शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

तंत्रशास्त्र विद्यापीठाची स्थिती ‘जैसे थे’

By admin | Updated: December 9, 2015 03:24 IST

राज्यातील सर्व अभियांत्रिकी महाविद्यालये एकाच विद्यापीठांतर्गत आणण्याचा राज्य शासनाचा विचार अद्यापही कागदांवरच प्रलंबित आहे.

योगेश पांडे नागपूरराज्यातील सर्व अभियांत्रिकी महाविद्यालये एकाच विद्यापीठांतर्गत आणण्याचा राज्य शासनाचा विचार अद्यापही कागदांवरच प्रलंबित आहे. रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाशी अद्यापपर्यंत महाविद्यालये संलग्नित झालेली नाहीत. त्यामुळे सध्या तरी या विद्यापीठाची स्थिती ‘जैसे थे’ अशीच आहे. या विद्यापीठाला नवसंजीवनी देण्यासाठी राज्य शासनाचा पुढाकार आवश्यक आहे. दरम्यान, यासंदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली आहे.महाराष्ट्रात नाशिक येथे संपूर्ण राज्यासाठी स्वतंत्र आरोग्य विद्यापीठ स्थापन झाले, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य मत्स्य व पशुवैद्यकीय विद्यापीठ नागपूर येथे सुरू झाले. परंतु राज्यात ३६७ अभियांत्रिकी महाविद्यालये असतानादेखील राज्यस्तरावर तंत्रशास्त्र विद्यापीठ नव्हते. त्यामुळे यासंदर्भात मागणी करण्यात येत होती. राज्यातील अभियांत्रिकी शिक्षण लोणेरे येथील तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या अधिपत्याखाली आणण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. या नियोजित विद्यापीठासाठी १५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यासोबतच पुणे, औरंगाबाद, मुंबई व नागपूर येथे विद्यापीठाची चार प्रमुख केंद्रे स्थापन करण्याचेदेखील ठरविण्यात आले होते. परंतु राज्यातील अनेक शिक्षणसम्राटांनी या निर्णयाला विरोध केला होता. मागील वर्षी राज्यातील महाविद्यालयांना या विद्यापीठाशी संलग्निकरण करण्याचा पर्याय देण्यात आला होता. परंतु हा पर्याय ऐच्छिक होता व जवळपास सर्वच विद्यापीठांनी पारंपरिक विद्यापीठांशीच संलग्निकरण केले. जोपर्यंत महाविद्यालयांना या महाविद्यालयाशी संलग्निकरण करणे अनिवार्य करण्यात येत नाही, तोपर्यंत या विद्यापीठाचे महत्त्व वाढणारच नाही, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी नाव न घेण्याच्या अटीवर दिली. यासाठी राज्य शासनाचा पुढाकार अपेक्षित असून, यासंबंधातील विधेयकात सुधारणा करणे आवश्यक आहे. याबाबत विनोद तावडे यांना विचारणा केली असता त्यांनी कुठलेही ठोस उत्तर दिले नाही. परंतु राज्य शासन याबाबत लवकरच निर्णय घेईल व सभागृहातील कार्यवाहीतून स्थिती स्पष्ट होईल, असे त्यांनी सांगितले.