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : खाद्यतेल उत्पादक, ठोक विक्रेते आणि साठेबाजांनी यंदा सोयाबीनचे उत्पादन कमी असल्याचे कारण सांगून आठवड्यातच सोयाबीन तेलाचे दर किलोमागे आठ रुपयांनी वाढविले आहे. भाज्या, डाळींच्या किमती वाढल्यानंतर आता खाद्यतेल खरेदीसाठी ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागत आहे. महागाईचा चढता आलेख पाहता साठेबाजांवर कारवाई करण्याची मागणी किरकोळ विक्रेत्यांनी केली आहे.रविवारी सोयाबीन तेलाचे दर प्रति किलो १०४ रुपयांवर पोहोचले आहे. ते गेल्या रविवारी ९६ रुपयांवर होते. याचप्रमाणे सनफ्लॉवर तेल प्रति किलो २० रुपये वाढीसह ११९ रुपये आणि राईस ब्रॅण्ड तेलाचे दर प्रति किलो ६ रुपयांनी वाढून १०७ रुपयांवर पोहोचले आहे. यंदा सोयाबीनचे पीक कमी आल्याचा अंदाज कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केल्यानंतर व्यापाऱ्यांनी दरवाढ सुरू केली. पुढे नवरात्र, दसरा आणि दिवाळी आहे. अशीच दरवाढ सुरू राहिली तर दरवाढ भरमसाट होणार होईल, अशी शक्यता काही व्यापाऱ्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली. यापूर्वी कोरोना काळात व्यापाऱ्यांनी सोयाबीन तेलाचे दर प्रति किलो १०६ रुपयांपर्यंत वाढविले होते. शासनाने दर निश्चित केल्यानंतर तात्काळ दुसऱ्या दिवशीपासूनच दर कमी झाले होते. ही दरवाढ आणि दरकपात कशी होते, हे एक गूढच असल्याचे किरकोळ विक्रेते म्हणाले.मूग गिळून बसला आहे अन्न विभागदरदिवशी वाढणाऱ्या अन्नपदार्थांच्या दराची माहिती अन्न व औषध विभागाकडे असते. पण विभाग व्यापा?्यांवर कारवाई करीत नाहीत. केवळ सणांनिमित्त तपासणी मोहीम राबवून अधिकारी वाहवा मिळवितात. ठोक कारवाई आणि व्यापाऱ्यांना पूर्वीच इशारा दिल्यास दरवाढ करण्याची हिंमत उत्पादक आणि ठोक व्यापारी करणार नाहीत. पण बातम्या छापून आल्यानंतर अधिकारी कारवाई करतात. पण तोपर्यंत व्यापारी साठा इतरत्र हलवितात. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या हातात काहीच लागत नाही, असा आरोप किरकोळ व्यापाऱ्यांनी केला.खाद्यतेल दरवाढीचा तक्ताखाद्यतेल            ४ ऑक्टो.           ११ ऑक्टो.सोयाबीन                 ९६ रु.             १०४ रु.सनफ्लॉवर              ९९ रु.                ११९ रु.राईस ब्रॅण्ड               १०१ रु.                १०७ रु.शेंगदाना                   १४० रु.           १४७ रु.साठेबाजांवर कारवाई करादरवाढीच्या संदर्भात विभागाचे अधिकारी आधीच सजग राहिल्यास कृत्रिम दरवाढीची मोठ्या व्यापाऱ्यांना भीती वाटेल. पण असे घडत नाही. दरवाढ झाल्यानंतर अधिकाऱ्यांचे डोळे उघडतात आणि कारवाईसाठी पुढाकार घेतात. पण तोपर्यंत सर्व निस्तरले असते. मोठे व्यापारी नफा कमवून मोकळे होतात. याचा फटका गरीब आणि सामान्यांना बसतो. साठेबाजांवर कारवाईसाठी अधिकाऱ्यांनी गांभीयार्ने लक्ष द्यावे.ज्ञानेश्वर रक्षक, महासचिव, नागपूर चिल्लर किराणा असोसिएशन.

 

टॅग्स :foodअन्न