शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

घरकूल द्या, भटकंती थांबवा

By admin | Updated: July 26, 2016 02:31 IST

स्वातंत्र्यानंतरही मागील ६६ वर्षांपासून विमुक्त भटक्या जमाती या भटकंतीच करीत आहेत; ...

भटके विमुक्तांची मागणी : तहसील कार्यालयांवर धडक नागपूर : स्वातंत्र्यानंतरही मागील ६६ वर्षांपासून विमुक्त भटक्या जमाती या भटकंतीच करीत आहेत; तेव्हा आम्हाला घरकूल द्या, स्थानिक स्वराज्य संस्थेत प्रतिनिधित्व द्या आणि आमची भटकंती थांबवा, अशी मागणी करीत शेकडोंच्या संख्येने भटके विमुक्त समाजबांधवांनी सोमवारी तहसील कार्यालयांवर धडक दिली. संघर्ष वाहिनी या सामाजिक संघटनेच्या नेतृत्वात सोमवारी सकाळी संविधान चौक येथून या मोर्चाला सुरुवात झाली. भटके विमुक्तांना घरकूल मिळावे, स्थानिक स्वराज्य संस्थेत प्रतिनिधित्व मिळावे, मासेमारी करणाऱ्या लोकांवर मस्त्यव्यवसाय विभागाच्या २६ जून २०१४ च्या आदेशाने उपासमारीचे संकट आले त्यामुळे तो आदेश ताबडतोब रद्द करावा, भूमिहीनांना जमीन मिळाव्यात, बेरोजगारांना रोजगार मिळावा, सुलभ कर्ज मिळावे, जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी कागदपत्रांच्या अटी शिथिल कराव्यात, क्रिमीलेयरची अट रद्द व्हावी, जिल्हास्तरावर वसतिगृह मिळावे, धरणग्रस्त मासेमाऱ्यांना मासेमारीचे हक्क द्या, शाळेत मुलाना गणवेश मिळावा, राज्याच्या अर्थसंकल्पात लोकसंख्येच्या प्रमाणात वाटा मिळावा, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. नागपूरसह सर्व १३ तालुके आणि वर्धा जिल्ह्यातील आठ तहसील कार्यालयांवर एकाच वेळी मोर्चा काढण्यात येऊन या मागण्यांचे निवेदन तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांना सादर करणयात आले. राजेंद्र बडीये यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनात पुंडलिक बावनकुळे, गजानन बोराल, पंकज बनसोड, धर्मपाल शेंडे, श्रीराम गोहोणे, प्रमोद मेश्राम, मनीष बात्हो, शंकर पुंड, विनायक सूर्यवंशी, गोविंद राठोड, सदाशिव हिव्लेकर, विनोद आकुलवार, दिलीप कैलूके, दिलीपसिंग सूर्यवंशी आदींसह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते. (प्रतिनिधी)शासनाच्या निषेधार्थ मुंडणभटके विमुक्त समाजबांधवांच्या विविध मागण्यांसाठी यापूर्वीसुद्धा विदर्भातील ४२ तहसील कार्यालयांवर मोर्चा काढण्यात आला. परंतु शासनाकडून त्या मोर्चाची साधी दखलही घेण्यात आली नाही. शासनाच्या या कृतीचा निषेध म्हणून मुंडणसुद्धा करण्यात आले.