शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
5
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
6
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
7
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
8
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
9
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
10
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
11
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
12
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
13
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
14
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
15
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
16
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
17
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
18
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
19
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
20
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!

नागपूर, अकोला, वाशीम जिल्हा परिषद निवडणुकीत यथास्थिती ठेवण्याचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 20:22 IST

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती कायद्यातील कलम १२(२)(सी) मधील तरतुदीनुसार ठरवलेले आरक्षण ५० टक्क्यांवर जाते. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी राज्य सरकारला या तरतुदीमध्ये आवश्यक दुरुस्ती करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देऊन तेव्हापर्यंत नागपूर, अकोला व वाशीम जिल्हा परिषदेच्या निवडणूक प्रक्रियेत यथास्थिती ठेवण्याचा आदेश दिला.

ठळक मुद्देहायकोर्ट : कायदा दुरुस्तीसाठी दिली तीन महिन्यांची मुदत

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती कायद्यातील कलम १२(२)(सी) मधील तरतुदीनुसार ठरवलेले आरक्षण ५० टक्क्यांवर जाते. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी राज्य सरकारला या तरतुदीमध्ये आवश्यक दुरुस्ती करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देऊन तेव्हापर्यंत नागपूर, अकोला व वाशीम जिल्हा परिषदेच्यानिवडणूक प्रक्रियेत यथास्थिती ठेवण्याचा आदेश दिला.प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व मुरलीधर गिरटकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. २०१० मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार कुठेही ५० टक्क्यांवर आरक्षण निश्चित करता येत नाही. असे असताना राज्यात महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती कायद्यातील कलम १२(२)(सी) मधील तरतुदीची अंमलबजावणी केली जात आहे. या तरतुदीनुसार ठरवलेले आरक्षण ५० टक्क्यांवर जाते. त्यामुळे ही तरतूद राज्यघटनेतील अनुच्छेद १४, २४३-डी व २४३-टी मधील तरतुदींशी विसंगत आहे. २०१६ मध्ये उच्च न्यायालयात दाखल एका याचिकेवरील सुनावणीदरम्यान, राज्य सरकारने कलम १२(२)(सी) मधील वादग्रस्त तरतुदीत दुरुस्ती करण्यासाठी मंत्रिमंडळाकडे प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे व तो प्रस्ताव निर्णयाधीन असल्याचे सांगितले होते. परंतु, त्यानंतर प्रस्तावावर काहीच निर्णय घेण्यात आला नाही. आजही कायद्यातील मूळ तरतुदीनुसारच आरक्षण निश्चित केले जात आहे. परिणामी, उच्च न्यायालयाने वरीलप्रमाणे आदेश दिला. यासंदर्भात यशवंत आष्टणकर व विकास गवळी यांनी याचिका दाखल केल्या होत्या. हा आदेश देऊन त्यांच्या याचिका निकाली काढण्यात आल्या. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. मुकेश समर्थ व अ‍ॅड. अक्षय नाईक, राज्य निवडणूक आयोगातर्फे अ‍ॅड. जेमिनी कासट तर, सरकारतर्फे अ‍ॅड. निवेदिता मेहता यांनी कामकाज पाहिले.निवडणूक आयोगाची सरकारविरुद्ध याचिकामहाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने उच्च न्यायालयात याचिका दाखल करून राज्य सरकार वारंवार नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीत अडथळे निर्माण करणारे निर्णय घेत असल्याचा आरोप केला आहे. सुरू झालेली निवडणूक प्रक्रिया राज्य सरकारमुळे रद्द करावी लागते व त्यानंतर नवीन प्रक्रिया राबवावी लागते. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर तिला बाधा पोहोचेल असे निर्णय सरकारने घेऊ नये असे आयोगाचे म्हणणे आहे. न्यायालयाने या प्रकरणात राज्य सरकारला नोटीस बजावून ९ सप्टेंबरपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिलेत.

टॅग्स :zpजिल्हा परिषदElectionनिवडणूक