शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

विकेल ते पिकेल तत्त्वाने राज्यात उत्पन्नवाढीचे नवे तंत्र राबविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 18:32 IST

Nagpur News राज्यातील कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य सरकार योजना आखत आहे. त्या अंतर्गत विकेल ते पिकेल तत्वाने राज्यामध्ये उत्पन्नवाढीचे नवे तंत्र या वर्षापासून राबविले जाणार असल्याची माहिती कृषी मंत्री दादा भुसे यांनी नागपुरात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देकृषिमंत्री भुसे यांची पत्रकार परिषदेत माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्यातील कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य सरकार योजना आखत आहे. त्या अंतर्गत विकेल ते पिकेल तत्वाने राज्यामध्ये उत्पन्नवाढीचे नवे तंत्र या वर्षापासून राबविले जाणार असल्याची माहिती कृषी मंत्री दादा भुसे यांनी नागपुरात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हा दौऱ्यावर आले असता खरीप आढावा बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, प्रत्येक गावाची उत्पादकता, जमिनीचा पोत आणि त्या मातीत येणारे उत्पन्न याचा सूक्ष्म अभ्यास करून हे नवे धोरण आखले जात आहे. यासाठी ग्राम कृषी विकास समितीची स्थापना प्रत्येक गावांवर करण्याचे नियोजन आहे.  या माध्यमातून राज्यातील सर्व गावांच्या कृषी क्षेत्राचे सूक्ष्म नियोजन होईल. हे पहिले वर्ष असल्याने अंमलबजावणी नुकतीच सुरू झाली आहे, येत्या वर्षभरात यावर काम झालेले दिसेल. यातून राज्याची कृषी उत्पादकता वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पत्रकार परिषदेला मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, पशुसंवर्धन दुग्ध विकास मंत्री सुनील केदार, पालकमंत्री नितीन राऊत प्रामुख्याने उपस्थित होते

युरियाचा दीड लाख मे. टन बफर स्टॉकयंदा राज्यात युरियाची कमतरता भासणार नाही. दीड लाख मेट्रिक टन युरियाचा बफर स्टॉक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. रासायनिक खतामध्ये दहा टक्के बचतीचे उद्दिष्ट आहे. खत आणि बियाण्यांची टंचाई शेतकऱ्यांना पडणार नाही. 

बियाण्यासाठी शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानशेतकऱ्यांना ऑनलाइन बियाणे देण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे. यासाठी त्यांच्या खात्यावर अनुदान दिले जाणार आहे. सोयाबीन बियाण्याची देखील कमतरता भासणार नाही. महाबिजच्या मागील वर्षाच्या दरानेच यंदाही सोयाबीन बियाणे दिले जाईल. या सोबतच कृषी विभागाने राबविलेल्या योजनेनुसार शेतकऱ्यांनी घरच्या घरी तयार केलेले सोयाबीनचे बियाणे वापरण्यावर यावर्षी भर देण्यात आला आहे. गरज भासल्यास मध्यप्रदेशातील बियाणे उपलब्ध करण्याच्या दृष्टीने देखील नियोजन करण्यात आले आहे.

राज्याच्या आर्थिक स्थितीत शेतकऱ्यांचे योगदानकोरोना संक्रमणाच्या काळातही महाराष्ट्रात आर्थिक स्थिती बरी आहे. यात शेतकऱ्यांचे मोठे योगदान आहे. चांगल्या उत्पन्नामुळेच राज्यात टंचाई नाही. कृषिमाल ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी सरकारचे उत्तम नियोजन सुरू आहे. त्यासाठी पुढाकार घेतला जात असल्याचे भुसे यांनी सांगितले.

टॅग्स :agricultureशेती